Tuesday, August 23, 2022

जैन समाजाचा आदर्श घ्या

 *बीड़ जिल्यातील एका मराठी मानसाने जैन समाजाचे केलेले बारीक निरीक्षण व परखड मत ...*




 परवा सिए.चा निकाल लागला. बीड मधिल सहा च्या सहा विद्यार्थी मारवाडी जैन समाजाचे होते.
*अत्यंत छोटा समाज.*
 कधीही आरक्षण मागीतले नाही. कसलीही मागणी नाही, 
नोकरीचा हट्ट नाही, 
अनुदानाची अपेक्षा नाही, 
सवलतीची भीक नाही, 
कधीही कसलेही आंदोलन नाही, उपोषण नाही....

*जैन समाज सेवाभावी व हिमंतबाज स्वाभिमानी समाज*
💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏

हा समाज सतत सदा आरोग्य विषयक, सेवा विषयक, अध्यात्मिक विषयक, सामाजिक विषयी शिबिरांचे आयोजन करत असतो. 
कोणत्याही सणांचे उदात्ती करण नाही. 
बीभत्स पणा नाही, 
नाच धिंगांना नाही, 
झेंडेबाजी नाही, आरडा ओरड नाही.
हाती आलेला पैशाचे प्रदर्शन नाही, दिखावा नाही, 
अरेरावी मग्रुरी माज नाही. 

*प्रत्यक्षात जैन धर्म व हिंदु धर्म प्रचंड वेगळा*
 पण जैनांनी कधी हिंदु देवतांचा महंताचा संताचा अवमान केला नाही, उलट सन्मानच केला. 
अन्नछत्रे चालवतात, 
सेवाभावी दवाखाने चालवतात, जयपुर फुट बसवतात, 
दिव्यांगांना पायावर उभे करतात. 
धंदा व्यवसाय करताना मनलावुन प्रचंड मेहनत, काटकसर व वेळ पाळुन काम करतात, एकमेकांना टोकाचे सहकार्य करतात. गळालेल्यांना हात देतात सोबत घेतात ,
कुणी कुणाला कमी लेखत नाही, हलकेभारी समजत नाही ,
उचनीचता दाखवत नाही, 
भांडण तंटे नाही न्यायालयात वाद नाही, 
सरकारशी फारसे मतभेद नाही, मागणीच नसल्याने वाद उद् भवतच नाही. 
 सरकारी योजनांच्या लाभाकडे लक्ष नाही. 
मोफत फुकट मिळवायची वृत्ती नाही. आयतं बसुन खाण्याची मनशा नाही. 
घरांत बसुन राहण्याची सवय नाही. कामं सोडुन सण व सोयरे कार्यक्रमाची ओढ नाही......
 समजण्यापुरते हिशोबा पुरते शिक्षण बस. 
 ३० -३० वर्ष शिकन्यातच वाया घालत नाही. कोणत्याही व्यवसायाची लाज नाही.
  *मनावर घेतलं तर मिळवल्या शिवाय राहत नाही.*
 केवळ या सद्गुणांमुळे हा समाज आर्थिक दृष्ट्या ब्राम्हणां पेक्षाही १०० वर्ष पुढे आहे.
  वादात पडुन फंदात अडकत नाही, त्यामुळे मानसिक ताण नाही, जीवन कसे आनंदात व्यतीत होत आहे.
    आज सहा मुलांनी सीए त उत्तुंग यश मिळवले *कुणी रोखले होते मराठ्यांना* कुणी रोखले होते बहुजनांना .......
*नुसतं बोबंलून काही मिळत नाही.*
  डिजे पुढे नाचू नाचू कमरा बारीक झाल्या, ओरडु ओरडु म्हणजे घोषणा देवू देवू आवाज बसला गळे घोगरे झाले. 
वरातीत नाचु नाचु चड्ड्या सुटल्या 
कधी दिसला का मारवडी मिरवणुकीत. 
आरक्षणाची वाट पहाता पहाता औक्षण करायची वेळ निघुन गेली, पाहूणे पहायला यायची बंद झाली.
 न नोक-या ना छोक-या टोक-या उचलायची लायकी नाही राहीली.
 आज ही प्रयत्न मेहनत केली तर उज्वल यश मिळु शकते हे मारवाडी विद्यार्थ्यांनी दाखवुन दिले आहे. 
 सतत रडुन चालत नसते, लोक श्रीमंत कसे होतात, काय करतात कसे वागतात हे अभ्यासले पाहीजे, आम्ही गरीब आम्ही पिडीत हा रडकेपणा सोडला पाहीजे. धनवान गुणवान सामर्थ्यवान बनलेच पाहीजे. 
     चापलूसी भडवेगीरी चमचेगीरी चाटुगीरी व हिरोगीरी बंद करुन बेरोजगारी खत्म करावी.
दिशा मार्ग सगळ्यांसाठी खूलेच आहेत 
रेंगाळत बसू नका.  
युवकांनो पुढे या दिशांच काय अवकाशच शरण येईल.
*जय जिजाऊ*
*जय शिवराय*
🙏🙏🙏🙏🙏

Friday, August 19, 2022

एक दुःखद सत्य

 खूपच अप्रतिम...ज्याने कुणी ही कविता लिहिली त्यांना सलाम.!🙏

*एक दुःखद सत्य :😢👍*

*विद्यालयाच्या जागेपायी*
*कुणीच इथं भांडलं नाही*
*अन्..देवालयाच्या जागेसाठी*
*रक्त इथं कमी पडलं नाही..*

              *माझाच देव मोठा म्हणण्यात*
              *रक्ताच्या नद्या वाहील्या*
              *ज्ञानगंगा कोरडी पडत*
              *ओसाड शाळा झाल्या...*

*शाळा अजुनही तशीच*
*पडक्या,तुटक्या भिंतीची*
*गरीब माझ्या देशामधी*
*उभी मंदिरं सोन्याची...*

*धर्मासाठी , पैशांसाठी*
*अनेक आंदोलने पाहिली*,
*पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही*,

             *शाळे मधली दानपेटी*
             *भरलेली कधी पाहिली नाही*
             *अन् मंदिराची दानपेटी*
             *रिकामी कधी राहिली नाही...*

*शाळेतला पालक मेळावा*
*पालकांवाचून राहून गेला*
*देवालयात चेंगराचेंगरीत*
*माणुस मात्र तुडवून मेला...*

                 *विद्येचं ज्ञान देऊन*
                 *गुरूजी गरीबच राहीला*
                 *अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन*
                 *पुजारी धनवान झाला...*

*खरंतर धर्म नावाचं पुस्तक* 
*शाळेत कधीच उघडत नाही*
*अन् धर्माच्या नावाशिवाय*
*देशात पानही हालल नाही...*
              
                   *✍ अनामिक*

--पत्त्याची गम्मत--

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किलवर किंवा किल्वर आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. 

       पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.

1) 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे
2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. 
प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.
3)या सर्व पत्त्याची बेरीज 364
4)एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.
5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.
6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते
     म्हणजे 12 महिने
7) लाल आणि काळा रंग म्हणजे
      दिवस आणि रात्र.

   पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
2)तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि 
    महेश
3) चौकी म्हणजे चार वेद
     (अथर्व वेद, सामवेद, ऋग्वेद,अथर्ववेद)
4) पंजी म्हणजे पंच प्राण
    (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)
5)छक्की म्हणजे षड रिपू
   (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, 
    लोभ)
6)सत्ती- सात सागर
7)अटठी- आठ सिद्धी
8) नववी- नऊ ग्रह
9) दसशी- दहा इंद्रिये
10) गुलाम- मनातील वासना
11)राणी- माया
12) राजा-सर्वांचा शासक
13) एक्का- मनुष्याचा विवेक
14) समोरचा भिडू - प्रारब्ध

 पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

"महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन"

 1 मे "महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन". त्या निमित्ताने आपल्या मराठीचे आजचे स्टेटस पाहुया ....


संगणकीकरण व माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक संवाद माध्यमे इंग्रजीतूनच असल्यामुळे इंग्रजी हे अर्थार्जनाचे एक साधन झाले आहे. जागतिक स्तरावर ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचे महत्व अजुनही वाढत आहे. परिणामत: मराठीचा विकास अडखळला. खासगी शाळा कॉलेजात सध्या मराठी कशीबशी तग धरून आहे. मराठीचे स्थान राज्यातील व देशातील सर्व माध्यमात मजबूत करणे जरुरीचे आहे. अर्थातच त्यामुळे मराठीची इंग्रजीशी जोरदार स्पर्धा सुरु आहे.

अ) मराठी भाषा ही ९व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. या दोन राज्यात गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी व जगात 4थ्या क्रमांकाचे शहर आहे. मराठी बोलणाऱ्याच्या लोकसंख्येनुसार भारतातील प्रमुख भाषांत मराठी तिस-या क्रमांकावर आहे. 

मराठी भाषा लिहायला ४८ मुळाक्षरे/वर्ण (Marathi Alphabets ) आहेत. त्यात तीन प्रकार आहेत :-
□ व्यंजने 34, □ -हस्व + दीर्घ स्वर 12 □ दीर्घादी 2

मराठीतील साहित्य व ग्रंथसंपदा मुख्यतः ज्ञानेश्वरी, दासबोध व तुकाराम महाराजांच्या गाथा/अभंगवाणी यांना जगप्रसिद्ध वाङमयाचे स्थान आहे. मान्यवर लेखक अत्रे, फडके, खांडेकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, पुल देशपांडे, विन्दा करंदीकर, वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज आदींनी त्यात बहुमोल साहित्याची भर घातली आहे. संत ज्ञानेश्वरांनी "अमृतापेक्षाही गोड" असे मराठी भाषेचे कौतुक ही केले आहे.

तथापि मराठीला काही मर्यादा आहेत. इंग्रजी ही जागतिक भाषांत तिस-या क्रमांकावर आहे तर मराठी पंधराव्या क्रमांकावर. दर प्रांता नुसार मराठीचा हेल, लकब व शब्दांचे उच्चार बदलतात. यात मुख्यत: पुणेरी, कोल्हापुरी बंबईया, व-हाडी, खानदेशी, कोंकणी, मालवणी. आणि नागपुरकर तर बहुतांशी हिन्दी मिश्रित मराठीत बोलतात.

ब) इंग्रजी ही "ज्या राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही" असा भूतकाळ असलेल्या इंग्रजांची भाषा आहे. ती चौदाव्या शतकापासून प्रचलित आहे. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपीयर(एप्रिल 1564) यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 एप्रिल हा 'इंग्रजी भाषा दिन' म्हणुन सर्व जगात साजरा होतो. गेल्या पाचशे वर्षापासून शेक्सपीयर व त्यांच्या नाट्यसाहित्याची जगात वाहवा होत राहिली आहे. 

केवळ 21 व्यंजने व 5 स्वर अशा 26 मुळाक्षरात बंदिस्त असलेली ही भाषा लिहायला खूप सोपी व टाइप करायला सुटसुटित आहे. जागतिक स्तरावर जास्त बोलल्या जाणा-या भाषांत चिनी प्रथम, स्पॅनिश द्वितीय तर तृतीय क्रमांकावर इंग्रजी आहे. अधिकृत दुसरी भाषा इंग्रजी असणा-या देशात प्रथम अमेरिका तर दुसरा भारत. 

पण पण...
नोबेल पारितोषिक विजेता जॉर्ज बर्नार्ड शॉ याच्या मते : England and America are two countries separated by the same language' असा एक ठपका इंग्रजी भाषेवर पडला आहे. खेळीमेळीच्या वादात पुणेरी मराठी हीच शुद्ध मराठी असा मुद्दा असतो अगदी तसच इंग्लंडवासीयांचीच इंग्रजी शुद्ध असा मुद्दा अनेक पुस्तके व भाषणातुन अजुनही मांडला जातो. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल ? ....
यासाठी संशोधन करायला 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. 2013 साली या समितीने आपला अहवाल केंद्राकडे सुपूर्त केला. आपली भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे.

आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भारतीय भाषा..
तामिळ (2004)
संस्कृत (2005)
कन्नड (2008)
तेलुगु (2008)
मल्याळम (2013)
ओडिया (2014)

मराठी ही ज्ञानभाषा पण व्हायला हवी..
मराठी ग्रंथवाङमय हे अध्यात्मिक ज्ञाना बरोबर हजार-एक वर्षापासून भौतिक ज्ञानाची मौल्यवान खाण आहे. विशेषत: संत ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम महाराज, व समर्थ रामदास (दासबोध व मनाचे श्लोक) यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेल्या दृष्टांतात अध्यात्माला विज्ञानाचा पाया दिलेला आढळतो. मुख्यत:
1. पृथ्वी गोल आहे.
2. ग्रह तारे यांची अंतरे व गती (पंचांग व ज्योतिष).. खगोलशास्त्र 
3. पदार्थ व अणू रचना.. फ़िजिक्स
4. ढग व पाऊस-वारे झाडे हे सृष्टीविज्ञान 
5. अध्यात्मामधून मानसशास्त्र

समर्थ रामदास स्वामी म्हणतात ..
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”
“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

 नॉन क्रिमी लेअर आणि अन्याय !

        सरकारी नोकर्यां मधील आरक्षण संदर्भात अमागास महिलांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे धोरण अत्यंत अन्यायकारक स्वरुपाचे असून मराठा व मन्य संघटनांच्या ते लक्षात आलेले दिसत नाही . आयोगाने हे नवे धोरण महाराष्ट्र शासनाच्या १९९३ च्या . सरकारी नोकर्यात 30% आरक्षण महिला धोरणाला हरताळ फासते .
आयोगाच्या या नियमावलीने अमागास विवाहीत मुलीना महिला धोरणाचा कसलाही ला भ होण्याऐवजी तो नुकसानकारक व त्यांच्यावर अन्यायकारक आहे. कायद्यापुढे समानता या मूलभूत हक्काला बाधा निर्माण करणारा आहे .
     काय आहे नियम हे पहा.
• ओबीसी प्रवर्गातील विवाहित वा अविवाहीत मुलींसाठी आपल्या पालकांचे आईवडीलांचे उपन्न नॉन क्रिमी लेअर साठी ग्राह्य धरण्यात येईल . पण विवाहीत अमागास ( मराठा, ब्राम्हण, वाणी, ऊच्च वर्णीय मुस्लीम)मुलींसाठी महिलांसाठी पतीचे उत्पन्न नॉनक्रिमी लेअरसाठी ग्राहय धरण्यात येईल .
हा बदल २०२० नंतर केला आहे . (१९९३ ते २०१९ पर्यंत ओबीसी आणि ओपन अमागास विवाहित अविवाहित महिलांसाठी समान निकष होता .)

* आ ही अटतर भयंकर आहे. की ओबीसी उमेदवारांसाठी नॉन क्रिमी लेअर काढताना जर आई वडील सरकारी नोकरीत असतील तर त्यांचे वेतन उत्पन्न ग्राह्य धरता येणार नाही . म्हणजे एखाद्या ओबीसी वा अमागास शासकीय कर्मचार्‍यास पगार वार्षिक १५लाख जरी असला तरी त्याचे उतन्न शून्य होय . तेच जर अमागास खाजगी नोकरीत असेल तर त्याचे जे काही पगार वार्षिक उत्पन्न आठ लाख एक रुपया जरी असले तरी त्या ला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळणार नाही ... कसला टेरिफिक विषमता आहे . कुणी केले हे असले डिसक्रिमीनेटरी नियम .. ? 
               या नियमांचा अंमल होण्या पूर्वी प्रमाणे NCL चे नियम सर्वांना समान करावेत . जेणेकरून अमागास विवाहित माहिलांवर अन्याय होणार नाही . .

गांधी ,नेहरूंची भूत मरत का नाहीत ?


गांधी देहाने मरून ७३ वर्षे झालीत , नेहरू मरून ५७ वर्षे झालीत. 

आजच्या देशातल्या आणि परदेशातल्या कुठल्याही नेत्याने कळत्या वयात त्यांचा कार्यकाळ पाहिलेला नाही, किरकोळ अपवाद वगळता. तरीही त्या दोघांची भूत पिच्छा सोडत नाहीत. एवढ काय आहे गांधी नेहरूंनी मानगुटीवर बसाव अस ? 

गांधी तर फाटका पंचा नेसून वावरणारा मनुष्य पण त्याची दखल अजूनही का घ्यावी लागते ? 

भारताच्या आधीही अनेक वसाहतींनी स्वातंत्र्य मिळवायला संघर्ष केला, नंतरच्या काळातही केला. अनेक देशांचे तुकडे झाले, अनेक देशांनी साम्राज्य वाढवायला लढाया केल्या. 
बंदुकांनी, तलवारी घेऊन केलेल्या लढाया लौकिकार्थाने कुणीतरी जिंकल्या असतीलही मात्र ते देश हरले, आपल्याच भवताली राहणाऱ्या आपल्याच सारख्या माणसांच्या प्रेतांच्या राशीवर उभी राहिलेली साम्राज्य कुणालाही सुखी समाधानी करू शकली नाहीत ना न्याय देऊ शकली. 

अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रह्मदेश, आफ्रिकेतील अनेक देश रशिया, जर्मनी, कुठलंही उदाहरण घ्या, जगातल्या सगळ्या खंडात हीच स्थिती आहे.

गांधीबाबाने वापरलेली अहिंसा आणि असहकार हि शस्त्र सोबतीला घेऊन मंडेला लढले.

जिथे जिथे गांधींच्या विचारांनी आंदोलन केली गेली तिथे नंतरच्या काळात स्थैर्य लाभल्याच दिसत. मात्र बंदुकीच्या जोरावर निर्माण झालेल्या देशात प्रदेशात असुरक्षितता आणि भीती कायमच राहिली. 

द्वेष आणि हिंसेच्या पोटी सूड जन्माला येतो, सूडाचा प्रवास अंतहीन असतो, त्या जमातीने देशाने आमचे पाच मारले तर आम्ही त्यांचे दहा मारू, मग त्यांनी पुन्हा आमचे वीस मारले कि आम्ही पन्नास मारू हि साखळी अंतहीन असते. 

"An eye for eye ,makes the whole world blind"

हे गांधीबाबाने समजून घेतल , पराकोटीची विषमता असलेल्या देशात, एकीकडे गावातला जमीनदार शेकडो एकरांचा मालक आणि त्याचा मजूर मात्र भूमिहीन हि विषमता असलेल्या देशात बंदुकीने स्वातंत्र्य मिळाल तर याच बंदुका आपल्याच लोकांवर धाक दाखवायला रोखल्या जातील याची भीती आणि खात्री असल्याने गांधीबाबाने अहिंसेचा मंत्र दिला. मुठभर लोकांनी लढाया करायच्या आणि बाकीच्यांनी प्रेक्षक म्हणून तमाशे पहायचे या मानसिकतेमधून देशाला बाहेर काढून स्वातंत्र्य आंदोलन सर्वसामान्य माणसांच्या सहभागाने मोठ, परिणामकारक केल ते गांधीबाबाने. 

जास्तीत जास्त लोकांकडून कमीतकमी त्यागाची अपेक्षा हे सूत्र ठेवून आंदोलन चालल म्हणून सगळ्यांना देश आपला वाटला, आंदोलन आपल वाटल. 

हे जगभरातल्या देशांना उत्तम कळत म्हणूनच गांधीबाबाच भूत द्वेषाची पेरणी करणाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेल असत. 

स्वातंत्र्य मिळताना तांत्रिक पातळीवर असलेली मागास अवस्था, अन्नधान्य उत्पादन आणि लोकसंख्या यामधली दरी, बहुतांशी वस्तूंची आयात अश्या स्थितीत मिळालेला देश चालवताना नेहरूंनी प्रयत्नवादाची कास धरली, दैववादाची नव्हे. देश मार्गाला लागला आणि तोही शेजाऱ्याच्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाला. 

लोकशाही प्रजासत्ताक स्विकारून आपण बरोबर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानपेक्षा वेगळी वाट धरली. परिणाम म्हणजे इथ लोकशाही रुजली, नांदली आणि गेली सत्तर वर्षे १९४७ च्या तुलनेत देश हळूहळू का होईना एकेक पाउल पुढे गेला. ७२ वर्षात निम्म्यापेक्षा जास्त काळ लष्करी राजवट असलेला पाकिस्तान, आपल्याच धर्माचे लोक असले तरीही भाषेच्या मुद्द्यावर तुकडे होऊन निर्माण झालेला बांगलादेश आपल्याला ठळकपणे लोकशाहीच महत्व सांगतात. 

हा वारसा, हे संचित या दोघांनी मागे ठेवल आणि हे सगळ्या जगाला उत्तम ठाऊक आहे. 

म्हणूनच गेली ७२ वर्षे प्रच्छन बदनामी करून, बायकांच्या सोबतचे, सिगरेट ओढ्तानाचे फोटो व्हायरल करून, कुजबुज मोहिमा राबवूनही आणि ७२ वर्षापूर्वी थेट छातीत गोळी घालूनही हे गांधी नेहरू मेले नाहीतच उलट त्यांची भूत मानगुटीवर बसलेली आहेत. 

कर्तुत्व या निकषावर कोरी पाटी असलेल्या लोकांना आपली रेघ मोठी करायला दुसऱ्याची रेघ खोडणे एवढाच पर्याय कळतो नव्हे तेवढीच त्यांची अक्कल आणि कुवत असते. 
आणि अशी दुसऱ्याची रेघ मोठी करायला गेल कि परदेशात जाऊन मग हि गांधी नेहरूंची भूत समोर उभी राहतात. 
जगाने धडा घेतलेला आहेच, प्रश्न आपण धडा कधी शिकणार हा आहे. 

द्वेषभक्ती, द्वेषप्रेम अंतिमतः आपल्याला खड्ड्यात घालणार आहे हे आकलन झाल तरीही स्वार्थ साधायला त्याचेच मळे पिकवावे आणि फुलवावे लागणार आहेत. 

हे द्वेषाचे, कर्तुत्वशून्य कारभाराचे मळे जोवर पिकवले आणि फुलवले जातील तोवर गांधी नेहरूंची भूत मानगुटीवर बसणार हेही नक्की.

मरते है हम तुम, गांधी कभी मरते नही !!

आयडिया_ऑफ_इंडिया
Anand Shitole

*आताच्या पिढीतील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या 

आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे*


लिसन माझ्या सोन्या बाळा
केव्हाच झाली मॉर्निंग 
वेक अप फ्रॉम द बेड आता  
शेवटची ही वॉर्निंग

छानपैकी ब्रश कर 
चमकव तुझे टीथ 
स्मॉल थिंग समजू नकोस 
त्यातच तुझं हित

हॉट हॉट मिल्क केलंय 
घालून बोर्नव्हीटा 
या ड्रिंकने सहज फोडशील 
हाताने तू विटा

वन ग्लास ट्वाईस घेताच
व्हीटामीन्स मिळतील मेनी 
थोड्याच दिवसात तुही 
होशील महेंद्रसिंग धोनी

मॅथ्सवाल्या टीचरला त्या
विचार सगळ्या क्वेरी 
पाठ कर लंच ब्रेकला 
मराठी लॅंग्वेज स्टोरी

स्कूल फिनिश करून इव्हला 
होम झटपट गाठ 
येता येता बसमध्येच 
फ्रेझेस होऊं दे पाठ

ग्रॅंडपाच्या बर्थ डेची 
आहे नाईट ला पार्टी 
असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये 
ग्रो होतात कार्टी !

*मराठी* च्या स्पीकिंगचेही लावू तुला कोर्स, 
शोधलं खूप *टाईम्स* मध्ये पण सापडला नाही सोर्स !
===================================


 *"ती"*

ती अशी उंचावता,
नभ जरासे वाकले
पसरली ज्योत्स्ना तिची,
अन चंद्र तारे झाकले ।।

गवसणी झाली आभा,
ते तेज इतके फाकले
स्वर्णिमा तो स्पर्शण्याला,
कर रवीने टाकले ।।

झेपली उत्युंग जरी ती,
पायी दारी राखले
कवळीले ब्रम्हांड तिने,
हो, मागु नका दाखले ।।

*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....*❤️🌹

 पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही.

ना पैसा, ना शेती, ना नौकरी, ना चाकरी...

टप्पा १:- १९५० ते १९७५

या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. 
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक... 
मोठे वाडे...  
दांडगा रुबाब... 
निसर्गावर चालणारी शेती... 
अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे. 
अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले. 
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती. हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता. 

टप्पा २ :- १९७५ ते १९९५ 

देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली. 
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले. 
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले. 
शेती आता भांडवलदाराची होऊ लागली. विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या. 
पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली. 
राजकारण गावागावात घुसलं, पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या, बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले. 
स्पर्धा वाढली, आता नोकरी सोपी राहिली नाही. 
हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला. 
वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली. 
२० एकराचा मालक मोकळा झाला. गावच्या कट्ट्यावर बसून विड्या फुंकू लागला, त्याची पोरं बेकार फिरू लागली. 

टप्पा ३ :- १९९५ -२००९ 

हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ. 
परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले. 
मोठे उद्योग यांनी काबीज केले, हॉटेल सिंधी, शेट्टी, राजस्थानी लोक, दूध-पेपर-भाजीपाला-टॅक्सी-पाणीपुरी-किरकोळ दुकानदारी उत्तरेतील लोकांनी काबीज केली. 
सहकारी कारखाने, बँका, पेट्रोलपंप, बिअरबार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली. 
मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडतो... 
बोअर मारतो... 
स्पर्धा परीक्षा तयारी... 
भरतीला जातो... 
पोराला हायस्कुल वर चिटकवतो... 
ह्यातच गुंतलेला दिसला. २० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते. 
अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता. 

टप्पा ४ :- २००९ ते २०२०  

ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले. 
पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या. 
मग काय ? 
जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली. 
राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला. 
जमीनदारी संपली... 
पोरं बेकार... 
पुणे-मुंबईत ८ - १० हजारांच्या नोकऱ्या करू लागली. 
आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही. 
खरी, बिकट गरिबी सुरु झाली. 
पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला. 
गावचा जमीनदार हमाली करू लागला. 
व्यापार तृतीय म्हणायचे. त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर, मुनीमकी अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करण्यासाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.. 

टप्पा ५:- २०२० ते २०३०

इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल. ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार... 
नोकरी हा विषय संपला आहे !!!!
नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल. 
उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल. 
पैसा न कमविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही. 
शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.

म्हणून मराठी तरुणांना विनंती आहे अजून वेळ गेली नाही. शेती सांभाळा. शेती बरोबर जोडधंदे करा, नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.....

जो चूक करतो तो माणूस... 
तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... 
जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... 

           आता वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्या चूका पुन्हा होणार नाहीत हे पाहण्याची..

*लेख: लग्नाआधीची (प्री विडिंग)फोटोग्राफी योग्य की अयोग्य?*



आपल्या समाजात लग्नाआधीच्या (Pre Wedding )फोटोशूटचा मोठा ट्रेंड चालू झाला आहे.तो गेल्या तीन चार वर्षांपासून हा ट्रेंड समाजात झपाट्याने पसरत आहे. प्री वेडिंग फोटोशूट सुरू होण्यामागचे कारण खूपच रंजक आहे. उदाहरणार्थ घरातील सजावट सुंदर दिसावी म्हणून आपल्या घराच्या छोट्या हॉलमध्ये इतके दिवे लावले जातात की आपल्याला इतक्या दिव्याची आवश्यकता सुद्धा नसते.त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यानी श्रीमंत लोकांना काही नवीन कार्यक्रम सांगण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट सुरू केले. ज्याप्रमाणे आपल्या घराच्या छोट्याशा हॉलमध्ये एवढ्या दिव्यांची गरज नसते, त्याचप्रमाणे लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात अशा प्री विडिंग सारख्या कार्यक्रमांची खरंच गरज असते का?

*लग्नापूर्वीचे फोटोशूट (प्री विडिंग)म्हणजे काय?*

 वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाआधी छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन सुंदर लोकेशनला फोटोशूट करून घेतात. अनेक फोटो असे काढले जातात की वधू आणि वर एकमेकांच्या मिठीत गुंडाळलेले असतात. कधी कधी नववधू किमान (छोट्या) पोशाखात असतात. लग्नाच्या दिवशी मोठा स्क्रीन लावून ही प्री विडिंग फोटोग्राफी दाखविल्या जाते. आपण कोणाच्याही लग्नाला साक्षीदार होण्यासाठी जातो आणि वधू-वरांना त्यांचा जीवनसाथी होण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जात असतो. कल्पना करा की तुम्ही कोणाच्यातरी लग्नाला गेलात आणि तिथे मोठ्या पडद्यावर वधू आणि वर आधीच एकमेकांच्या मिठीत गुंडाळलेले आहेत... मग हे दृश्य पाहून तुम्हाला कसे वाटेल? इथे नातेवाईक आप्तेष्टांना असे वाटेल की या लोकांना आमचे लग्नात साक्षीदार होण्याची गरज नाही... मग आम्हाला लग्नाला बोलावले तरी का? कारण आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नापूर्वी असा मोकळेपणा मान्य नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे.

*लग्नाआधीचे फोटोशूट हा समाजात घातक आजार का आहे?*

 हे फोटोशूट करण्यासाठी १ ते ५ लाख रुपये खर्च येतो. या फोटोशूटला परवानगी देणारे म्हणतात की लग्न आमच्या मुलांचे आहे…पैसे आमचे आहेत…म्हणून आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी ५ लाख रुपये खर्च केले तर चुकीचे काय? ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी हे फोटोशूट करू नये पण आमच्याकडे पैसा आहे आम्हाला ते का करू देत नाही? असे प्रश्न प्री विडिंग ला परवानगी देणारे नव वधूवर पालक करत असतात.

 मुलांच्या सुखासाठी माणूस सर्व काही करतो. मुलांच्या आनंदाच्या दृष्टीने बघितले तर त्यात गैर काहीच नाही. पण कोणतीही घटना योग्य की अयोग्य, त्याचे समाजावर काय परिणाम होतात हे ठरवले जाते. प्री-वेडिंग फोटोशूटमुळे अनेक विवाह तुटत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. काही ठिकाणी वधूने वराऐवजी फोटोग्राफरशी लग्न केले! मुलांच्या आनंदासाठी, ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत, ते कर्ज घेऊनही हे फोटोशूट करून घेत असतात. त्यामुळे लग्नाच्या खर्चाबाबत आधीच टेन्शनमध्ये जगणाऱ्या सर्वसामान्यांचा ताण वाढत आहे. संस्कृतमध्ये म्हटले आहे, चिंता समं नास्ति शरीर शोषणम्. म्हणजे चिंतेसारखे शरीराचे शोषण दुसरे कोणी करत नाही. तणाव माणसाला आतून पोकळ बनवतो. ज्या फोटोशूटमधून समाजातील बहुतांश लोक तणावात राहतील, ते फोटोशूट म्हणजे जीवघेणा आजार ठरला, नाही का?

लग्नात पूर्वीपासूनच इतके कार्यक्रम असतात की, ज्याच्या तयारीसाठी हळद कुंकू पासून ते पाहुण्यांच्या निरोपापर्यंत घरातील मंडळींना आजीची आठवण येते. लग्नाचे सामान गोळा करण्याचा आमचा ताण वाढवण्यासाठी आम्हाला आणखी एका कार्यक्रमाची गरज आहे का?

एखादी व्यक्ती फक्त दोन वाक्ये ऐकण्यासाठी लग्नात इतका खर्च करते. ती दोन वाक्ये म्हणजे : "व्वा...वाह...काय मस्त लग्न आहे...पैसे मन मोकळ्यापणाने खर्च केलेत!" फक्त ही दोन वाक्ये ऐकण्यासाठी तर मुलांच्या लग्नाआधी अनेक वर्षे जमा केलेले पैसे एका झटक्यात खर्च झालेले असतात. एकीकडे समाजसुधारक लग्नाचा खर्च कसा कमी करता येईल याचा सखोल विचार करत आहेत. त्यासाठी लग्नात दिल्या जाणाऱ्या जेवणातिल खाद्यपदार्थांची संख्या कमी करत आहेत. लग्नात काटकसर करून समाजातील मध्यमवर्गीय आणि निम्न स्तरातील लोकांना लग्नाच्या अनावश्यक खर्चाच्या तणावातून मुक्तता मिळत असते. तर दुसरीकडे हे धनदांडगे लोक मुलांच्या लग्नात प्री वेडिंग फोटोशूट करून समाजातील बहुतांश लोकांचे टेन्शन वाढवत आहेत

या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पैसे कुठून येणार? कमाईची साधने पूर्वीही होती आणि आजही तशीच राहतील. म्हणजे नोकरी करणाऱ्याचा पगार आधीच ठरलेला असतो. या कार्यक्रमाच्या पैशासाठी, कंपनी त्याच्या पगारात वाढ करणार नाही. व्यावसायिकांची कमाईही अचानक वाढू शकत नाही. अशा परिस्थितीत लोक हे अतिरिक्त पैसे अनैतिक मार्गाने कमवण्याचा प्रयत्न करतील... लाच घेणार... यामुळे भ्रष्टाचार वाढेल! ज्या फोटोशूटमुळे समाजात अनैतिकता पसरेल, भ्रष्टाचार वाढेल, ते फोटोशूट म्हणजे समाजासाठी घातक आजार! समाजात हा आजार झपाट्याने पसरत आहे कारण प्रत्येक तरुणाला आपण हिरोईनप्रमाणे मोठ्या पडद्यावर दिसावे असे वाटते आणि मुलांच्या आनंदासाठी पालक कर्ज काढूनही त्यांची इच्छा पूर्ण करत आहेत.

 प्री-वेडिंग फोटोशूटचे समाजावर होणारे दुष्परिणाम पाहता आजकाल काही ठिकाणी त्यावर निर्बंध लादले जात आहेत. उज्जैनमधील सिंधी समाजाने त्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याचे उल्लंघन केल्यास वधू-वर दोघांकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. अखिल भारतीय माहेश्वरी समाजानेही यावर बंदी घातली आहे. त्यासाठी ते समाजाला जागरूक करत आहेत. जे कुटुंब हे फोटोशूट करून घेणार, हे लोक लग्नाला फक्त लिफाफे घेऊन येणार आणि जेवण न करून आपला निषेध व्यक्त करणार!

लग्नाआधीच्या फोटोशूट सारखा ट्रेंड आपण फॉल्लो करणे गरजेचे आहे का?
पटलं तर यावर नक्की विचार करा

✍️✍️

 सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणी सगळे चांगले कारागीरच आहेत. 

*उत्तम फर्निचर* बनवतात. दिवसभर मेहनत करतात.

सिंगल हजेरी .... 
म्हणजे सकाळी नऊ ते पाच पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा *ड़बल हजेरी* .... म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार.

या सगळ्यांचा *म्होरक्या* जो आहे तो उत्तर भारतीय तरूण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. *मोठ्या कारागीरांच्या हाताखाली* पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात. 
*विनातक्रार दिवसभर* काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा *सगळ्यांचे जेवण* बनवतो.
ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात..... मन लावून काम करतात. कुठेही *खळखळ* दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर घरात आकार घेत जाते. 
तेव्हा प्रश्न पडतो... *मराठी सूतार गेले कुठे सगळे?*

समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात. 
उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे ....सगळे भाजीच्या दुकानात *राबत* असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत सारे कुटुंब राबत असते. 
तेव्हा मला प्रश्न पडतो...
*मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?* 

 कारण *मेहनतीची तयारी* नाही आणी हे रहस्य मला रिनोव्हेशनच्या वेळीच जाणवले.

वायरींग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियनवाला म्हणाला की मेहनत खूप आहे कन्सिल वायरिंग करण्यात. शिवाय *कौशल्य* ही आहेच पण हल्ली मराठी तरूण या कामात येतच नाहीत फारसे. 

मला प्रश्न पडला 
*मराठी तरूण गेले कुठे..?*

माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते.

इकडे मला प्रश्न पडतो.. *मराठी तरूण काय करतो...?*

परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही..दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही..पानवाला हजाम बाहेरचा.(हे भाईंदर /वसई /विरार/ पालघर सारख्या मराठी बहुल विभागातील परिस्थिती) 

माझ्या ओळखीचा एक कोकणी तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा पंधरा हजार पगार होता फक्त. आणि कोकणात त्याची हापूसची पस्तीस कलमं धूळ खात पडलीत म्हणे......चोरापोरापायी जातात. 
पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही...
मग अशा कोकणात उ. भारतीय लोक जाऊन तिथली कलमं *भाडेपट्ट्यावर* घेतात आणि त्यांची राखण करत आंब्याचा व्यवसाय वाढवतात.

अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनतकारांची गरज असते. आहे आणि पुढेही लागणार आहे. 
*तेव्हा मराठी तरूण कुठे असतात? सगळ्याच जाती धर्माचे...??*

तर याचे मला भरपुर मंथन केल्यावर सापड़लेले उत्तर आहे की... *मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन,क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मशगूल असतात नको तेथे उसळतात* 
*सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मशगुल असतात. मिरवणुका काढण्यात मशगुल असतात.* *राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मशगूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात.*
*नाचायचे, मारामारी , फोड़ाफोड़ी, दारू, तंबाखू आणि "मी कुठला धंदा करु याचा विचार" यातच दिवस काढ़तो*

ठीक तर....हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का ?. 

पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते रिस्क घेतात, मेहनत करतात, *पंधरा सोळा तास* राब राब राबतात ...

माझ्या मराठी बंधूनो
खर सांगा ... विचार करून सांगा *आपल्याला ....आपल्या तरूणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा...??*
मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे।पण कुठे
*गल्ली बोळात* टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात. 
गल्ली मध्ये दादागिरी भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात. 
वाढदिवसाला *फ्लेक्स लावून भावी* आमदार, खासदार नाहीच तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात. 
मोठं मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात.

 🙏🌺🌹🌹🌹🌹🌹🌺🙏

*"माणसे येती माणसे जाती...*"
*"टिकवून ठेवावी ती फक्त नाती..*"

*"कुणी हसवती कुणी रडवती..*"
*"तरी हक्काने मित्र म्हणवती...*"

*"प्रेम घ्यावे प्रेम द्यावे...*"
*"सगळ्यांनाच आपलेसे करावे...*" 

*"लागले कधी जरी भांडावे...*"
*"तरी विषय प्रेमाने मांडावे...*"

*"एकदाच जीवन हे मिळते...*" 
*"हवे तितके मन जोडावे...*"

*"कधी हसावे कधी रूसावे...*" 
*"रंग हे ही चाखून पहावे...*" 

*"हीच तर मजा खरी नात्यांची..*"
 *"म्हणूनच नात्यां मध्ये.,*"
*"हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे....*"

  *"आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या". "
आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही असे वागा".*

🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏

 असं कुठं असतं का राव?


चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा

दिलंस एक मन त्यात
 अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर 

दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला 

नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना 

जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस

भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता

संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस??

मेजवानीने भरलेले ताट 
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?

वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची 
मांड बेरीज आणि वजा

माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
*तू जवळ असल्याची फक्त*
*पटवून देत जा साक्ष . . . .*
===========================================


आजच्या पांडुरंगमय वातावरणात कुणीतरी साखरेहून गोड कविता पाठवली आहे पहा.
😊

विठोबाही रुकिमणीला
       खूप कामे सांगतो ,
अन् तिच्यावर थोडा
    रूबाब गाजवतो .

सकाळीच म्हणाला विठुराया
     रुक्मिणी,' जरा आज
नीट कर सडा -सारवण
आपल्याकडे येणार भक्त सर्वजण

विठोबा म्हणतो रुक्मिणीला ,
' भक्तांची विचारपूस
    जरा अगत्याने कर ,
अगं हे तर त्यांच माहेरघर '.

विठोबा म्हणतो , ' जनीची
    कर ना तू वेणी -फणी '
अगं एकटी आहे अगदी
 तिला या जगी नाही कुणी .

रुक्मीणी, उद्या तर घाल तू
     पुरणा -वरणाचा घाट
उदया आहे बार्शीच्या
 भगवंताच्या स्वागताचा थाट

एका मागोमाग सूचना ऐकून
    रुक्मिणी आता रुसली
आणि रागा- रागाने जाऊन
    गाभाऱ्या बाहेर बसली .

सारखंच याचं आपलं
       भक्त अन् भक्त
मी काय आहे
          कामालाच फक्त ?
  
भोवती तर याच्या सारखा
      भक्त आणी संत मेळा
काय तर म्हणे _ 
     विठु लेकुरवाळा .

भक्तांनाही कांही
       माझी गरजच नाही
कारण तोच त्यांचा बाप
    अन् तोच त्यांची आई .

कधीतरी माझी ही 
      कर जरा चौकशी
भक्तांच्या सरबराईत
     दमलीस ना जराशी .

मी आता मुळी
     जातेच कशी इथुन
बाहेर जाऊन याची
      गंमत बघते तिथुन

आता तरी याला
       माझी किंमत कळेल
अन् मग हळूच
     नजर इकडे वळेल

विठू जरी आहे
      साऱ्यांची माऊली
भगवंतांच्याही मागे असते
     ' लक्ष्मीची ' सावली. 🙏🌸🙏
===========================================

लाखो इथले गुरू...!

बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे 
यांशी गोष्टी करू!

बघू बंगला या मुंग्यांचा, 
सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील 
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

सुग्रण बांधी उलटा वाडा, 
पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे 
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

कसा जोंधळा रानी रुजतो, 
उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा 
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, 
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेउन विद्या 
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

– ग. दि. माडगूळकर

*******
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐🙏💐💐


शांताबाई शेळके, उषा मंगेशकर, 
पं. हृदयनाथ मंगेशकर यांची माफी मागून 

काय बाई सांगू, कसं गं सांगू

काय बाई सांगू, कसं ग सांगू ? 
मलाच माझी वाटे लाज 
रस्त्यांची चाळण झालीय आज 

उगीच फुगूनी आलं खड्डेफूल
उगीच जीवाला पडली भूल 
या रस्त्याचा, त्या रस्त्याचा 
अंगावर ल्याले मी खड्डे साज 

जरी घाबरी झाले धीट 
बघत राहीले खड्डा नीट 
मुंबईकराची पोर कशी मी 
विसरुन गेले रस्ते छान 

सहज बोलले हसले मी 
खड्डयात जाऊन पडले मी 
एक अनावर कंत्राटदारांची जडली बाधा 
'टक्केवारी'पुढे नाही चालत काही इलाज

तकिया कलम : 'मुंबईकाठचा धोंडी' या आगामी चित्रपटातून साभार
=========================================


ह्याला आयुष्य म्हणावं काय ?
———————————-

पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी
लोळण घेतात पायात
बिल गेटची पत्नी तरीही
का घटस्फोट घेते ह्या वयात ?

शिक्षणाने माणूस समृध्द होतो
आम्ही आहोत अजूनही भ्रमात
उच्चविद्याविभूषकांचे मायबाप
मग का असतात वृध्दाश्रमात ?

हा डिप्रेशनचा शिकार
तो आत्महत्या करतो
ज्याला समजावं सेलिब्रिटी 
तो एकाकीपणात मरतो

ज्यांनी कमावलं नाव
त्याला आनंद का मिळत नाही ?
काय चाटायचं ह्या मोठेपणाला
नातं आपुलकीचं जुळत नाही

जळजळीत वास्तव सांगतो
तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही
गरीब, आडाणी , प्रामाणिक मजूरांचे
मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

असं नाही त्यांचे घरात
नाहीत वादविवाद
पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम
बोटावर मोजण्या एवढे अपवाद

आजारी मायबापांचा ईलाज 
करतात किडूक मिडूक विकून 
पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी
नाळ ठेवली आहे टिकुन

व्यसनी, रागीट,नवरा
त्याला गरीबीची जोड
तरीही त्याची पत्नी बिच्चारी
करतेचं ना तडजोड ?

दु:ख हलकं करतात
एकमेकांना भेटून
एका शिळ्या भाकरीचा तुकडा
खातात सारेजण वाटून

जेवढी लावतात माया
तेवढंच बोलतात फाडफाड
कितीदा तरी भांडतात
पण कुठे येतो ईगो आड ?

ऊशाशी दगड घेऊन
भर ऊन्हातही झोपी जातो
काळ्या मातीत घाम गाळणारा
बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

ना तोल ढळतो ना संयम
दु:खातही सावरण्याची आस
कारण अजुनही ह्या माणसांचा
आहे माणूसकीवर विश्वास

पण हल्ली इन्सस्टंट रिझल्टचे
आले हे दळभद्री दिवस
देव सुध्दा लगेच बदलतात
जर पावला नाही नवस

एकत्रीत कुटूंब हल्ली
सांगा कुणाला हवं ?
कामा शिवाय वाटतं का
आपण कुणाच्या घरी जावं ?

एकदा तरी बघा जरा
आपल्या आयुष्याचा रोड मॅप
कुणाचं कुणाशी पटत नाही
काय तर म्हणे जनरेशन गॅप

सांगा बरं कुणावर ह्या
विकृत विचारांचा पगडा नाही
घर,बंगला, फ्लॅट असु द्या
दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही

बहूत अच्छे, बहूत खुब !
क्या बात है ? बहूत बढीया !
एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया 
जागृत चोवीस तास सोशल मिडीया

आभासी दुनियेची चाले
कोरडी कोरडी ख्याली खुशाली
मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा
मोबाईलवरचं श्रध्दांजली

काय बरोबर ? काय चूक ?
मत मांडण्याचीही सत्ता नाही
तो बंद घरात मरून पडला
वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

मुलं पाठवले परदेशात
आई संगे म्हातारा बाप कण्हतो
अंत्यविधी उरकुन घ्या
पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

लेकराला पाॅकेटमनी ,बाईक 
अन् भलेही दिली जरी कार
किती छान झालं असतं
जर दिले असते संस्कार ?

होस्टेल ,बोर्डींगात बालपणीचं पाठवलं 
तो तुम्हाला का वागवणार ?
जमीन असो की जिवन
येथे जे पेरलं तेच ऊगवणार

जिवशास्र शिकवलं
जिवनशास्त्र शिकवा
चुलीत गेली चित्रकला
सांगा चारित्र्याला टीकवा

त्रिकोण,चौकोन ,छटकोन
ह्याला सांगा विचारेल कोण ?
ज्याचे जवळ नसेल
आयुष्याचा दृष्टीकोन

विपरीत परिस्थीतीतही
जपणूक केली पाहीजे तत्वाची
व्याकरणारणा पेक्षाही अंत:करणाची
भाषा असते महत्वाची

चुकु द्या चुकलं तर
अंकगणित अन् बीजगणित 
माणसांची बेरीज करा
गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

प्राणपणाने जतन करावे
नाते शहर, खेडे ,गावाचे
मेल्यावरती खांदा द्यायला
असावे चारचौघे जिवाभावाचे

मेल्यावर दोन अश्रु 
हीच आयुष्याची कमाई
ज्याने हे कमावलं नसेल
तो आयुष्य जगलाच नाही

मिळून मिसळून वागावं
आनंदानं जगावं
तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं
म्या पामरानं काय सांगाव ?
🌹🌹🌹🌹🌹🌹
*जय श्री कृष्ण*
🌹🌹🌹🌹🌹🌹

      *“मैत्री नको तोडूस”*
                  (..डॉ. स्वप्नील मानकर )

हा आहे खूप फटकळ !
तो आहे फारच खडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

नातेवाईकांसारखा तो !
आयता नसतो मिळत !!
मित्र कमवावा लागतो !
असंच मन नसते जुळत !!
हृदय वेगळे असले तरी !
स्पंदने सोबत धडकतात !!
दोघांच्या ही मनामध्ये !
समान विचार चालतात !!
सॉरी,थँक्सला थारा नसे!
मानाकरिता नको अडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

तू जातो निराशेत कधी !
भकास वाटते सारे रान !!
रडण्यास मिळता खांदा !
निवळतो मनावरील त्राण !!
जिथे कुणी कामी पडेना !
तिथे मित्र हजर असतो !!
आपल्यावर होणारे वार !
लीलया झेलत दिसतो !!
कठीण संकटांना मुळी !
तू एकटा नको भिडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

वादविवाद जेव्हा होतो !
स्वतःहून सॉरी म्हणावे !!
चूक कुणाचीही असो !
आपणच नमते घ्यावे !!
वाद करून जिंकल्यास !
बक्षीस थोडीच मिळते !!
अबोला जास्त लांबला !
की त्याचे महत्व कळते !!
छोड ना यार जाने दे !
चिंध्या नको फाडुस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

जीवन एकदाच मिळते !
मनसोक्त घ्यावे जगून !!
मैत्रीला मात्र काळजात !
आजन्म ठेवावे जपून !!
जात, पात, धर्म, लिंग !
या पलिकडले हे नाते !!
सर्व नात्याहूनी जगात !
सर्वश्रेष्ठ समजले जाते !!
तोडण्यापूर्वी कर विचार !
नंतर एकटा नको रडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!!!*
*************************************************

 *सतत १४ दिवस कोव्हिड वार्ड मधे थांबल्याने एका कोरोना पेशंटला 
सुचलेली समर्पक कविता..**


*बरं झाल देवा, मला कोरोना झाला..*

आयुष्याचा आलेला सगळा माज निघुन गेला..

म्हणत होतो नेहमीच मी माझी गाडी, आंन माझा बंगला..

पन जवा बसलो अंबुलन्समधी आखा जीव उशाला टांगला..

गाडी राहिली बंगल्या बाहेर, आन रस्ता दिसेनासा झाला..

*बरं झाल देवा, मला कोरोना झाला..!*

प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी, केली कर्म आठवत होती..

प्रत्येक अडकना-या श्वासासंगे, माणुसकीची जान साठवत होती..

पुण्यसंचय आला संपत, आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला..

तेंव्हा कुठ देवा तुझ्यावर भरोसा आला..

*बरं झाल देवा, मला कोरोना झाला..!!*

होती पैशांची मस्ती, आनं पदाचीबी गुरमी..

सगळं संपल देवा आता, आलीया पुरती नरमी..

जवा आता मिळालाय, गरिबा शेजारी खाट..

तवाच माझा जिरलाय, आता समदा थाट..

सगळ आठवुन आता, जीव घाबरा झाला..

*बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!*

नाही दिली कोणा गरिबा कधी रुपया आणीक दमडी..

इथं सुयांच्या भोकानी, थकून गेलीया चमडी..

पै-पै कमावलेला, पैसा ना कामी आला..

*बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!!*

खर सांगतो मित्रांनो आता, *पद, पैसा आणी खोटी प्रतिष्ठा,* यात काही दम नाही..

कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त, प्रेमाचं व्हेंटीलेटरच कामी येई..!

नात्यांमधील ऑक्सिजन कधी, कमी होऊ देऊ नका..

*मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले, बोट कधी सोडवु नका..!!*
****************************

 *कळलेच नाही*

वर्षेचे वर्षे निघून गेली, 
धकाधकीच्या जीवनात 
वय केंव्हा वाढले 
कळलेच नाही ! 
     खांद्यावर खेळविलेली मुल, 
     खांद्याएवढी कधी झाली 
     *कळलेच नाही* ! 
     एकेकाळी दिवसा 
     ढाराढूर झोपायचो,
     राञीची झोप 
     केंव्हा उडाली 
     *कळलेच नाही* ! 
ज्या काळ्या केसावर 
भाव मारत होतो, ते 
पांढरे कधी झाले 
*कळलेच नाही* !
     वणवण भटकत 
     होतो नोकरीसाठी,
     रिटायर्ड केंव्हा झालो 
     *कळलेच नाही* !
मुलांसाठी बचत 
करीत होतो,
कधी मुलं दूर गेली 
*कळलेच नाही* !
     आता विचार करतो, 
     स्वतःसाठी काही 
     करायचं पण शरीराने
     केंव्हा साथ सोडली 
     *कळलेच नाही* !
कळलेच नाही, म्हणून 
म्हणतो अजूनही वेळ 
आहे, थोडं तरी जगून घ्या 
सुंदर अशा जगण्याला
डोळे भरून बघून घ्या 
            🙏

         *जिंदगी*
 *ना मिलेगी दोबारा*
===============================================

 बंद देवळा बाहेरून मी
देवाला फुले वाहिली.
हळूच दारा आडून त्याने
भीती माझी पाहिली.

भजन नाही, नाही प्रार्थना
ना म्हंटली कुठली गाणी.
जे सांगायाचे होते मजला
वदले डोळ्यांतील पाणी.

कुठून आला आवाज कानी
चपापून जरा मी पाहिले.
लक्षात आले नैवेद्याचे
ताट आणायचेच राहिले.

घेऊन निघालो होतो देवा
रस्त्यात भेटला भुकेला.
नैवेद्याचा घास तुझा मी
त्याला मग देवू केला.

चेहऱ्यावरती दाटून आले
भाव तयाचे भोळे.
उपकाराची जाणिव त्याचे
बोलत होते डोळे.

हळूच दिली तृप्तीची ढेकर
त्या खंगलेल्या पोटाने.
अस्फुट आशीर्वादही दिले
रखरखीत त्या ओठाने.

क्षमस्व देवा नैवेद्य तुझा
आणू न शकलो इथे.
अरे वेड्या, देव म्हणाला
ग्रहण केला मीच तिथे.

येवू नको मंदिरात माझ्या
तू घरामध्येच थांब.
आयुष्याची दोरी तुझ्या
बघ होते कशी लांब.

लहान मुलांत शोध मला
असेन मी फुला पानांत.
सापडेन तिथेच तुला मी
दिन दुबळ्यांच्या मनांत.

मलाही झालाय नकोसा
ह्या मंदिरातला थाट.
गरिबांच्या रुपात तुझी
मी बघत राहीन वाट.🙏
==================================

📘📕📗📘📗📕📘
 *बापाचं मन* 
*घरामधला कर्ता बाप,*
*जेंव्हा येतो बाहेरून |*
*पाळलेली मांजर सूद्धा,*
*आनंदाने जाते शहारून |*
*मॅव मॅव करत बिचारी,*
*फिरते सा-या घराला |*
*पण ते प्रेम कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*मालकाला बघून कूत्रा,*
*झेपाऊन घेतो ओढ |*
*साखळी दाटे मानेला,*
*कमी होत नाही वेड |*
*शेपटाचा गोंडा घोळून,*
*घूटमळते ते दाराला |*
*पण ती ओढ कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*दूर बघून मालकाला,*
*हंबरते गोठ्यात गाय |*
*वळवळ करते जागीच,*
*तान्ह्या वासराची माय |*
*वासराच्या आधी चाटे,*
*ती मालकाच्या ऊराला |*
*पण ती माया कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*बांधा वरचा बैल सूद्धा,*
*हाक ऐकून परत वळतो |*
*रागाची हाक असुनही,*
*गप गुमान रानात पळतो |*
*आपुलकीचा राग सुद्धा,*
*कळतो मुक्या ढोराला |*
*पण तो राग कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*जीव लावला जनावराला,*
*लेकरावानी वागत आली |*
*पोटची लेकरं मात्र कशी,*
*परक्यावानी जगत आली |*
*बाप लेकाचा सुर कधीच,*
*जुळला नाही सुराला |*
*जीव लावनं कळंलं नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*बाप असतो जरा जरा,*
*नारळाच्या फळा वानी,*
*बाहेरून कठोर भासे,*
*आतमध्ये गोड पाणी |*
*पावसाचं महत्व सुद्धा,*
*कळेना झालंय मोराला |*
*तसाच बाप कळत नाही,*
*जीवंत पणी पोराला |*


*तुमच्या बापासाठी तुमच्या मनात आहे पण बोलु शकत नाही अशा सर्वासाठी*
📘📕📗📘📗📕📘

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...