अर्थसंकल्प...
1)LIC चे खाजगीकरण करून सरकारने "जिंदगी के साथ भी" बाद अस मिरवणारया कंपनीला रितसर अश्व लावलाय,तसेच एजंट आता सरकारी कंपनी आहे असं सांगुन बोर करणार नाहीत.तसेच ही कंपनी एखाद्या खाजगी देशभक्त अंबाणी याच्या हाती जाऊन हे पुन्हा नव्याने भारतीयांची सेवा करतील यात शंका घेण्याचे कारण नाही.
2) पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ यामुळे एकतर राऊंडफिगर शंभर रूपये देता येणार पंपावर चिल्लरचा वांदे होणार नाहीत पंपावर वेळ वाचेल तसेच महाग झाल्याने आतंकवादी नक्षलवादी पेट्रोल डिझेल विकत घेणार नाहीत तसेच लोक अंगावर ओतुन जाळुन घेण्याचं प्रमाण कमी होईल.तसेच गॅस महाग झाल्याने गृहीणी गॅस चालु ठेऊन सिरीयल पाहणार नाहीत हा मुख्य हेतू शासनाचा आहे.
3) जेट एअरवेज विक्री:पेट्रोल आणि डिझेल एवढं महाग झाल्यावर कमी ऐवरेजचे विमान ठेवुन काय उपयोग यामुळे विमानतळ विक्रीचा निर्णय घेतला.
4)बांबुच्या वस्तूवर विशेष सुट हा अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने घेतलाय.यामुळे तिरडीचा खर्च सर्वसामान्यांच्या बजेटमधे बसणार आहे जगणं जरी महाग वाटत असेल तर मरण शासनाने स्वस्त केलंय आता लोक हव तेव्हा मरू शकतात.
5) 15 वर्षे जुनी कार आता थेट भंगारात जाणार आपल्याला दर पंधरा वर्षाला नविन माॅडेल दारात येणार तेही पाच वर्षाच्या इंन्शुरन्ससह.
6)आय.डी.बीआय,पवनहंस,आरपीसीएल या जुनाट कंपन्या विकुन खाजगी देशभक्तांना सेवेची संधी मिळणार.
7)या अर्थसंकल्पाने आपण महासत्तेकडे जाणार आहोत नोटबंदी,जी.एस.टी.या अर्थक्रांती मुळे आज आपण शंभराचे पेट्रोल,डिझेल,तसेच विमानाने फिरू शकत आहोत चारशेचा गॅस आपण आज आठशेला अगदी सहजतेने घेत आहोत हे शक्य झालं शेठमुळ तसेच आपली कार हावसाने भंगारात घालुन त्यावर नवीन कार विकत आणणार एवढ अर्थसंपन्न आपण आज झालो आहोत.पुर्वी आपण लाईटबील भरत नव्हतो आता आपण तीन महिन्याला GST भरत आहोत.150₹डीश टि.व्ही आपण आज तेवढेच चॅनल तीनशेत मजेत पाहत आहोत.मोबाईल लाईफटाईम होत ते सरकारने बंद करून 28 दिवसांच्या महीन्यासह प्रतीमहीना पाचशे वर बजेट नेण्याचं काम केल आहे.हे सगळं एकटे मोदी करणं शक्य नाही यामागे अनिल बोकील सारखे अर्थतज्ज्ञ, एम ए पास उर्जित पटेल सारखे गव्हर्नन्स व लोणच्याच्या भरणी सह प्रसिद्ध झालेल्या सितारामण सारख्या अर्थमंत्री आहेत.ही विद्वान मंडळीने भारताचे एवढे कल्याण केले आहे की कोरोना काळात वीस लाख कोटीचे पॅकेज जाहीर केल घराघरात पंधरा लाख आधीचे आणी या वीस लाख कोटींचे हिस्सा आला यामुळे आता पेट्रोल डिझेल राऊंडफिगर शंभर करावे तसेच गॅस एक हजार रूपये राऊंडफिगर करावा.तसेच उरल्या सुरल्या सरकारी कंपन्या विकुन अंबाणी कुटुंबाला सेवेची संधी द्यावी. तसेच देशद्रोही शेतकरयाच्या अन्नावर बहिष्कार घालुन पतंजलीच्या गौरया खायला द्याव्यात.या अर्थसंकल्पावर सर्व सामान्य लोक आनंदाने स्वागत करत आहेत.पेट्रोल डिझेल चे काही होईल पण बांबु स्वस्त झालेत याचा आनंद खुप मोठा आहे.

No comments:
Post a Comment