Showing posts with label विचारधन. Show all posts
Showing posts with label विचारधन. Show all posts

Wednesday, February 8, 2023

 *🌳आम्ही मध्यमवर्गीय असल्याचं अक्षम्य पाप!*🌹🌷🙏


*आता असं वाटू लागलंय की देशात फक्त मजूरच राहताहेत. बाकीचे जणू काय अगदी काजू, बदाम, किसमीस हादडताहेत!*

*आता हे मजुरांचं रडगाणं कृपया बंद करा. मजूर आपापल्या घरी पोहोचलाय. त्याच्या परिवाराकडे तर मनरेगाचं जाॅब कार्ड, रेशन कार्ड आहेच.*

*सरकार मोफत तांदूळ व पीठ देतेय. जनधन खातंवाल्यांना २००० रुपयेसुद्धा मिळालेच असतील व यापुढेही मिळतील.*

*आता जरा त्यांच्याबद्दल विचार करा ज्यांनी लाखो रुपये कर्ज घेऊन खाजगी काॅलेजातून इंजीनियरिंग केलंय आणि सध्या कुठल्या तरी कंपनीत ५ ते ८ हजारांची नोकरी करत होते. (मजुरांना मिळणाऱ्या मजुरीपेक्षाही कमी), पण नाइलाजास्तव टापटीप राहत होते.*

*ज्यांनी अलीकडेच वकिली सुरू केली होती. दोन-चार वर्षं तर जास्त खटले चालवायला मिळतही नाहीत. त्यानंतर कुठे चार-पाच हजार रुपये महिना मिळू लागतात; पण नाइलाजाने तेही आपल्या गरिबीचं प्रदर्शन नाही करू शकत आणि चार-सही वर्षांनंतर जेव्हा थोडीबहुत कमाई वाढते अर्थात दहा-पंधरा हजार होते तोपर्यंत लोन वगैरे घेऊन घर खरेदी करण्याची पाळी येते. कारण आपण मोठे झालोय, हेही दाखवावं लागतं. मग त्या घराचे हप्तेसुद्धा भरायचेच असतात की!*

*जे सेल्समन, एरिया मॅनेजर आहेत जे बॅगा घेऊन फिरतात त्यांच्या विषयीही जरा विचार करा की! बिचाऱ्यांना आठ हजार रुपए दरमहा मिळत असले तरी कधी अापल्या गरिबीचं प्रदर्शन नाही करत.*
 
*तसंच विमा एजंट सेल्स एजंट यांच्याविषयीही विचार करा जे हसतमुखाने दारोदारी हिंडत असतात. तुम्ही कार घेण्यासाठी एजन्सीत पोहचत नाही तोच, तुम्हाला कारसाठी लोन मिळवून देण्यापासून ते कारची डिलीव्हरी लवकरात लवकर मिळेपर्यंत स्मितहास्य करत टापटीप कपडे घालून हजर होतात. मोबदल्यात केवळ काहीच हजार रुपये; परंतु गरिबीचं रडगाणं नाही गात. उलट आत्मसन्मानाने जगतात.*

*कित्येक वकील, इंजीनियर, पत्रकार, एजंट, सेल्समन, छोटे-मोठे दुकानवाले, क्लार्क, शिक्षक, धोबी, सलूनवाले आदी मी पाहिलेत ज्यांची आतमध्ये भलेही चड्डी-बनियन फाटकी असेल; परंतु आपल्या गरिबीचं प्रदर्शन नाही करत कधीच.*

*यांच्याकडे तर ना मोफत धान्यासाठी लायक शिधापत्रिका आहे ना जनधन खातं. इतकंच काय तर गॅस सिलिंडरची सबसिडीही त्यांनी सोडलीय! वर दुचाकीचे हप्ते, घराचे व्याजासहित हप्ते द्यायचे आहेतच!*

*मुलांची शिक्षणाची दोन-तीन महिन्यांची फी ती विना शाळा-कॉलेजात जाताच भरायचीय. त्या पैशात कुटुंबासाठी आरामात एक महिन्याचं तरी अन्न येऊ शकेल; परंतु गरिबीचं प्रदर्शन न करण्याच्या त्याच्या सवयीने सरकारी शाळा व रुग्णालयांपासून त्याला दूरच केलंय.*

*त्याचप्रमाणे टायपिस्ट, स्टेनो, रिसेप्शनिस्ट, ऑफिस बॉय, असा एक वर्ग आहे. आता हा वर्ग काय करेल? तो तर फेसबुकवर अापलं दु:खही मांडू शकत नाही. तोही गरीब सिद्ध होत नाही ना!*

*असाच आणखी एक गट जो देवळं-मंदिरात व घरोघरी धार्मिक विधी करून देत आपली उपजीविका करतोय. लाॅकडाऊन मुळे भक्तगणांची उपस्थिती व उत्पन्न नगण्य झाल्याने मंदिर ट्रस्टही मानधन धड देत नाहीय. त्यामुळे सर्वांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देणाऱ्या पुजाऱ्यांच्या मुलांचं सामान्यपणे जगणं मुश्किल झालंय, हे कोणीच पाहत नाहीय.*

*इतरही अनेक गट आहेत जे मध्यमवर्गात मोडतात नि त्यांचंही सध्याच्या दिवसात खर्च भागवताना कंबरडं मोडलंय!*

*आता स्थलांतरित मजुरांचा विषय तर चांगलाच गाजलाय. मात्र, मजुरांच्या नावाखाली राजकारणी आपलीच पोळी भाजून घेताहेत!*

*कोणाला हे माहीत आहे का की, IAS, PSC होण्याचं स्वप्न उराशी बाळगत रात्र-रात्र जागून अभ्यास करणारा विद्यार्थी तर खूपच आधी दिल्ली व इंदूरहून घरी पायी निघाला होता तेही आपली खरी ओळख लपवत मजुरांच्या वेशात! का नाही ते आपल्या गरिबीचं प्रदर्शन करत?*

*खरंच देशाचा मध्यमवर्गीय देखील असं करू शकला असता तर!*

 *माझ्याशी असहमत असलेल्यांचंही स्वागत!*

*सरकारने अापल्या कमाईचे मात्र सर्व पर्याय खुले केलेत!*
*१. दारू विक्री सुरू*
*२. गुटखा विक्री सुरू*
*३. पेट्रोल पंप सुरू (तेही पूर्ण दर आकारून)*
*४. आरबीआयचे व्याज सुरू*
*५. ऑनलाइन मार्केट सुरू*
*६. डीडी नॅशनल सुरू*
*७. सर्व विभागांचे कर लागू (भूमी कर, परवाना देयक इ.)*
*८. वीज देयक सुरू* 

*जे कुठलाही कर देत नाहीत त्या गरीबांना सर्व काही मोफत.*
*१. काेरोना चाचणी मोफत*
*२. धान्य मोफत*
*३. मनरेगा लागू (नव्या दरांसह)*
*४. गॅस सिलिंडर मोफत*
*५. विनाकाम मजुरी लागू*

*मध्यमवर्गीय सर्वच ठिकाणी दबतोय कारण तो याचसाठी जन्मलाय!*
*१. सरकारची देयकं अदा कर.*
*२. मुलांच्या शिक्षणाची फी भर.*
*३. सर्व परवान्यांची देयकं भर.*
*४. दुकान, उद्योगधंद्यात कर्मचाऱ्यांना बिनाकाम पगार दे.*
*५. दुकान न उघडताच भाडं, वीज देयकं भर.*
*६. बँकेला पूर्ण व्याज नाही दिलंस तर तो अतिरिक्त भार झेल.*
*७. सरकारला मदतस्वरूपात दान दे.*
*८. आसपासच्या गरजवंतांना भोजन, सामान इ. मदत कर.*
*९. तुझ्या बचतीवरचं व्याज कमी केलंच आहे.*
*१०. धंधा करायचाच असेल तर सरकारी नियमांचं पालन कर.*

*चाळीस दिवस सरकारकडे कर नाही आला तर सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाहीय आणि जणू मध्यमवर्गीयांकडे पैशाचं झाडच लावलंय! त्यांनी करही भरायचा, भाडंही भरायचं, पगारही द्यायचे, शाळा-कॉलेजांची फीसुद्धा भरायची आणि आपलं घर-कुटुंबही सांभाळायचं.*

*खरंच ज्यांना हा लेख मनापासून आवडेल, समजेल त्यांनी तो नक्की सर्वत्र पाठवा. मध्यमवर्गाचं हे न उलगडणारं कोडं यातून काही सुटेल, असं वाटत नाही; पण किमान ते त्यांच्यापर्यंत पोहचू तरी देत!*

*हा लेख न पटल्यास कोणतंही दु:ख नाही. कारण आता मध्यमवर्गाला याची सवय झालीय!*

*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹A

 *🙏🌹🌻आपलीच माणसं पण अशी कां वागतात?* 🌹🌻🙏 

:ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
 *🌻आपली माणसे आपल्याच माणसांची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।*
*नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते सर्व बोलतात ।* *समोर दिसले की खोटी स्तुती करतात | मागे वळलीकी टिका करतात |*
*गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻आवडली मुलगी म्हणून लग्न करतात ।* 
*थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात ।* 
*जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात ।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात । सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।* 
*पत्नी असली सुंदर, तरी बाहेर लफडी करतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻लोकांच्या समोर थोरांच्या पुण्याईने,भले झाले म्हणतात । त्यांचीच निंदा दुसऱ्यांकडे करतात* 
*आई वडील जिवंत असले कीं, रागराग करतात ।* 
*मृत्यूनंतर त्यांचे, सारे गुणगान व सोपस्कार करतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात । चांगले चालले असले कीं, मनातून जळतात ।* 
*मात्र "ऐकून बरे वाटले" असे वर वर खोटे का म्हणतात? ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻पाहुणा कोणी आला कीं, "या बसा" म्हणतात । 'काय काम काढलं ' म्हणून हळूच विचारतात । येण्याच्या आनंदापेक्षा - जाण्याची वाट पहातात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात ।* 
*इतरांच्या कामी यावे असे नेहमीच सांगतात ।* 
*आणि त्यांच्याकडे कुणी कांही मागितलं कीं, असून नाहीं म्हणतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻कुठलाही काही उसने मागतात ।* 
*चार दिवसांत " आणून देतो" म्हणतात ।* 
*एकदा घेऊन गेलें कीं तोंड काळे करतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻गया वया करून, उसने मागतात ।* 
*वेळेवर परत देण्याचा " वायदा " करतात ।* 
*एकदा काम झालें कीं, विसरून जातात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

 *🌻समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात ।* 
*नेहमीच आठवण येते "वर वर म्हणतात " आणि मागे टिका करतात ।*
*पत्र,अथवा फोनचा, खर्च येतो म्हणून बोलणे मात्र टाळतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻कुणी कधी विचारलं तर,घेत नाहीं म्हणतात । फुकटची मिळाली की,भरपूर पितात ।* 
*जेवायचं असलं तरी,भूख नाहीं म्हणतात आणि जेवताना पोटभर जेवतात।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻माणूस कोणी मेला कीं गळा काढून रडतात । गोडवे त्याच्या मोठे पणाचे तोंड भरून गातात ।* 
*मात्र त्याच्या हयातीत,ते नेहमी शिव्याच घालत असतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात...!!!*
          
*🌻आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*🌻आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 🌺

*एक गोष्ट लक्षात ठेवा,*
*वेळेकडे एवढा वेळ नसतो की,*
*वेळ पुन्हा तुम्हाला वेळ देईल.*
*म्हणुन श्रीमंतीला सलाम,*
*आणि गरिबीला गुलाम करण्यापेक्षा,*
*माणुसकीला प्रणाम करा.*
*हाच आपल्या खऱ्‍या,*
*जीवनाचा सन्मान होईल.*
*व वेळ म्हणजे काय ते कळेल.*
*पृथ्वीवर दानासारखे,*
*इतर काहीही सत्कृत्य नसते,*
*लोभासमान दुसरा कुणीही शत्रू नसतो,*
*शीलासमान अन्य काही दागिना नसतो,*
*व संतोषी वृत्ती समान,*
*अन्य काही संपत्ती नसते.*
*जी व्यक्ती परिस्थितीला अनुरूप असे बोलते,*
*चांगल्या भावनेसह सद् वर्तन करते,*
*आत्मशक्तीला झेपेल एवढाच क्रोध करते,*
*त्या व्यक्तींची कधीही,*
*अधोगती होत नाही...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...