Saturday, November 12, 2022

: 🍁💐🍁💐🍁💐🍁💐🍁💐🍁


*🌹प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आशा, इच्छा,अपेक्षा मरेपर्यंत संपतच नाहीत. त्यांना योग्य वेळी मर्यादित आवर घाला नाहीतर "अती तेथे माती" या उक्ती सारखा प्रकार होत असतो 👏*

*🌹आपल्या नेहमीच्या आयुष्यात "आशा, अपेक्षा व इच्छा " कधीच कमी होत नाहीत. उलट जस वय वाढेल तसं तश्या इच्छा - अपेक्षा कमी न होता... त्या आनखिनच वाढतच जात असतात. समोरच्यापेक्षा मी किती मोठा आहे, यामध्ये स्पर्धा लागत असते..!!!*

*🌹त्यातही  "अशा आशा, इच्छा, अपेक्षा" एकवेळ व्यक्तिगत, आपल्या कुवतीनुसार असल्या तर त्या चालतील, पण स्पर्धा नको, मात्र खुपदा "त्या" इतरांच्या इच्छा - अपेक्षांना  "छेद " देणाऱ्या असतात.., त्यांना "क्राॅस" करतात. परिणामी अशा अपेक्षा मुळे माणसाला त्या आयुष्यात मनातून थकवतात... व चकवतातही...!!!*

*🌹खरंतर, अपेक्षा आणि समाधान यात अंतर किती आहे. ते एवढेच की, अपेक्षा माणसाला  "खऱ्या सुखा"  पासून दूर ठेवतात...  हाव आणि हव्यास  अवकतीपेक्षा जास्त वाढवतात. तर समाधान... ज्याचं मूळ सकारात्मक दृष्टिकोन व मानसिकतेत आहे, "ते " माणसाला खरं "सुख" देते...!!!*

*🌹तुम्हाला खऱ्या समाधानाचा व सुखाचा लाभ होण्यासाठी रोजचा दिवस आनंदात व चिंतामुक्त जावो. सध्याच्या कोरोनाच्या काळात संसर्ग टाळा, नियम पाळा. स्वतःसह इतरांची काळजी घेऊन सुरक्षित राहा. धन्यवाद...!!!*

*🌹आपला प्रत्येक नवा दिवस तसा नव-नव्या आशा - इच्छा- आकांक्षा घेऊन उगवतो, आणि त्याच डोळ्यांच्या पापण्यांमध्ये तरळणारी स्वप्नं घेऊन मावळतो. सध्याच्या धकाधकीच्या व गतीमान काळात... तरीही "सोय, स्वार्थ आणि गरज"  याभोवतीच माणसे सतत गरगरत फिरणाऱ्या मतलबी स्वार्थी दुनियेत बेवारस भटकत आहेत...!!!*

*🌹प्रत्यक्षात... आपल्यासारख्या   सामान्यांच्या आयुष्यात  "रोजचा दिवस" हा काही "अपेक्षा" घेऊन सुरू होतो. मात्र मावळतो तो काही "अनपेक्षित अनुभव" देऊन ही खरिच  वस्तुस्थिती आहे. होय ती नाकारता येनारच नाही.. यालाच तर आपण आयुष्य म्हणतो...!!!*

*🌹असे असले तरी,अपेक्षापूर्तीचा अनुभव येण्यासाठीही तुम्हाला आजचा दिवस सकारात्मक आनंदात व चिंतामुक्त जावो. व कोरोनाचा संसर्ग टाळून स्वतःसह कुटुंबातील इतरांची काळजी घ्या. धन्यवाद ...!!!*

*🌹एकदा  एकाने विचारले. उत्तम आयुष्याचे व्यवस्थापन म्हणजे काय... [ Life Management ]  उत्तम आयुष्याचे व्यवस्थापन म्हणजे  दुसरे तिसरे काही नाही... कितीही प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली, तरी न डगमगता, कच न खाता  ठामपणे त्या परिस्थितीशी सामना करणे. कितीही राग आला तरी, संयम पाळून स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे, व निस्वार्थीपणे कार्यरत राहणे...!!!*

*🌹अडचणींचा व संकटांचा  बाऊ न करता  नेकीचा प्रामाणिक प्रयत्न करणे.. सचोटीचा मार्ग न सोडणे. परिस्थितीने सत्ता आणि संपत्ती कितीही मिळाली तरी, "त्या" संपत्तीचा गर्व न करणे, संपत्तीचा अनुचितरित्या न "गाजवता", त्यांचा योग्य प्रकारे "वापर/उपयोग" करणे. आणि सत्ता संपत्तिमुळे  उतू नये, मातू नये घेतला वसा टाकू नये". ही उक्ती प्रत्यक्ष आचरणात आणली की आयुष्याचे "योग्य व्यवस्थापन" होतेच. जर असे झाले तर त्यात आश्चर्य  ते काय असेल...!!!*

*🌹शेवटी सर्वार्थाने साधन, संपत्ती व सत्ता अनुकूल परिस्थिती असूनही.. एखाद्याचा ह्रास होतो. तो लयास जातो. आणि  एखादा अभावग्रस्त परिस्थितीवर , कठोर परिश्रमाच्या जोरावर मात करून पुढे येतो. आपले भविष्य साकारतो. ज्याची जशी जिद्द... तसा तो टिकून राहतो. भक्कम राहतो. कोरोनाचा संसर्ग टाळून, सुरक्षितपणे स्वतःसह इतरांची काळजी घेत जा, तुम्हाला रोजचा दिवस नेहमी आनंदात व चिंतामुक्त जावो...!!!*



===================================================
*🌹हा बदल नक्की केव्हा झाला?*🙏

*🌷वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी  करणारा  मुलगा पगार  निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता.... !     मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला   येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात. *मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत/इच्छा आई-वडिलांकडे  नसते...!          हा बदल केव्हा झाला....?* 

*🌷कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला *"अंगभर कपडे घाल" असे म्हणायची हिंमत करत नाही....!                              *हा बदल केव्हा झाला....?*
 
*🌷वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि *स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते.         हा बदल केव्हा झाला......?*

*🌷लग्नाअगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारलेपण मानणारे आता *नातवंडांचे लिव इन रिलेशनशिप स्वीकारतात. हा बदल केव्हा झाला.....?*

*🌷वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता *प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलंपुढे सहज ग्लास भरु लागली. हा बदल कधी झाला....?*
 
*🌷नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी, आता सकाळी योगा क्लास नाहीतर लाफ्टर क्लासला जाते आणि *नातवंडांशी टीव्हीच्या रिमोटसाठी भांडते. हा बदल केव्हा झाला.....?*

*🌷घरातल्या कोणाशी बोलत  नाहीत अशांना कौन्सिलर जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात. पण स्वतःच्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल. नवरा-बायको दोघेही कमावतात. पण कुठे खर्च झाले, किती गुंतवले, कुठे गुंतवले, ते फक्त सीएला माहित असते. *मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई-वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. असं का होतंय.....?* 

*🌷वडीलधा-यांचा मान ठेवणा-यांच्या मुली नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणं-दुणं काढतात. अशा वेळी *मुलीचे आई-वडील कसनुसं हसतात आणि मुलाचे आई-वडील हतबुद्ध होतात. हा बदल कधी झाला.......?*

*🌷तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रीपला जाणे, ब्रेकअप होणे, सिनेमाला जाणे, पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे वगैरे खरेदी करणे, अशा गोष्टीत *आई-वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडतं नाही. असं का होतं..? हा बदल कधी झाला.......?*

*🌷नातेवाईकां कडे जाणं, शेजार्‍यांकडे वेळप्रसंगी जाणं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणे, देवळात जाणे, पूजा करणे, इत्यादी गोष्टींवर *आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात. असं का होतं...? हा बदल कधी झाला.......?*

*🌷मान्य आहे, दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच. पाचवारी नेसणाऱ्या सुनेबद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतं.*

*हा बदल नक्की केव्हा झाला......?खरंच विचार करायला हवा...*



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹


*माणसाला संवादाची,*
*गरज असते का.?*
*कशासाठी.?*
*समजा कुकरमध्ये,*
*खूप वाफ कोंडली आहे,*
*तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही,*
*तर काय होईल.?*
*कुकरचा स्फोट होईल.*
*समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे.*
*आत येणारा झरा नाही,*
*बाहेर जाणारा मार्ग नाही.*
*तर काय होईल.*
*आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल.*
*वास येऊ लागेल.*
*दुर्गंधी येऊ लागेल.*
*मनाचंही असंच असतं,*
*विचारांची देवाणघेवाण झाली नाही,*
*भावनांना वाट मिळाली नाही,*
*की मनात विकृती निर्माण होते.*
*अन यासाठी गरज असते,*
*संवादाची...*
*अन्न,वस्त्र,आणि निवारा,*
*या शरीराच्या मूलभूत गरजा असतील,*
*तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे.*
*संवादाचा अभाव,*
*हे माणसां माणसांत दुरावा निर्माण होण्याचं,*
*एक महत्वाचं कारण आहे.*
*एकाच घरात रहाणारे भाऊबहीण,पतीपत्नी,पितापुत्र,*
*यांच्यात संवाद नसतो,*
*आपली सुखदु:ख,भावना,विचार,*
*यांची देवाणघेवाण करायला,*
*वाव नसतो...*
*काय गंमत आहे बघा,*
*संवादाच्या खिडक्या बंद करुन,*
*माणसं सहजीवन जगत असतात.*
*मग काय होतं,*
*मनाच्या बंद तळघरात,*
*गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो,*
*आणि बघता बघता तो,*
*अक्राळविक्राळ रुप धारण करतो.*
*संवादच संपला की उरतो तो वाद.*
*संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे,*
*संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण.*
*दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते.*
*तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे.*
*ही सुद्धा मनाची गरज असते,*
*या विचारांच्या देवाण घेवाणीने,*
*आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो.*
*आपल्या स्रुजनशीलतेला,*
*नवे पैलू पडतात.*
*आपल्या ज्ञानात भर पडते.*
*आपल्या व्यक्तिमत्त्वाचं,*
*आपल्या उणिवांचं,*
*आपल्याला मूल्यांकन करता येतं.*
*आपलं मानसिक आरोग्य सुदृढ रहातं.*
*थॊडक्यात काय तर,*
*संपन्न व्यक्तिमत्वासाठी,*
*निरोगी मन आवश्यक आहे.*
*आणि निरोगी मनासाठी,*
*संवादाची गरज आहे...!!*
*तेव्हा बोलू लागा...*
*ऐकू लागा...*
*समजू लागा...*
*संवाद साधू लागा...!!*


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*🌴संसारी जीवनात व्यवहारिक अडचण अटळ असते...!!!* 🌴🙏

*☘️ माणूस कितीही सधन असला तरी तो अडचणीत येणारच नाही असे होत नाही.करोडपती असलेले बांधकाम व्यवसायीक, उद्योगपती रस्त्यावर आलेली उदाहरणे आहेत. लोकांचे आणि बँकांचे पैसे बुडविले म्हणून काही परदेशात पळून गेले तर काही तुरूंगात आहेत...!!!*

*☘️ राव असला तरी आणि रंक असला तरी पैशाच्या चणचणीचा अनुभव संसारात घ्यावाच लागतो, अशा चणचणीचा पहिला आघात हा स्वाभिमानावरच होत असतो...!!!*

*☘️ आज पैशासाठी स्वाभिमान विकाणारी, स्वाभिमान गहाण ठेवणारी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात स्वाभिमान लंगडा झाला की लाचारी जीवनात प्रवेश करते आणि एकदा लाचारी जीवनात आली की ते आपले मानसिक मरण असते...!!!*

*☘️ अशी मनाने मेलेली माणसे कितीही कोटीच्या गाडीत फिरली तरी त्यांच्या चेहऱ्यावरची सुतकी कळा झाकत नाही, ही चालती बोलती फक्त प्रेते असतात. अशी प्रेतरूप माणसे कोणाचीही सेवा करू शकत नाहीत आणि यांचे कोणावरही प्रेम नसते...!!!*

*☘️ अहंकारी माणसांचा देव म्हणजे पैसा असतो आणि भक्ती म्हणजे लाचारी असते...!!!*
  
*☘️पराक्रमी आणि वीर पुरूष एकवेळ मरण पत्करेल पण आपल्या स्वाभिमानासी तडजोड करत नाही...!!!*

*☘️ अशी माणसे आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या जीवनातील आर्थिक चणचणीवर मात करतात आणि अगदीच अशक्य असेल तर आपल्या गरजा कमी करतात...!!!*

*☘️ राहणीमानात बदल करतात , जमेल तेवढी काटकसर करतात ,  एकवेळ उपाशी रहायची वेळ आली तरी तेही करतात, पण आपला स्वाभिमान सोडत नाहीत...!!!* 

*☘️ अशी माणसे फाटक्या कपड्यात असूद्यात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे स्वाभिमानाचे तेज अजिंक्य वीराचे असते आणि हे तेज विकत घेता येत नाही आणि कोणत्याही मेकअपने निर्माण करता येत नाही...!!!*

*☘️ही जातीवंत योद्ध्याच्या रक्ताची ओळख आहे आणि हेच आपल्या काया वाचा मने जिवंत असल्याचे लक्षण आहे_ ....!!!*

*☘️ अशी माणसे जीवनातील कोणत्याही अडचणीला आव्हान समजतात आणि लढण्यासाठी यांचे बाहू कायम फुरफूरत असतात...!!!*
 
*☘️ आयुष्य थोडे असले तरी चालेल पण स्वाभिमानी वीराचे असावे, कारण लढणाऱ्याचा  इतिहास घडत असतो आणि  लाचाऱ्यांचा फक्त वापर होत असतो...!!!*

*
     
🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲

 *😊मजेशीर आहे नक्की वाचा🌷🙏*

*🍃चाळीस वर्षांपूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची.आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते...!!!*

*🍃चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची,आता अनेकांना मुले असण्याची भिती वाटते...!!!*

*🍃चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते.आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे...!!!*

*🍃चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे, आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज च्या भीतीने लोक खायला घाबरतात...!!!*

*🍃 चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात...!!!*

*🍃 चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे.आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात...!!!*

*🍃चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत.आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात...!!!*

*🍃चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे.आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात...!!!*
 
*🍃प्रगती म्हणावी का??? अधोगती ह्या गोष्टींना..?? कुठे आणि कसे पोहोचलो आपण थोडा फार प्रत्येक व्यक्ती  ने   विचार  करणं आवश्यक आहे*....??.,,,!!!*

*


🥀🌵🥀🌵🥀🌵🥀🌵🥀🌵🥀

*🌺तुम्ही कितीही चांगले शुद्ध विचाराने रहा, कितीही चांगले काम करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हांला चुकीचे समजते, ती मरेपर्यंत तुम्हांला चुकीचेच, समजणार... कारण दृष्टीचे आॅपरेशन,होऊ शकते...!!!*

*🌺पण दृष्टिकोनाचे नाही ! चालताना पाऊल... बोलताना शब्द... बघताना दृश्य... आणि ऐकताना वाक्य... या चारही गोष्टी काळजीपूर्वक, आचरणात उतरवल्या, तर जीवनात वादळं निर्माण, होणारच नाहीत...!!!*

*🌺एवढ्या लवकरात लवकर, जगातील कोणतीही गोष्ट, बदलत नाही. जेवढ्या लवकर मानसांची, वृत्ती व दृष्टी बदलते.. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं.. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं.. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं...!!!*

*🌺मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं.. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलंत बसायचं.... सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी ...!!!*

 *🌺"चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य. या चारही गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत...!!!*

*🌺"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो, काहींना ओंजळभर मिळते, तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला".. "दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!*

*🌺चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा, जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता. कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात! अगदी तसंच, चांगल्या माणसांच असतं. त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला, उच्च विचार, आणि वेळेचे बंधन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचऊ शकते यावर विश्वास ठेवा...!!!*.                    


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...