*पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी!*
आता पेन्शनधारक धारकांना येत्या काळात हयात (जिवंत) असल्याचा दाखला देण्याची गरज नाही. कारण त्यासाठी केंद्र सरकारनं एक वेगळी योजना आखली आहे.
पेन्शनधारकांनी दरवर्षी जिवंत असल्याचा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण आता पेन्शनधारकांची या दाखल्याच्या झंझटीतून सुटका होणार आहे.
केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे.
टेक्नोलॉजीनुसार आता पेन्शधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचं अनावरण करण्यात आलं.
*फेस रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजी काय आहे?* : ● यानुसार बँकेला लिखित स्वरूपात हयातीचा दाखला देण्याची गरज नाही.
● बँक अधिकारी मोबाईल अॅपद्वारे पेन्शनधारकाच्या चेह-यांची पडताळणी करतील.
● चेहऱ्याचं स्कॅनिंग पूर्ण होताच संबंधित पेन्शनधारकाची अॅप्लिकेशनमध्ये नोंदणी होईल.
● हाच जिवंत असल्याचा डिजिटल पुरावा असेल.
वयोमानामुळे अनेक पेन्शनधारकांना बँकेत जाता येत नाही. अशात ही नवी टेक्नॉलॉजी पेन्शनधारकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
*ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
No comments:
Post a Comment