Showing posts with label विशेष माहिती /सामान्य ज्ञान. Show all posts
Showing posts with label विशेष माहिती /सामान्य ज्ञान. Show all posts

Thursday, May 25, 2023

 बऱ्याच लोकांना हे माहिती नसावं..

----------------------------------


१) पायली म्हणजे चार शेर  म्हणजे सात किलो
२) अर्धा पायली ( आडसरी ) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो
३) एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो
४) मापट म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो
५) चिपट म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो (५०० ग्राम)
६) कोळव म्हणजे पाव किलो (२५० ग्राम )
७) निळव म्हणजे आतपाव ( १२५ ग्राम )
८) चिळव म्हणजे छटाक  (५० ग्राम )

ही जुनी मापने मोजण्याची पद्धत.

साभार - मराठी विश्वकोश 

Wednesday, February 8, 2023

 ,*ळळळळळळळळळळ*


*'ळ'* -- *हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी!!*

आणि .,,

*म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!*

*'ळ' अक्षर नसेल तर?*

*पळणार कसे...*

*वळणार कसे...*

*दुसर्‍यावर जळणार कसे!*

*भजी तळणार कशी?*

*सौंदर्यावर भाळणार कसे?*

*पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी..?*

*तीळगूळ कसा खाणार?*

*टाळे कसे लावणार ?*

*बाळाला वाळे कसे घालणार....!*

*खुळखुळा कसा देणार?*

*घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार ?*

*घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार?*

*वेळ पाळणार कशी ?*

*मने जुळणार कशी ?*

*खिळे कोण ठोकणार ?*

*तळे भरणार कसे ?*

*नदी सागरला मिळणार कशी........!!*

*मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?*

*हिवाळा, उन्हाळा, पावसाळा....*

*नाही उन्हाच्या झळा*

*नाही त्या निळ्या*

*आभाळातून पागोळ्या खळाखळा....*!

*कळी कशी खुलणार ?*

*गालाला खळी कशी पडणार ?*

*फळा, शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा....*

*सगळे सारखे, कोण निराळा?*

*दिवाळी, होळी सणाचे काय......?*

*कडबोळी,पुरणपोळी ओवाळणी पण नाही ?*

*तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?*

*भोळा सांब ,*

*सावळा श्याम*

*जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ?*

*मातीची ढेकळे नांगरणार कोण?*

*ढवळे पवळे बैल जोततील कोण?*

*पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?*

*निळे आकाश, पिवळा चाफा...*

*माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !*

*नारळ, केळ, जांभूळ, आवळा,*

*नवर्‍याला बावळट बोलणार कसे*

*काळा कावळा, पांढरा बगळा*

*ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा*

*अळी मिळी गुपचिळी, बसेल कशी दांतखिळी?*

*नाही भेळ,*

*नाही मिसळ,*

*नाही जळजळ*

*नाही मळमळ*

*नाही तारुण्याची सळसळ*

*पोळ्या लाटल्या जाणार नाहीत.....*

*टाळ्या आता वाजणार नाहीत.....!*

*जुळी तीळी होणार नाहीत.......!!*

*बाळंतविडे बनणार नाहीत......!!*

*तळमळ कळकळ वाटणार नाही....!!*

*काळजी कसलीच उरणार नाही...!!!*

*पाठबळ कुणाचे मिळणार नाही*

*सगळेच बळ निघून जाईल,*

*काळ आला होता पण वेळ आली नव्हती*

*पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !*



 💐💐🚩🚩

Sunday, January 22, 2023

गड दुर्गनाम कोडे....

 *गड दुर्गनाम कोडे....*

*किल्ल्यांची नावे ओळखा*

चला आठवा इतिहास... 
1 घेतली आन, मोडुनी भान 
  मुक्त करी देश
  गड बेलाग, त्यावरी आग 
  दिला संदेश ।।

2 लढविले तट, उधळला कट 
    माणसे कैशी
    जरी भुईकोट ,भेदिले गोट 
    गावे चौऱ्याऐंशी ।।

3 नाव हिरकणी, बाळ तिचे गुणी 
   उतरली रात्री
   राजा बांधे बुरुज, नाव दिले     
   तिज करुनिया खात्री ।।

4 उचलला भार, लावली पहार 
   नाद होई ठण्ण
   देवीची कृपा ,होतसे नृपा 
    गवसती होन ।।

5 उंचहा कडा ,त्यावरी वाडा 
   असा बाले किल्ला
   सैन्यासह वस्ती ,दुष्मना धास्ती 
   ना करी हल्ला ।।

6 धिप्पाड शरीर बळात ,
   रौद्र जळात  सागरी लंका
    तरंगती होडी , लावू कशी    
    शिडी येते मनी शंका ।।

7 भोरप्याचा प्रबळ डोंगर ,
   झेंडा बुरुजावर अवघड जागा
   फाडिले पोट ,उधळला गोट 
   मारिली पागा ।।

8 सज्ज आरमार, बेट कुरट्यावर 
   शिशाचा पाया
   उठवला दुर्ग दर्यात, असे रेतीत 
   धोंडा मोरया ।।

9 दमयंती सवे तो बसे, गाली मग 
    हसे महाली पाणी
   कोसळती नरमादी ,धबाबा   
   आदी प्रपाती गाणी ।।

10 इतकासा असुनी हा किल्ला, 
      सहा साल लढला 
      अशी हातघाई
     मुघलांनी करुनि जिहाद ,
     नाही दिली दाद 
     रामे बादशाही ।।

11लढवून भव्य हा किल्ला , 
    उतरुनि गेला राजा पावसात
     निश्चये करुनि प्रचंड ,राखली 
     खिंड नाही केला घात ।।

12 शिलाहार बांधती दुर्ग, 
     भासे जो स्वर्ग असा घेरिया
     हेलियमचा लावूनी शोध ,
     घेतसे बोध कुणी अवलिया ।।

13 पाकळ्या असती या सोळा, 
  मधोमधे गोळा असे हिरण्याचा 
      देखणे भोवती तळे ,
सिद्ध योग बळे प्रदेश पुण्याचा ।।

14 वेली घनदाट, असे हा घाट  
      दगडी रांजण 
       बैलांचे दिसती तांडे, स्वेद 
       जरी सांडे तुडवती जन ।।

15 आकाशी जातसे कळस, 
      मंदिरी पळस कडा अनुल्लंघ
      चढताना लागते धाप ,
      होई अनुताप तरी मन दंग ।।

16 वारेवा खोल किती कडा, कोकणी पडा लागु  नये नजर 
     रोहिदास तारामती जोडी,  
     शिखरे खडी दिसे इंद्रवज्र ।।
      
17 रुधिराने सिंचली माची, रणकार्याची लावली बाजी
 तुटले जरी किती , माळेतील 
 मोती राज्याचे काजी

18 कातळा करुनिया भंग , उभा तुरुंग सात हौदांचा 
 असह्य सुळका , ये न कुणा पुळका राजकैद्यांचा ।।

19 रानात वेढती रिस, जिथे रात्रं दिस तेलीणी सोटा
 जाहला बापू का खस्ता, काढता रस्ता सांभाळी कासोटा ।।

20 पायथ्याशी याच मैदानात, राव आणि पंत पराक्रमी सक्ती 
 घेतला मोठा हा घास ,मुघली इखलास पराजय प्राप्ती ।।
...SSS...

Wednesday, January 18, 2023

प्रसिद्ध माउंट मेरी चर्च

 *🔮✍️मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध चर्चेसपैकी एक आहे बांद्रे येथील माउंट मेरी चर्च. सप्टेंबरमध्ये दरवर्षी येथे माउंट मेरीची जत्रा भरते. यावर्षीही 8 सप्टेंबर रोजी ही जत्रा सुरू झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ही जत्रा असेल. या जत्रेला सर्वधर्मियांची मोठी गर्दी असते.*

*माउंट मेरी जत्रेचं वैशिष्ट्य*
*माउंट मेरी हे देशातल्या सर्वांत सुंदर चर्चेसपैकी एक मानलं जातं.*

*16 व्या शतकात पोर्तुगालहून मदर मेरीची मूर्ती येथे आणली होती*

*तिच्यासाठीच हे भव्य चर्च टेकडीवर उभारण्यात आलं.*

*मात्र, इ.स. 1700 मध्ये अरबी चाच्यांनी या मूर्तीची नासधूस केली.*

*त्यानंतर अनेक वर्षांनी एका कोळ्याच्या स्वप्नात ही मूर्ती आली होती. समुद्रात ही मूर्ती मिळेल, असाही त्याला स्वप्नात दृष्टान्त झाला होता.*

*त्याला नंतर खरोखर ही मूर्ती समुद्रात आढळून आली.*

*त्यानंतर 1760 साली हे चर्च पुन्हा बांधण्यात आलं.*

*गेल्या 300 वर्षांपासून माउंट मेरी चर्च मुंबईमधील प्रसिद्ध चर्च म्हणून आपली ओळख जपतंय.*

*माउंट मेरी चर्च समुद्रपासून 80 मीटर उंचीवर आहे. या चर्चमधून अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं.*

*8 सप्टेंबर नंतर येणाऱ्या रविवारी येथे आठवडाभर मोठी जत्रा साजरी केली जाते.*

*या जत्रेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते.*

*लोक येथे मेणाचे अवयव दान करतात.*

*या जत्रेसाठी दररोज हजारो लोक गर्दी करतात.*
🌹

 *🚩🌀♐🈺♎ 🉑 ⛎🈚♐🌀🚩


*🔲 शिवकाळातील जमिनीची*
       *प्रतवारी व सारा आकारणी.*
      *~~~~~~~~~~~~~~~~*
         *🚩*
        *🏇 शिवकाळात .......*

      *एखादा प्रांत पहिल्यांदाच स्वराज्यात दाखल झाला, तर "स्वराज्याचे भूमापन अधिकारी" त्या प्रांतात जाऊन जमिन मोजणी व तिची प्रतवारी करुन मग शेतसारा ठरवला जाई.*

  *"स्वराज्यातील जमिन मोजण्याचे साधन म्हणजे काठी". याला "शिवशाही काठी" बोलले जाई.व याच काठीने जमीन मापली ( मोजली ) जात असे.* 

*📝 मोजमाप :----*

*०१) ५ हात ५ मुठी = १ काठी.*
*०२) १ काठी = ८२ तसू*
*०३) २०x२० काठ्यांचा =*
        *१ बिघा.*
*०४) १२० बिघे = १ चावर* 

*अशा पद्धतीने जमिन मोजली जाई.*

  *🚩 प्रामुख्याने स्वराज्यात......*
        *जमिनीच्या १२ प्रति*
        *ठरिवल्या होत्या.*

*(१) अव्वल (२) दूम (३) सीम*
*(४) च्यार सीम*
*(५) बावील किंवा बावूल*
*(६) खारवट (७) रहू (८) खारी*
*(९) कुड्याट ( किंवा खुरियत )* *(१०) राजपाळ (११) तुरखटे* व *(१२) मनूत.*

 ▪️यापैकी......
*▪️राजपाळ = झुडुपाची,*
*▪️खारवट = समुद्राकाठची,*
*▪️खारी = खाडीजवळची,*
*▪️बावल = खडकाळ,*
*▪️खुरी = दगडाळ,*
*▪️तुरवटे = द्विदल धान्ये व*
                     *ताग पिकवणारी,*
*▪️मनूत = झाडांच्या मुळ्या*
                    *असलेली व साफ*
                    *न केलेली.* 

*🌀 या शिवाय ..........* 

*● वजत म्हणजे नापीक,* व
*● वरकस म्हणजे डोंगरी* 
    *हे ही प्रकार दिसतात.*

*🔲 जमिनीच्या प्रतवारीवरून*
       *तिची सारा-आकारणी केली*
        *जाई.*

*● हि सारा आकारणी दोन प्रकारात केली जाई*

*१) नगदी - रोख रकमेत.* व
*२) गला - धान्य स्वरुपात.*

*दर बिघ्याला अव्वल - १२ मण,* *दुय्यम - १० मण,*
*सीम-८ मण,*
*च्यार सीम ६ मण,*
*राजपाळ-८ मण,*
*खारवट - ७ मण,*
*बावल ६ मण,*
*खुरी - ६ मण,*
*कुड्याट-६ मण,*
*रहू- ५ मण,*
*तुरवटे व मनूतही ५ मण.*

*🌀 वजत व वरकस*
       *जमिनीवरील आकारणी*
       *बिघ्याऐवजी नांगराप्रमाणे*
       *केली जाई......*

*▪️१ नांगर = साधारणत :--*
     *६-७ बिघे. एवढ्या जमिनीला*
     *एक बिघा समजून आकार*
     *घेतला जाई.*

 *हा सारा ही नजरमान ( तज्ञ )*
 *अशा ५ लोकांनी जमीन तपासून खंडीचे पिकावरून स्थळ नजरेस येईल, त्याप्रमाणे धारावसुली ठरविली जाई.*

   *"कोरडवाहू जमिनीला जिराईत" तर "ओलीताच्या जमिनीस बागाईत" असे म्हणत.*

    *बागाईत जमिनीतही मोटस्थळ, पाटस्थळ, बागमळा व राई असे पोटविभाग पाडले जात.*

    *जमिनीची पाहणी करणारा "जमिन कारकून", व मोजणी करणारा "काटकर" यांना सरकारकडून वेतन मिळे. म्हणजे "स्वराज्याच्या सरकारी कोशातून" मिळे. "पाहणीचा खर्च" मात्र रयतेवर आकारला जाई.*

    *बिघे,चावर,सीमा ठरली म्हणजे "चकबंदी" झाली. यानंतर जमिनीची काटेकोर मोजणी, प्रतवारी ठरवून मिरासदार, कुळे, शेतकरी यांच्या नावे "सनदा" दिल्या जात.*
    *गावाचा "जमिनझाडा" तयार केल्या नंतर "अनाजी पंत प्रभुनीकर" हे जातीने तपासणी करीत असत.*

  *जमिनीच्या "साऱ्याचा दर" हा मोगलांचा व स्वराज्याचा वेगळा वेगळा होता. मोगलांचा १/२ म्हणजे उत्पन्नाचे दोन भाग करुन एक भाग सरकार जमा व एक भाग शेकऱ्याला मिळत असे.*

    *मोगलाईत देशमुख, वतनदार "सारा वसुलीचे" काम करीत. ते हजार खंडी धान्य गोळा झाले तर त्यातील दोनशे खंडी सरकार जमा करीत. उरलेले स्वतःकडे ठेवीत असत. पण स्वराज्यात असा प्रकार नव्हता.*

     *स्वराज्यात शेतसारा वसुलीचा दर हा २/५ असा होता. म्हणजे एका शेतकऱ्याला पाच खंडी धान्य झाले तर, त्यातील दोन खंडी सरकार जमा होत होते व तीन खंडी स्वतः शेतकऱ्याला मिळत असे. हा शेतसारा वसुल करायला देशमुख वतनदार येत नसे. तर स्वराज्याचा सरकारी अधिकारी येत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी "वतनदारी बंद" करुन रयतेला सुखी केले होते.*

     *सरकारजमा झालेले धान्य साठवून ठेवले जाई. दुष्काळात, अतिवृष्टीने, शत्रु सैन्याने पिकाची नासाडी केली तर अशा वेळी ते साठवून ठेवलेले धान्य रयतेला दिले जाई. तसेच उरलेले धान्य महागाईच्या काळात विकायला काढले जाई.*

   *आदिलशाही व मोगलशाही तील "जमिन धारा", "शेतसारा" पद्धती पाहिल्या, तर लक्षात येते की देशमुख वतनदार हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असत.*

    *हा सर्व भ्रष्टाचार शिवाजी महाराजांनी समुळ नष्ट करुन एका बाजुला शेतकऱ्यांवरील अतिरिक्त बोजा पूर्ण कमी केला व सरकारचे उत्पन्न वाढविले. शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी बंधारे, पाट, धरणे हि बांधली होती. "शेतीसाठी पाण्याची सोय" हे धोरण शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट पद्धतीने राबविले होते. शिवाजी महाराजांचे हे शेतकऱ्यां विषयक व शेती विषयक धोरण अतिरिक्त अभ्यासनीय व उपयुक्त असेच आहे. आज बारकाईने पाहता भारतातच काय तर अनेक देशात शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण हे वापरले जाते.*
 
        *~~~~~~~~~~~*

      *▪️संकलन :---*
                 *दुर्गवेडा कृष्णा घाडगे*

 *▪️संदर्भ:--*
*● शककर्ते शिवराय खंड २*

*● लेखक- शिवकथाकार विजय*
                 *देशमुख* 

*● सभासद बखर*

*● राजवाडे खंड २०*
   *लेखांक- ५५, ५८* 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🎠🎠🎠🎠🏇🏇🏇🏇🎠🎠🎠🎠

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...