५-१०रुपयात जेवण देण्याच्या घोषणा करून
मतांची भीक मागण्यापेक्षा
१) शिक्षण आणि वैद्यकीय उपचार मोफत करा.
२) ईच्छूक उमेदवारांची वयोमर्यादा २५-५० एवढीच ठेवा.
३) ईच्छूक उमेदवाराने कमितकमी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलेच असावे.
४) निवडणूक फक्त दोनच वेळा लढवण्याची संधी देण्यात यावी.
५)ज्या खात्याचे मंत्रीपद भूषवायचे असेल त्या खात्याशी संबंधित शैक्षणिक पात्रता हवी.
उदा. आरोग्य मंत्री M.D.च असावी/वा.
अर्थमंत्री सि.ए.च असावी/वा.
कारण साधी तूटपुंज्या पगाराची नोकरी मिळवताना शैक्षणिक
पात्रता, वय, अनूभव आणि इतरही अनेक गोष्टींचा विचार केला जातो.
तर ज्यांना देश चालवायचा आहे त्यांना वरील सर्व गोष्टी का लागू पडत नाहीत.
उलट
आपल्या देशाच्या विकासासाठी सर्वप्रथम आपल्या नेत्यांना वय,
शैक्षणिक पात्रता, अनूभव ह्याचे बंधन असायलाच हवे.
आज आपले
IAS, IPS, IFS, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनिअर, सि ए आणि इतर अनेक उच्चशिक्षित,
अनूभवी लोक अनाडी मंत्र्यांच्या हाताखाली काम करीत आहेत.
हे कटू सत्य आहे.
त्याकरिता सामान्य मतदारांनीच पुढाकार घेऊन ५-१० रुपयांच्या थाळीत
आपले "बहमुल्य मत" टाकण्यापेक्षा जात, धर्म, भाषा, पक्ष, प्रांत विसरून
तरुण, तडफदार सूशिक्षीत उमेदवारालाच निवडणून देण्याचि एक
सूशिक्षीत मतदार म्हणून जबाबदारी/कर्तव्य पार पाडा.
जय हिंद !
जय महाराष्ट्र !
No comments:
Post a Comment