Saturday, November 12, 2022

 🍃☘️🌷🍃☘️🌷🍃☘️🌷🍃☘️

*🌺 छान लेख आहे... जगायचं तर कुणासाठी... वेळ काढून आवर्जून आवश्य वाचा, आणि विचार करा...!!!*🌹💐🌻🙏

*माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो ? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी ८०/९० वर्षांचे आयुष्य जगायचा, आता ७०/८० वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं... आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते... कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं...!!!*

*मग...जगावं तरी कुणासाठी ? तर... जगावं तर ते समाजासाठी... तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा धंदा, व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा.. समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय...!!!*

*आजपर्यंत ज्याच्याकडे खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं सगळेच समजत असतात परंतु तसे मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत...!!!* 

*यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते...!!!🙏*

*आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत...!!!*

 *उदाहरण घ्यायचच झाल तर आताच काही दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते संत गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे... 🤔 फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा. पैश्याचा तर विषयच नव्हता.. चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले..,!!!*

*आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती छत्रपती शिवाजी महाराजांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण प्रत्येकाने निदान एक पिढी तरी आठवणीत लक्षात ठेवेल एवढं तरी कर्तुत्ववान व्हावं..,!!! 🙏

*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका. ज्या कुटुंबासाठी आज आपण जन्मलो व जगतोय, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय.. तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही खात्री व शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं, असे जास्त प्रमाणात शहरी भागात व थोड्या प्रमाणात ग्रामीण भागात दिसत आहे हे असे मुलांचे वागणे योग्य नाही...!!!*

*बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी आई-वडिलांनी खुप लाड केलेले असतात पण म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात आपल्याला परके करून दूर निघुन जातात हे दुर्दैव आहे...!!!*

*या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर कमावले, सांभाळून ठेवले व ते सर्व जीव लाउन ठेवीत जगलो ते कुणासाठी?.🤔...!!!*

*आपली मूल नातेवाईक आपल्याशी जर नीट वागत नसतील तर आपण समाजासाठी जगा... दान-धर्म करा... भुकेलेल्या माणसांना अन्न द्या.. आनंदात जगून घ्या... कुठे फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या...!!!*

*🙏.. परंतु म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र तेवढी साथ देणार नाही, तेव्हा तब्बेत सांभाळूनच प्रवास करा. आपण येताना जरी एकटे आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे, धन्यवाद...👍*

*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...