Sunday, May 29, 2022

स्मितहास्य ...

खरंच आजची गरज आहे...!

स्मितहास्य करणे किंवा चेहर्‍यावर सदोदित स्मितहास्य फुलवणे फार कमी लोकांना जमतं... जो प्रत्येकाच्या चेहर्‍यावर स्मितहास्याच्या रेषा रेखाटु शकेल असा एक कलाकार असायला हवा असे वाटते...! 

अगदि बाळाला सुद्धा स्मितहास्य कळतं बरे... आईच्या चेहर्‍यावरील ईतर भाव व स्मितहास्यातील फरक... मग आपण तर समंजस , वयाने व कर्तव्याने मोठे आहोत बाळापेक्षा, मग आपल्याला का नाही जमणार? याचा विचार करायला हवा. त्या निरागस छोट्याशा जिवाचे गोड हसणे बघुन ती माऊलीपण तिला होत असलेले त्रास , दुखणे व थकवा विसरून कामाला लागते...! 

सहज रस्त्याने चालता चालता जरी आपण समोर आलेल्या व्यक्तीला बघुन हलकेसे स्मितहास्य जरी केले तरी समोरिल व्यक्ती सुखाऊन जाते हो.. आणि ती व्यक्ती थोड्या काळाकरिता का होईना स्वतःतील दुःख विसरते...! 

अगदी हाॅस्पिटल मधे सुद्धा डाॅक्टर व सिस्टर चेहर्‍यावर स्मितहास्य ठेऊन रुममधे किंवा वार्ड मधे प्रवेश करुन रुग्णांची विचारपूस करतात नं त्यावेळी अर्ध्येअधिक पेशन्ट आपले दुखणे विसरुन जाऊन त्यांच्याशी सर्व गोष्टी शेअर करतात व डाॅक्टरांनासुद्धा उपचार करायला मदतच होते...! 

आता हेच बघाना 4-5 घरांची धुणी-भांडी करून आपल्याकडे घाईघाईत व ऊशीरा आलेल्या बाईकडे फक्त एक स्मितहास्याचा एक कटाक्ष टाकुन बघा ... ती थकलेली असताना सुद्धा तुमचे जे काही काम असेल ते किती जोमाने करते की नाही बघा...! 

ऑफिस मध्ये सुद्धा सर्वांच्या चेहर्‍यावर स्मितहास्याची एक जरी रेखा आली ना की चपराशा पासुन बाॅसपर्यंत सर्वांचा संपूर्ण दिवस छान जाईल व उत्साहाने कामे होतील... तसेही बाॅसला घाबरुनच असतात बरेच जण ... पण स्मितहास्य थेरपीमुळे तो सुद्धा नाहीसा होऊन ऑफीसमधील वातावरणात एक पारिवारीक मित्रतेचा जिव्हाळा निर्माण होऊ शकतो...! 

शाळेत सुद्धा खुप गरजेचे आहे. टिचर्स ने शिकवताना छानसे हसु आणुन समजावून शिकवले तर विद्यार्थी सुद्धा त्याला पडलेले प्रश्न विचारुन त्याचे निरसन करुन घेतील.. नाही तर काही विद्यार्थी बोलतच असतात की त्या बाई किती खडुस आहेत नाही थोड्याशा पण हसत नाहीत, सारखे रागानेच बघत असतात नाही तर ओरडतात... असले काही कानावर ऐकायला पण येणार नाही मग...! 

 शाळेतुन किंवा कामावरुन मुलं घरी आली की आईला झालेला आनंद तिच्या त्या हास्यातुन दिसल्यावर तर लगेच मुलं शाळेतील व कामावरील गमतीजमती आईबरोबर शेअर करतात...! 

स्मितहास्य हे एकदुसऱ्याना बांधुन ठेवायला छान साधन आहे. हास्यामुळे बाॅडिंग पण छान होईल... एक-दुसऱ्यांच्या नातेसंबंधातील ...!! 


विचारांची राखण करा.....



जर आपण आपल्या विचारांची राखण केली नाहीतर त्यापैकी बहुतांश विचार हे नष्ट होतील. जेव्हा विचारांची निर्मिती होईल, त्यांची देखभाल तेंव्हापर्यंत करायला हवी... जोपर्यंत विचार मोठे होत नाहीत. 

विचारांना पळून जाण्यासाठी वाव देऊ नका. त्यासाठी त्याना लिहून काढा. दररोज आपल्या डोक्यात खूप चांगले चांगले विचार येतात पण ते लवकरच मृत्युमुखी पडतात. कारण आपण त्याना कागदावर उतरवत नाही. आपण काही वेळानंतर त्याना विसरतो. नव्या विचारांची रखवालदारी करण्यासाठी स्वतः जवळ एखादी वही किंवा डायरी अवश्य ठेवा.

विचारांचं अवलोकनही करा. तुम्हाला काही विचार बेकार किंवा महत्वहीन वाटतील. त्याना बाहेर काढा. विचारांना विकसित करा. त्याना फुलू द्या त्या विचाराविषयी विचार करत राहा. त्यांच्याशी संबंधित साम्रग्री वाचा. तुमची नोकरी, तुमचं भविष्य, सावरण्यासाठी तसच उज्ज्वल करण्यासाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग होईल. 


'Hopes never dies' . 'आशा मरत नसते'

पण  "आशेला मरणं असावं" असं मला मनापासून वाटतं. जोपर्यंत आपण जिवंत असतो, आपली आशा जिवंत असते. आशा म्हणजे अपेक्षा, एखादी गोष्ट हवी असण्याची जाणीव, एखादं स्वप्न, एखादा ध्यास...काहीही ..! 

ते पूर्ण होईल , ही दरक्षणी वाटणारी अपेक्षा आणि त्या क्षणांची वाट पाहाण्यासाठी  खर्ची घातलेला हर एक क्षण...!
माणूस फक्त आशेवरच जगतो. आशेच्या पूर्ण होण्याची वाट बघतचं जगतो..
आणि ती अपूर्ण राहीली तर?
मेली तर?
संपली तर?
तर
माणूस खचतो, निराश होतो,जगण्याची सगळीच कारणे संपल्याच्या सुन्न अवस्थेपर्यंत पोहोचतो...
हे इतकं सगळं घडतं कारण 'आशा हेच आपल्या जगण्याचं मूळ कारण आहे, असं आपल्याला वाटतं' तसं ते आहेही..पण ते तेवढचं आहे का???

उलट बाजू ही आहे की आशा हेच निराशेचं मूळ आहे. आशेवर जगतो आणि निराशेत प्रत्येक क्षण घालवतो. जोपर्यंत आशा पूर्णत्वास पोहोचतं नाही त्या क्षणापर्यंत निराश राहातो आणि त्या क्षणानंतरही पुन्हा नव्या आशेवर लक्ष केंद्रीत करतो...
ह्या सगळ्यात जगण्यासारखे कितीतरी क्षण हातचे गमावतो. हातातलं सोडून पळत्या क्षणांच्या पाठीमागे धावतो.

आशेला मरणं असावं म्हणजे माणसे प्रत्येक क्षण आनंदाने जगायला लागतील. आज,आत्ता, एवढचं पाहातील , त्यातचं समाधानी राहातील, सुख हे क्षणांवर अवलंबून असतं, क्षणांपुरतं असतं ,हे जाणून घेतील आणि त्या क्षणांना ,त्याच क्षणी जगून घेण्यावर विश्वास ठेवतील...
आशा संपली तर उद्याचा भरवसाही तुटेल आणि
हातातला 'आज' अधिक उर्जेने जगता येईल...
तसंही
कल किसने देखा है!

Swati Bhagat

परमेश्वर आपणास योग्य तेच व योग्य वेळीच देतो.. आपण विचार करा

एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली.

    आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही.
     तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच ते तुझ्या हातातून पाडलं होत.दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत यासाठी उभं राहू दिलं कारण सफरचंद तेव्हा झाडाला होते ते यायला वेळ होता.म्हणून तुला जास्त वेळ वाट पाहावी लागली हे सफरचंद जास्त लाल सुंदर आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे.देवाच बोलणं ऐकून मुलगी आनंदी झाली.
    याचप्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहावी लागत असेलतर देवाची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो,त्याचप्रमाणे देवसुद्धा त्याच्या मुलांना तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे .

मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे
पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील.

जगण्याची क्वालिटी

 असं म्हणतात तुमच्या जगण्याची क्वालिटी ही तुम्ही ज्यांच्या संपर्कात येता त्यांच्यावर देखील अवलंबून असते. तुम्ही चालत असतानाच आयुष्याच्या एका वळणावर तुम्हांला कायमची सावली देईल असा वटवृक्ष लाभतो पण तुम्ही मात्र ते वळण टाळून पुढील "हुलकावणी" देणाऱ्या मार्गाला स्विकारत पुढे जाता.

मुक्त जगण्याच्या धुंदीत आपण "ठेहेराव" नावाची गोष्ट विसरतो.... 
मग पुढे एका उंचावरून आपला कडेलोट हा ठरलेला असतो. तेव्हाही सावरणार्या हातात वेळीच आपला हात देण्यात झालेला विलंब हा कडेलोट न टळण्याचं एक प्रमुख कारण असतं. 
आयुष्यात फक्त चांगली माणसं येऊन उपयोग नसतो तर त्यांची किंमत ओळखून त्यांचा मान ठेवण्याची जाणीव असणं हाही महत्वाचा भाग असतो.
आपलं एकटेपण हे अनेकदा ह्या अशाच चांगल्या दर्जाच्या माणसांना डीच करून, काही सुमार व्यक्तींच्या मोहात अडकण्याचाच परीपाक असतो...
आपल्या जगण्याचं मुल्यांकन इतर कुणी करु नये हे जसं खरं आहे तसंच इतरांचं आयुष्य, इतरांची स्वप्न आपली समजून जगण्याच्या मोहात आपण एकटेपणाची वाट तर धरत नाही ना हे समजून घेण्याची जबाबदारी पण आपलीच असते.
 प्रत्येक व्यक्तीचा पिंजरा हा वेगळा आणि त्याची चावी पण वेगळीच नाही का ? -मनमानसी

दुसऱ्याचा विचार-

      सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.


        पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची.
       सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.
        आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.
       पाण्याची बाटली आपण रिकामी केली व लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.
        बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.
       पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे, हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.
       खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.
      घर सगळयांचं असतं, 'सगळी जवाबदारी गृहिणीची' असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे.
       प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.
       घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात, तसे घरातही काही नियम असले पाहिजेत, तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)
      लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. लहान मुलांना हे शिकवता येईल. 

      थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.


अंतर्मन

प्रत्येक व्यक्तीत दोन मन असतात एकबाह्य मन व दुसरे अंतर्मन. बाह्य मनात येणारे विचार अंतर्मन स्विकारतं व त्या प्रमाणे कार्यवाही होते. 

समजा तुम्ही दुकानात गेला व सुटकेस खरेदी करावयाची आहे. तर विचार करता... कोणत्या रंगाची कोणत्या आकाराची घ्यावयाची त्यानंतर एकाची निवड करता. हे निश्चित केल्यानंतर अंतर्मन स्वीकारत व त्याप्रमाणे कार्यवाही होते. बाह्य मन जसे विचार करते त्या प्रमाणे अंतर्मनाद्वारें त्याची कार्यवाही होते.

चांगले विचार असतील तर चांगली घटना घडेल व वाईट विचार असतील तर त्या प्रमाणे घडेल. एखादया व्यक्तीच्या दंडात तावीत अगर दोरा बांधतात व सांगतात तुझा आजार बरा
होईल व त्याचा आजार बरा होतो. तावीत अगर दोरा बांधल्याने आजार बरा होत नाही तर तुमच्या बाह्य मनात बरा होईल हा दृढ विश्वास निर्माण होतो व अंतर्मन हे स्वीकारतं त्या प्रमाणे कार्य वाही
होते.

काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत व त्यात स्नान केल्याने आजार बरा होतो. इथे हे लक्षात ठेवा कुंडातील गरम पाण्यानी आजार  बरा होत नाही तर मी नक्की बरा होईल हा विश्वास अंतर्मन स्वीकारत व ती व्यक्ती बरी होते.

अंतर्मन हे सुपीक जमीन आहे, जितके सकारात्मक चांगले विचार पेराल त्या प्रमाणे जीवन घडेल. नकारात्मक विचार असतील तर तसे घडेल. 

ऋषी मुनींच्या हे लक्षात आले
की अंतर्मनात एक प्रचंड शक्ती आहे म्हणून त्यांनीं बाह्य मनाचा प्रवाह अंतर्मनात वळवला. काही लोक हुशार असतात, नोकरी करिता मुलाखतीला जातात. त्यावेळी त्यांच्या मनात विचार येतो इथे बरेच हुशार उमेदवार दिसतात, आपली निवड होईल की नाही... त्या एकाच
विचारानी मुलाखतीच्या वेळेस बरोबर उत्तर देऊ शकत नाहीत व त्यांची निवड होत नाही.

समजा एखाद्याला घर विकत घ्यावयाचे आहे, जर तो म्हणाला, परवडणार नाही... एवढे पैसे नाहीत.... परवडणार नाही हा विचार अंतर्मन स्वीकारत असेल तर घर होणार नाही. जर ती व्यक्ती म्हणेल मी घर घेऊ शकेल मला ते शक्य आहे. तर खरोखरच घर होईल. 

एखादी व्यक्ती व्यवसाय करीत असते. मंदी आहे गिऱ्हाईक नाही... तर खरोखरच गिर्हाइक येणार नाहीत. जर तो म्हणेल... आज खूप गिर्हाइक येणार व चांगली विक्री होणार... तर हे अंतर्मनात चित्रित होते, व त्या प्रमाणे तुमच्या विचारांच्या लहरी वातावरणात जातात.

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करते, परंतु जर दुसरी व्यक्ती म्हणेल... तो मनाने चांगला आहे, माझे त्याचे संबंध चांगले आहेत तर त्या व्यक्तीत नक्कीच बदल झालेला दिसेल.

कायम सकारात्मक व चांगलेच विचार करा हे विचार अंतर्मन स्वीकारतं व त्या प्रमाणे जीवन घडत असते. म्हणून तुम्ही बदला जग बदलेल.

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...