Showing posts with label आरोग्य टीप. Show all posts
Showing posts with label आरोग्य टीप. Show all posts

Thursday, May 25, 2023

 १. केळी-

*प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणारं केळं हा अतिशय उपयुक्त उपाय आहे.
 केळ्यांमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबर्समुळे अतिशय फायदा होतो.* 

२. भात-

*प्रवासाला निघताना तूप भात सोबत घ्यावा. मळमळत आहे असं वाटलं तर भात खाऊन घ्यावा. 
यामुळे तुमची मळमळ थांबेल. त्रास कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.* 


३. क्रॅकर्स बिस्कीटं-

*क्रॅकर्स बिस्कीटं अतिशय हलकी असल्यामुळे पचायला सोपी असतात.
 शिवाय शरीरात ही बिस्किटे थंडावा निर्माण करतात. त्यामुळे मळमळ कमी होते.


४. बर्फाचा तुकडा-

*प्रवासात शक्य असल्यास सोबत बर्फाचा तुकडा ठेवावा. पाणी प्यावे. 
त्यामुळे मळमळण्याचा, 
उलटी होण्याचा त्रास कमी होतो.

५. आलं-

आल्याचा तुकडा किंवा आलेपाकाची वडी सोबत ठेवावी. आल्यात मळमळ थांबवण्याचा गुण असतोच. एक भांडभर पाण्यात थोडंस आलं ठेचून किंवा किसून मिसळावं आणि ते पाणी प्यावं म्हणजे तात्काळ आराम मिळतो.
याशिवाय आलं किसून त्यात लिंबू पिळावा, थोडीशी साखर घालून किंचीत सैंधव मीठ टाकून गरम करावं. साखर विरघळली, की गॅस बंद करावा. हे चाटण अतिशय चांगला उपाय आहे. यानं अपचन झालं असेल तर ते लगेच कमी होतं. मळमळ थांबते.



६. पुदिना-

पुदिना हा एक अतिशय गुणकारी उपाय आहे. त्याचं तेल मिंट आॅईल म्हणून वापरलं जातं. चहा करताना पुदिना टाकून चहा करावा. हा उपाय मळमळीवर उत्तम इलाज आहे.

७. वेलदोडे-

आयुर्वेदात वेलदोडे या पदार्थाला मळमळीसाठी फार गुणकारी औषध मानलं जातं. प्रवासात मळमळू लागल्यावर वेलदोड्याचे दाणे तोंडात ठेवल्यास मळमळीचा त्रास लगेच कमी होतो.मसाला वेलदोडे म्हणजे काळे वेलदोडे आणि पिवळे वेलदोडे दोन्ही कफ, पित्त आणि वातशामक औषधांनी परिपूर्ण आहेत. प्रवासाला निघताना वेलदोडे सोबत ठेवावे.
८. पाणी-

जल ही जीवन है…असं आपल्याला सर्रास सांगितलं जातं. त्यात काही चूक नाही. प्रवासात होणारी मळमळ कमी करण्यासाठी थोडं थोडं पाणी पिणं हे चांगला परिणाम करतं.
जर जास्त प्रमाणात पाणी प्यायलात, तर मात्र बरोबर उलटा परिणाम होतो आणि उलट्या होतात. म्हणून थोडं थोडं पाणी प्या. मळमळ कमी होते.









.




 घरीच आहात...आता घरातील प्रत्येक सदस्यांनी एक काम करायचं (वयोगट - सर्व) खाली फोटोत दाखविलेली *#प्राण_मुद्रा* करायची. ही मुद्रा दोन्ही हातांनी आणि एकाचवेळी करायची आहे. हाताचा अंगठा हा एकाचवेळी अनामिका आणि करंगळी या दोन बोटांना (अग्रभागी) स्पर्श केलेल्या अवस्थेत ठेवून उर्वरित दोन्ही बोटे म्हणजे तर्जनी आणि मध्यमा ही सरळ व ताठ ठेवायची आहेत. अंगठ्याचा स्पर्श हा एकाचवेळी करंगळी आणि अनामिकेला होणं आवश्यक आहे आणि हा स्पर्श अगदी हलका हवा, दाब नको. ज्याला feather touch म्हणतात तसा. ही मुद्रा दिवसांतून तुम्ही कितीही वेळा करु शकता. फक्त एका वेळी ती सलग १६ मिनिटे करणं केव्हाही चांगले....


फायदे - प्राण हा आपल्या देहातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो प्रत्येक अवयवात स्थित असतो. प्राण हा संजिवक, तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्यसंपन्नता देणारा असतो. या योगमुद्रेमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, फुफ्फुसांची, श्वसनयंत्रणेची, डोळ्यांची कार्यक्षमता वाढते, रोगाचा शरिरावरील परिणाम कमी व्हायला मदत होते. अवयवांची कार्यक्षमता वाढते....

१६ सलग मिनिटे करण्यामागे कारण असं की या काळात सर्व शरिरांत प्राणशक्ती खेळायला मदत होते. १६ मिनिटे सलग ही मुद्रा करत असताना शरीराकडून प्रचंड विरोध होतो (Resistance) तो न जुमानता तुम्ही एकसलग १६ मिनिटे x त्रिकाळ ही मुद्रा करायची आहे. एकदा बोटे या पोझिशनमधे ठेवली की १६ मिनिटांनी सोडायची. हात दुखू लागले तर मुद्रा न सोडता तुम्ही हात, तळवा यांची हालचाल करायला हरकत नाही. 

ही मुद्रा कोणीही करु शकते. स्त्रीपुरूष, जातधर्म बंधन नाही. मासिक पाळीच्या काळात ही मुद्रा करणं अतिशय उत्तम. आजारी माणसांनी, वयोवृद्धांनी १६ मिनिटे एकसलग जमलं नाही तर निदान पाच मिनिटे तरी करायला हवी. ही मुद्रा करत असताना, कोणत्याही सुखासनात बसा. झोपूनही करु शकता. फक्त उभ्याने आणि चालता चालता करु नये. डोळे मिटून *गुरुमंत्राचा किंवा कोणत्याही शक्तीचा*" जप करायला हरकत नाही. इतर धर्मीयांनी आपापल्या देवांचे जप करावेत.

 *वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:*


1. जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.
2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.

6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.

8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.

9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.

10. शौच (लैट्रीन ) साठी जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.

● वरचेवर मित्रांच्या, मैत्रीणींच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा

● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.

● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.

● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? 
     
● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!

● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .

 मुलगा मुलगी जसे तुमच्या बरोबर वागणूक ठेवेल तेवढीच तुम्ही सुद्दा ठेवा एकतरफी लाड़ प्यार करू नका- मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा

● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा

● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .

● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल

 ● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?           

● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.

● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
 
● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा

● आणी हो, तुमच्या मित्रांना / मैत्रीणींना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

● मित्र-मैत्रीण नसतील तर
तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.

● त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा, मुक्त दाद द्या.
        
म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...

● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!

● क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका..!

● संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांचा सामना करा..!

● काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत.

        *!! मित्र जपा मैत्री जपा!!*

        *जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.*

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ??? ???


 याची कारणे: *वयाच्या तिसऱ्या टप्प्यातील मानसिक गोंधळ*
 द्वारा: अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:

 वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

 काही सुचवतात: "डोक्यात ट्यूमर". मी उत्तर देतो: नाही!

इतर सूचित करतात: "अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे". मी पुन्हा उत्तर दितो नाही!

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

 जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:

  - अनियंत्रित मधुमेह
 - मूत्रमार्गात संसर्ग;
 - निर्जलीकरण

 हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही. 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते.

जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात. निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे,
एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा.

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असते तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय 50 व्या वर्षी सुरू होते. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे. जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं अस वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

 निष्कर्ष:
 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

 तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः
 १) *द्रव्य पिण्याची सवय लावा*. पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे; संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.

 *महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा!*

 २) कुटुंबातील सदस्यांना इशारा: पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा.

जर आपल्याला हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारे लक्षणे आहेत.

 अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.

 जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका!

 आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत: साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे.

    50 शीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे!

Sunday, January 22, 2023

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी --

 *फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टी नियमित वापरा*


फुफ्फुस शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फुफ्फुस निरोगी असल्यावर अनेक आजार उद्भवतात. जसे की दमा,न्यूमोनिया,क्षयरोग,फुफ्फुसांचा कर्करोग इत्यादी, म्हणून फुफ्फुसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.
 
*1 व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहार-*
आंबट फळे जसे- संत्री, लिंबू, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस, आंबे या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराचा सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहारात अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे श्वास घेल्यावर ऑक्सिजन सर्व अवयवांमध्ये पोहोचतात. 
 
*2 लसणाचा सेवन -*

लसणाचे सेवन केल्याने कफ नाहीसा होतो. जेवल्यानंतर लसूण खालले तर हे छाती स्वच्छ ठेवतो. लसणात अँटीऑक्सीडेंट असतात जे संसर्गाविरुद्ध लढतात आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.  

 
*3 लायकोपिन समृद्ध आहाराचे सेवन-*
 अन्नात असे आहार घ्यावे जे लायकोपिनने समृद्ध असावे जसे गाजर, टोमॅटो, कलिंगड, पपई, बीटरूट आणि हिरव्या पालेभाज्या. अशा प्रकारच्या आहारात केरोटीनॉयड अँटीऑक्सीडेंट असते. जे दमापासून बचाव करण्यात मदत करते, तसेच हे खाल्ल्याने फुफ्फुसांचा कर्करोगाचा धोका कमी होतो.  
 
*4 मनुकाचे सेवन-*
 दररोज भिजत घातलेले मनुकाचे सेवन केल्याने फुफ्फुस बळकट होतात आणि त्यांची रोगांशी लढण्याची प्रतिकारक शक्ती देखील वाढते. 
 
*5 तुळशीच्या पानाचे सेवन*

फुफ्फुसांमध्ये कफ साचला असल्यास कफ काढण्यासाठी तुळशीचे कोरडे पान, काथ, कपूर आणि वेलची सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. आता या मध्ये नऊ पटीने साखर मिसळून दळून घ्या. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खा. या मुळे फुफ्फुसातील जमलेला कफ दूर होईल.

Monday, January 9, 2023

दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध

 🎯 वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध 🎯



होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.

कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो. 


सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.


अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.


धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.


आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.


विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.

बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे.  सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.


🎯🎯🎯🎯🎯🎯
का दडपले गेले विटॅमिन बी-१७


विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.


कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.


याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.


आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते.

🙏🙏🙏🙏

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा ।

Thursday, December 22, 2022

*काश्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा??*

*आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये "पादाभ्यंग" सांगितलेले आहे* त्यात काश्याच्या वाटिने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-


◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी
◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी
◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी
◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी
◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी
◆गुढघेदुखी,टाच दुःखी,कंबरदुखी अश्या त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆पायावरची सूज कमी करण्यासाठी
◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी
◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त
◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी
◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी

*भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे "कांस्यम बुद्धीवर्धकम"*
आपल्या मराठीत एक म्हण आहे *" तळपायाची आग मस्तकात जाणे"* आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला काश्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते
वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे,युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात
संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहे
जो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप
*आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे*

ऐतिहासिक वारसा

कांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे.भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला काश्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो.कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून *आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे*.
गुजरातमध्ये जेवणासाठी काश्याच्या थाल्याचं वापरतात,पूजेसाठी काश्याचे तबक वापरले जाते,मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही काशेच वापरले जाते,तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे,पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा,तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.

*वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायाम*

म्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे
सुवर्णासमान कांती प्रदान करणारे,त्वचेचा वर्ण गौर करणारे,अग्नी प्रदीप्त करणारे,बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे.
-------------------------------------------------

----------------------------------------------------------                                                                 
--------------------------------------------- 🙏🏽🙏🏽
       ----------------------------------------------

 श्रीकृष्ण मंत्राचा मनापासून जप करा, सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळवा!


Source : "लोकमत"

 *साखर*

➖➖
*साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. "त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."

साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...

(१) -- साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!

(२) -- गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. 

(३) -- साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

(४) -- साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. 

(५) -- साखर ही रक्तदाब वाढवते.

(६) -- साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.

(७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.

(८)-- साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.

(९)-- साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.

(१०) -- साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.

(११) -- साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.

(१२) -- साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.

(१३) कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.

वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.
प्रसारणःराजयोग ग्रुपचे

 📙📘📗📕📒📔📓

📚
*ऑलोपॅथिक आधुनिक मेडिकल सायन्सची एक भयानक वास्तविकता

ADR म्हणजे अॅडवर्स ड्रग रिअक्शन - संपूर्ण जगामध्ये मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे. आपण ज्या ऑलोपॅथिक औषिधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते.  

सर्व प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत, नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11लाख लोकांना मधुमेह (diabetis) होतो. 

आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे "ओव्हर डोस अमेरिका" या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहम या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की, अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य ऑलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे. लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.

अँटिडिप्रेसंट औषधी, antiboitics, कोलेस्टेरॉल च्या औषधी यामध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला ्भ्रमीत केले आहे. 

यानंतर आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे "DEATH बाय PRISCRIPTION"
या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर असून त्यांचे नाव DOCTOR RESTRAIN हे आहेत.  

आज संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ऑलोपॅथिक औषधी आहेत हे Dr. Restrain यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे....

जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत. इतर कोणत्याही करणापेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी मरणारांची संख्या पाचपट जास्त आहे. 
-Dr.B.M.Hegde (पद्मभूषण) MD, FRCP (London)

लोकांना असे वाटते की, ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया इतक्या धोकादायक व अनिश्चित असतात -डॉ. अतुल गावंडे (H.O.D. बोस्टन युनिव्हर्सिटी अमेरिका, सर्जरी डिपार्टमेंट )

हेल्थ चेकअपच्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा /औषधी /रक्त - लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नॉलॉजि आहे तर हे साफ चुकीचे आहे Famous . डॉ. BM हेगडे येथे नमूद करतात की देवाची कृपा आहे की, हे ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान only 100-150 वर्ष जुने आहे.and त्यामुळे मानव जात अजून पृथ्वीवर जीवंत आहे. 

मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर ऑलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. 

हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नॉलॉजि चा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर मध्ये, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन, गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे. 

ऑलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (dignosis) च्या बाबतीत jastee अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो. Dr.Jecob Kuriyan यांनी ही निदानाची प्रक्रिया अचूक असूच शकत नाही हे आपल्या पुस्तकात सिद्ध केले आहे. 

अनावश्यक रक्त -लघवी तपासणी, X-ray, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, MRI, एन्डोस्कोपी अँजिओग्राफी ई.अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते. डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात. जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे 50% पर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही.

अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा धंदाही फार जोमात आहे. लसीकरण करतांना BCG, POLIO, TRIPLE, MMR, MISEALS, TYPHOID ई. लसी वगळता अनेक लसी अनावश्यक असून या लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. मेडिकल सायन्सच्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे. 

औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनावश्यक औषधांच्या दुष्परीणामामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.

असाच भ्रष्टाचार OR unreasonable profit making मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी अवलंबलेला असून अनावश्यक ऑपरेशनची मालिकाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशनचा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत. 

 रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते (तो तसा नसतांना). त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन e,g bypass angioplasty करायला भाग पाडले जाते.

असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक उपचार अथवा ऑपरेशनमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. 

very fewकिडणीचोर डॉक्टरांच्या कुकृत्यामुळे देशाला अनेक वेळा व्यथित व्हावे लागले 

 व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.

*स्वतः चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.*

*डायबिटीस मधूमेह साठी ऐक चमत्कारिक औषध *-24तास* *शूगर शी फाईट देनारे*. 
*-(शूगर फाईटर)-*    
*अधिक माहितीसाठी व्हाटस्प वर hii करा.*
  *पेशंटचे अनूभव बघण्यासाठी*       
*औषधा साठी संपर्क व्हाटस्प वरच करावा.*
                 *8999431330* 🌿
*7725800900*🌿

Friday, December 16, 2022

*दुधाचा घट्ट चहा पिताय.. मग आधी आरोग्यावर होणारे हे दुष्परिणाम वाचा*


◼ अनेकांना नुसत्या दुधाचा घट्ट चहा आवडतो. मात्र, असा चहा पिणारे स्वत:हूनच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असतात. कमीत कमी दूध नि जास्त पाणी असणाराच चहा घ्यायला हवा. फक्त दुधाचा चहामुळे पित्त वाढते नि त्यातून डोकेदुखी, अपचन, मळमळणे, पोटफुगीसारखे विकार होऊ शकतात.

◼ सर्वात बेस्ट ब्लॅक टी (कोरा चहा), लेमन टी, आलं घातलेला चहा आणि एक नंबर गुळाचा चहा. आपणास 90% आजार पोटातून होतात. साखरेचा चहा टाळल्यास 45% आजार आपोआप नष्ट होतील. चहामुळे आरोग्यावर होणारे इतर तोटे जाणून घेऊ या..

*चहाचे दुष्परिणाम..*

◼ रोज 5-10 कप अति उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडते. आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी, मलावरोध असे विकार जडतात.

◼ भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठे काम करणाऱ्यांना मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, स्थूलता असे विकार जडू लागतात.

◼अति प्रमाणात दूध-साखरविरहित चहा घेतल्यास रक्तदाब वाढणे, पक्षाघातासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या कमी होते.

◼ दूध, साखर नि चहाची भुकटी मिसळून उकळलेला चहा कफ, पित्त आणि वात वाढविणारा, उष्ण गुणांचा आहे.
=============संपर्क-
9869257604
8983011737
=============
◼ टपरीवर ॲल्युमिनियमच्या भांड्यात चहा उकळतात. ॲल्युमिनियमचा दीर्घ काळ संपर्क राहिल्याने अल्झायमर (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण होतो.

◼ चहामुळे रक्ताची आम्लता वाढते. हाडे ठिसूळ होतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो. आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

◼चहासोबत आपण काहीतरी खातो. अशा पदार्थांतील मिठाचा साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीरासाठी अपायकारक ठरतो.
=============सौजन्य-श्री समर्थ योग निसर्गोपचार संशोधन केंद्र, 
कुंभारआळी तलावाजवळ, पेण-रायगड. 
=============

Saturday, December 10, 2022

बुफेची किंमत कशी ठरते.....?


साधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. 
थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. 
आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका.

BBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns, साधारण ५०० रुपये किलो, 
म्हणून BBQ Nation चा मांसाहारी बुफे ७५०-८०० रुपयांपासून सुरू होतो. 
तुम्ही पोटभर prawns खाल्ले तरी त्यांना नुकसान नाही.

*वेलकम ड्रिंक, सूप*

सगळ्या बुफेच्या ठिकाणी self service असली तरी welcome drink किंवा सूप मात्र तुम्हाला टेबल वर दिले जाते. 
त्यात तुमचे खूप काही आदरातिथ्य करायचा हेतू नसतो.

गोड welcome drink ने तुमच्या मेंदूला एक छान साखरेचा डोस मिळतो आणि तुमचा मेंदू तुमची भुकेची मात्रा कमी करून टाकतो, 
पोट रिकामं असलं तरी.

सूप तुमच्या पोटात भरपूर जागा व्यापून टाकतात आणि मग परत जास्त खायची इच्छा राहत नाही. 
त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्यात हॉटेलवाला तुम्हाला तुमची १.५ लिटर जठरक्षमता वापरण्यापासून थांबवत असतो.

*वेटर*

तुम्ही BBQ Nation मध्ये non-veg grill लावायला सांगा आणि गंमत पहा. 
येणारा वेटर तुम्हाला जास्तीत जास्त चिकन किंवा फिश (दोन्ही १२० रुपये किलो) खायला आणून देत जाईल. 
तुम्ही मटण किंवा Prawns (४५० ते ५०० रुपये किलो) कितीही मागत राहा, 
तुम्हाला ते अत्यंत कमी आणि खूप उशीराने दिले जाते.

अपेक्षा एवढीच असते की तुम्ही भुकेच्या तडाख्यात दुसरे काहीतरी खायला घ्यावे आणि तुमचा surplus कमी करून घ्यावा.

५०० रुपये किलोच्या prawns च्या जागी तुम्ही १२० रुपये किलोचे चिकन खाल्ले तर ७५० रुपयांतले तुम्ही जास्तीत जास्त २०० रुपये वसूल करणार, बाकी हॉटेलचा फायदा.

*चाट, आईसक्रीम*

कित्येक बुफेच्या ठिकाणी चाट, पापडीवाला ठेला हमखास लावलेला असतो. 
बायका आपल्या नैसर्गिक स्वभावाने तिकडे जाऊन पाणीपुरी खाऊन पोट भरतात. 
डोक्यावरून पाणी ५० रुपयांत एका बाईला चुरमुरे असलेली भेळ/चाट किंवा पाणीपुरी देऊन तिचे उरलेले पैसे हॉटेलवाला स्वतःकडे खेचत असतो.

आईस्क्रीमची अवस्थाही तीच! 
स्वस्तातले फॅमिली पॅक वाले आईसक्रीम (२०० रुपये किलो) तुम्हाला नावाला डायफ्रूट शिंपडून चारायला हॉटेलवाल्याचा फायदाच असतो.

*फळे, सॅलड*

कितीही आरोग्यदायी असली तरी तुम्हाला ४० रुपये किलोचे कलिंगड, खरबूज, गाजर, काकडी चारण्याइतका आनंद हॉटेलवाला दुसऱ्या कशातच घेऊ शकत नाही. 
त्यामुळे हे हमखास तिथे मुबलक असणार.

*गोडधोड/डेझर्ट*

कितीही अट्टल खाणारा पाव किलोपेक्षा जास्त गोडधोड नाही खाऊ शकत, मेंदू खाऊच देत नाही. 
बुफेमधल्या डेझर्टच्या किमती पाहिल्या तर जास्तीत जास्त १०० रुपयांचे गोडधोड तुम्ही खाऊ शकता.

*शाकाहारी लोक*

तुम्ही समस्त बुफेवाल्यांसाठी हक्काचे बकरे असता. 
१० रुपये किलोचा बटाटा “तंदूर आलू” म्हणून तुम्हाला खाताना पाहून हॉटेलवाले ऑर्गझमीक आनंद घेत असतात. 
पनीर खा, स्वीट खा, फळे खा … काहीही खा!

तुमच्यासाठी हॉटेलवाला ३००-३५० च्या वर काहीही खर्चत नाही, 
आणि तुम्ही ७०० रुपये दक्षिणा देऊन येता.

तेव्हा खवय्यांनो, बुफेचा पैसा खऱ्या अर्थाने वसूल करायचा असेल तर फक्त महागातले अन्न, पोटभर खाऊन यावे.

.....आणि तुम्हाला जर फक्त हौसेसाठीच बुफे खायचं असेल तर मग ५० रुपयांचे चाट खाऊन ८०० रुपये देऊन या !!!

कुणाचं काहीही जात नाही....!

------------------------------
सौ : व्हाॅट्स अप फॉरवर्ड

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...

 म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...


ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.

घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.

मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.

Thursday, December 8, 2022

भोजनासंबंधी काही विशेष

 आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....


*१. अजिर्णे भोजनम् विषम्*
आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.

*२. अर्धरोगहारी निद्रा*
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते.

*३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।*
सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.

*४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।*
लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात.

*५.अति सर्वत्र वर्जयेत*
कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे.

*६. नास्थिमूलम अनौषधाम।*
औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.

*७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।*
कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत.

*८. चिंता व्याधि प्रकाश्य।*
चिंता आरोग्याची वैरी असते.

*९. व्यायामच्छ शनैही शनैही।*
व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. High Intensity Workout आयुष्य कमी करते.

*१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।*
अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते.

*११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।*
 आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.

*१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।*
भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

*१३. नास्थि मेघासमाम थोयम।*
पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.

*१४. अजीर्णे भेषजम वारी।*
अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.

*१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।*
ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत. (नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी.)

*१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।*
एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात.

*१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि* .
पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, November 12, 2022

आपल ते सोनं पण ओळखणार कोण ? खोबरेल तेल

 आपल ते सोनं पण ओळखणार कोण?


👉 *खोबरेल तेल*

खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे! माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले ! कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ....! माझी तर तुम्हा सर्वांवर माया आहेच म्हणूनच तुमच्यासाठी ख़ास डॉ मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!!

"कोकोनट ऑइल"
गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे.

अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला.

अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची.

कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो.

डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.

इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.

ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले.

१९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला.

यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.

माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल. परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची, कातडी चरबरीत होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची. सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते.

सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मी ही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...