हनुमान जयंती
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Thursday, June 30, 2022
हनुमान जयंती
समर्थांचे अकरा मारुती
-------------------------------
भक्ती ☀️
केदारनाथ मंदिर - एक न उलगडलेल कोडं
केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही.
केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,०००
फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६००
फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७००
फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या
मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.
ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.
ह्या क्षेत्रात फक्त "मंदाकिनी नदीच" राज्य आहे. थंडीच्या
दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने
वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत
एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर
अभ्यास केला गेला असेल.
"केदारनाथ मंदिर" ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे
आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय
१००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील
असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा.
जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर
पृथ्वीवरच्या एका छोट्या "Ice Age" कालखंडाला हे
मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला.
साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी
पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे
नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची
शहानिशा करण्यासाठी "वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून" ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर "लिग्नोम्याटीक डेटिंग" हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे "दगडांच आयुष्य" ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.
सन २०१३ मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय
सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे "सरासरी पेक्षा ३७५% जास्त" पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल "५७४८ लोकांचा जीव गेला" (सरकारी आकडे). "४२०० गावाचं नुकसान" झालं. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.
"अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया" यांच्या मते
ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट
मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे.
"IIT मद्रास" ने मंदिरावर "NDT टेस्टिंग" करुन
बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं
आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण
हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.
दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय "शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक" पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही
तर "सर्वोत्तम" असल्याचे निर्वाळे आपल्याला काय
सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही.
तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं
नाही तर अगदी मजबुत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा
मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे. ज्या
जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि
संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच
हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं
असं आजच विज्ञान सांगतं आहे.
हे मंदिर उभारताना "उत्तर–दक्षिण" असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही "पूर्व–पश्चिम" अशी असताना केदारनाथ "दक्षिणोत्तर" बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर "पूर्व-पश्चिम" असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं.
पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो
प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष
म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला
गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त
कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा
असेल ? एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती. या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या "प्रोपर्टीजमध्ये" फरक झालेला नाही.
त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात
आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता "एशलर" पद्धतीने
एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची
मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड
विटा घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने
पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही
बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं
पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित
राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने
एअरलिफ्ट केलं होतं.
श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती
टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं
मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. "Titanic जहाज" बुडाल्यावर
पाश्चिमात्य देशांना "NDT टेस्टिंग" आणि "तपमान" कसं
सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला
होता.
केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरणं नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट वर "८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट रुंद" मंदिर उभारताना त्याला तब्बल "१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती" देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय.
आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने "१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच" असा मान
मिळवणार केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण "नतमस्तक" होतो.
वैदिक हिंदू धर्म-संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक
उदाहरण आहे, त्याकाळी वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र,
अंतराळ शास्त्र, आयुर्वेद शास्त्र यात आपले ऋषी अर्थात
शास्त्रज्ञ यांनी खुप मोठी प्रगती केली होती. म्हणूनच मला
मी "हिंदु"असल्याचा अभिमान वाटतो.
|| ॐ नमः शिवाय || || धर्म जागो जनार्दनाचा ||
नामस्मरणाने चमत्कार
नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात??? स्पष्ट करुन सांगा
श्रीराम
निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली...
श्रीराम
सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात...
श्रीराम
काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे...
श्रीराम
शांत झोप लागते.वेळेवर जागही येते...
श्रीराम
पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे...
श्रीराम
स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते,त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही...
श्रीराम
राग येत नाही.हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे.नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता,असाच त्याचा अर्थ होतो...
श्रीराम
क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते.त्या अनुषंगाने घटना घडत जातात.नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे...
श्रीराम
कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे.उदा.प्रथम स्थान हे स्वभाव स्थान,द्वीतिय स्थान हे धनस्थान,तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.
साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात...
श्रीराम
आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते,पण जशी साधना पुढे जात रहाते,तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते...
श्रीराम
नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे.जितके सांगावे,तितके कमीच... !!!खरोखर एवढे चमत्कार होतात??? स्पष्ट करुन सांगा
श्रीराम
निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली...
श्रीराम
सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात...
श्रीराम
काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे...
श्रीराम
शांत झोप लागते.वेळेवर जागही येते...
श्रीराम
पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे...
श्रीराम
स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते,त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही...
श्रीराम
राग येत नाही.हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे.नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता,असाच त्याचा अर्थ होतो...
श्रीराम
क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते.त्या अनुषंगाने घटना घडत जातात.नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे...
श्रीराम
कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे.उदा.प्रथम स्थान हे स्वभाव स्थान,द्वीतिय स्थान हे धनस्थान,तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.
साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात...
श्रीराम
आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते,पण जशी साधना पुढे जात रहाते,तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते...
श्रीराम
नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे.जितके सांगावे,तितके कमीच... !!!
श्री गणपति अथर्वशीर्ष
श्री गणेशाय नमः ।
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः र्व्यशेम देवहितं यदायुः ।।
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि । त्वमेव केवलम्कर्ताऽसि । त्वमेव केवलन् धर्ताऽसि । त्वमेव केवलम् हर्ताऽसि । त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि । त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।। १ ।।
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।। २ ।।
अव त्वम् माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् ।अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् ।। ३ ।।
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि । त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि । त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। ४ ।।
सर्वम् जगदिदन् त्वत्तो जायते । सर्वम् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति । सर्वम् जगदिदन् त्वयि लयमेष्यति । सर्वम् जगदिदन् त्वयि प्रत्येति । त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः त्वम् चत्वारि वाक्पदानि ।। ५ ।।
त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ।। ६ ।।
गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम् । अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् । तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् । गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिन्दुरुत्तररूपम् । नादः सन्धानम् । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः । निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता । ॐ गँ गणपतये नमः ।। ७ ।।
ॐ एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात् ।। ८ ।।
एकदन्तं चतुर्हस्तम्, पाशमङ्कुशधारिणम् । रदंच वरदम् हस्तैर्बिभ्राणम्, मूषकध्वजम् । रक्तं लम्बोदरं, शूर्पकर्णकम् रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, रक्तपुष्पैःसुपूजितम् । भक्तानुकम्पिनन् देवं जगत्कारणमच्युतम् । आविर्भूतंच सृष्ट्यादौ, प्रकृतेः पुरुषात्परम् । एवन् ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ।। ९ ।।
नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय, विघ्ननाशिने शिवसुताय,वरदमूर्तये नमो नमः ।। १० ।।
फलश्रुति
एतदथर्वशीर्षं योऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते । स सर्वतः सुखमेधते । स पंमहापापात् प्रमुच्यते । सायमधीयानो दिवसकृतम् पापम् नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतम् पापम् नाशयति । सायम् प्रातः प्रयुजानोऽअपापो भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाममोक्षंच विन्दति । इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति । सहस्रावर्तनात् । यं यं काममधीते तंतं मनेन साधयेत् ।। ११ ।।
अनेन गणपतिमभिषिंचति । स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम् । ब्रह्माद्यावरणम् विद्यात् । न बिभेति कदाचनेति ।। १२ ।।
यो दूर्वाङ्कुरैर्यजति । स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति । स मेधावान् भवति । यो मोदकसहस्रेण यजति । स वांछितफलमवाप्नोति । यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते, स सर्वं लभते ।। १३ ।।
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा, सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा, सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते । महादोषात् प्रमुच्यते । महापापात् प्रमुच्यते । स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति । य एवम् वेद ।। १४ ।।
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः र्व्यशेम देवहितं यदायुः ।।
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
दैवी वृक्ष : औदुंबर
वास्तुशांती
🏵 नविन घर बांधल्यावर वास्तुशांती केल्याखेरीज त्या घरात रहावयास जाऊ नये, असे म्हणतात. यास काही पर्याय वा परिहार आहेत का ? (१)
वास्तुशांती
🏵 नविन घर बांधल्यावर वास्तुशांती केल्याखेरीज त्या घरात रहावयास जाऊ नये, असे म्हणतात. यास काही पर्याय वा परिहार आहेत का ? (२)
श्रीगणेश म्हणून सुपारीची पूजा का केली जाते?
कोणत्याही शुभकार्यात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते. असे करण्यामागे स्मृतिग्रंथात काही उल्लेख आढळतात.
🔸शंखाची उत्पत्ती
श्री स्वामी समर्थ।।
।। श्री सूक्त एक विचार ।।
देवता पंचायतनामध्ये देव्याराधनाचे सूक्त म्हणून श्रीसूक्त प्रसिद्ध आहे. ते सर्व ऐहिक कामना पूर्ती करणारे असल्यामुळे ते काम्यसूक्त म्हणून विख्यात समजले जाते. ऐहिकाची देवता, भाग्य देवता, वैभव संपत्ती. शेतीवाडी, पशुधन,धनधान्य, पुत्र पौत्र आणि सेवक परिवार अशा सर्व प्रकारची लौकिक संमृद्धी आणि तिचा उपभोग मनसोक्त घेता यावा, असे आयुआरोग्य आपल्याला लाभावे, अशी प्रार्थना या श्रीसूक्तामधे ऋषीनी केलेली आहे.
सोरठी सोमनाथ
शिवलिंगाला हळद का वाहत नाहीत
व्रतांचे प्रकार
व्रतांचे प्रकार कोणते आहेत ? त्यातील किती व्रते अत्यावश्यक आहेत व किती ऐच्छिक आहेत ?
कालाअष्टमी
श्री कालभैरव
एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले.
कालभैरव
स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील महत्वाची स्थळे...
! श्री स्वामी समर्थ !!
नऊ नारायण अर्थात नवनाथ
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळ...