------------------------------
------------------------------
एप्रिल २०१९ मध्ये मी लातुरमधल्या आर्किटेक्चर कॉलेजचा जॉब सोडला.
पुण्याला जायचे आहे, एम. आर्च करायचे आहे, हे डोक्यात फिट्ट बसले होते,
पण चौतीसाव्या वर्षी कॉलेजमध्ये नुसतं स्टुडंट बनुन न जाता, प्रोफेसर बनुन गेल्यासच खास मजा येईल, असे मनातुन वाटत होते.
पण शिक्षण शिकता शिकता आपल्याला कोणी प्रोफेसरचा जॉब का ऑफर करेल? अशी शंका एकसारखी सतावत होती,
पण मोठ्या निग्रहाने मी साऱ्या शंकाकुशंका झटकुन दिल्या, आणि मला चांगला जॉब मिळाल्याचे व्हिज्वलायजेशन मन लावुन दिवसरात्र सुरु केले.
२०१९ च्या मे महिन्यात, मी दोन आठवडे पुण्यामध्ये थांबलो, त्या दरम्यान मी जवळपास आठ दहा कॉलेजेस आणि नावाजलेल्या आर्किटेक्चर फर्मस ला भेटी दिल्या.
जॉब मिळण्याची कसलीही लक्षणे दिसेनात.
सगळीकडे एकामागे एक नकार-घंटा वाजु लागली!
नियमानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन शिकताना मला प्रोफेसरचा जॉब मिळणार नव्हता.
मी ही जिद्द सोडली नाही,
प्रत्येक नकार मी हसत हसत पचवला,
त्या दिवसात जॉबच्या शोधात, मे महिन्याच्या तळपत्या उन्हात, मी दररोज पन्नास एक किलोमीटर बाईकवर फिरायचो.
अक्षरशः घामाच्या धारा निथळायच्या, मरु दे जॉब, असेही वाटायचे, इतका थकवा यायचा,
पण सकारात्मक लेख लिहित राहण्याचा एक फायदा होतो, कितीही निगेटीव्ह परिस्थिती असली तरी मन त्या निराशेत जास्त वेळ बुडुन राहुच शकत नाही,
एके दिवशी असाच फिरत फिरत तीसपस्तीस किलोमीटर दुर असलेल्या डीवायपाटील कॉलेजला आलो,
प्रिन्सिपल मॅम ला भेटलो, त्यांना माझी अडचण सांगितली, आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी व्हॅंकन्सी होती.
ब्रम्हांडाने माझ्यासाठी योजना आखुन ठेवली होती.
अविश्वसनीयरित्या फक्त पाच मिनीटात माझा प्रोफेसरचा जॉब पक्क झाला.
मी मनातल्या मनात प्रचंड खुश झालो होतो, अगदी नाचावेसे वाटत होते,
पण चेहऱ्यावरचे हावभाव न बदलु देता, मी तसाच कॉलेजबाहेर पडलो,
एके ठिकाणी रस्त्यात गाडी थांबवली, बॉटलमध्ये मिळतो तो सोडा पिऊन मी सेलेब्रेशन केलं, जल्लोष केला,
आधी आधी अशक्यप्राय वाटणारं, माझं मॅनिफेस्टेशन पुन्हा एकदा काही सेकंदात आस्तित्वात आलं होतं!
नेहमीप्रमाणे विचार जिंकले होते, परिस्थिती हरली होती,
------------------------------
तुम्हाला वाटत असेल, हा दिडशहाणा काय, नेहमीच स्वतःची पाठ थोपाटुन घेतो?
नुसते विचार करुन हवे ते साध्य करता येते, याचे पुरावे देण्यासाठी मला माझे वैयक्तिक अनुभव लिहावे लागतात,
माझ्यावर विश्वास ठेवा,
तुमच्या प्रत्येकाकडे हा अदृष्य ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ रुपी अल्लाउद्दीनचा दिवा आहे,
तुम्ही कधी आपल्या अंतर्मनाची अमर्याद शक्ती अनुभवली आहे का?
अंतर्मनाचं अफाट सामर्थ्य वापरुन ह्या जगात चमत्कार घडवता येतात, ह्यावर तुमचा विश्वास आहे का?
आपल्या सर्वांकडे ही शक्ती आहे, तर मग प्रत्येकाला ह्या खजाना का लुटता येत नाही?
हा खजाना ज्या गुहेत द्डलेला आहे, त्या गुहेत शिरायचे कसे,
त्या गुहेची चावी कशी वापरायची?
अंतर्मनात विचार रुजवुण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे संमोहन! हिप्नोटीझम!
हिप्नोटीझम मध्ये बाह्यमनाला झोपवतात, अंतर्मनाला पुर्ण एक्टीव्ह करतात आणि कमांड देऊन हवं तसं काम त्याच्याकडुन करुन घेतात.
हिप्नॉटाईझ केलेल्या व्यक्तीला गोड आहे असं सांगुन तिखटाआग मिरच्या जरी खायला दिल्या तरी त्याला गोड लागतात, हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे.
अंतर्मनाच्या सुप्त पण अमर्याद शक्तीचा हा पुरावाच म्हणता येईल.
------------------------------
१. अंतर्मनाचं वैशिष्ट्य –
- अंतर्मनात ज्ञानाचं अमर्याद भांडार आहे, ते कधीही रितं होत नाही.
- आपण जे एकदा पाहतो, ऐकतो, वाचतो, ते ह्यात साठवलं जातं, ते कधीच पुसलं जात नाही, कधीनाकधी ते माणसाला पुन्हा कधीतरी आठवतं.
- आपल्या बहिर्मनात येणारे, सहज आपल्या कानी पडणारे विचार अंतर्मन टिपत असतं!
- मनातलं नकारात्मक विचारांच तण जर आपण प्रयत्नपुर्वक उपटुन नाही काढलं, तर आयुष्याच्या झाडाची पानगळ व्हायला अजिबात वेळ लागत नाही.
------------------------------
३) अंतर्मनात जे पेरलं जातं तेच उगवतं!
- जे वारंवार बजावलं जातं, ते अंतर्मन स्वीकारतं!
- अंतर्मनाला विवेकबुद्धी नसते, ते फक्त आज्ञा पाळतं!
- तुम्ही स्वतःशी संवाद साधताना म्हणाल,
‘हे अवघड आहे’,
‘हे होणं शक्य नाही’
‘हे जग खुप वाईट आहे’
‘माणसं विश्वासपात्र नसतात.’
‘बापरे! आता माझं काही खरं नाही,’
‘मला हे जमणार नाही’
‘माझं नशिबचं फुटकं’
‘नेहमी माझ्या बाबतीतच असं का होतं?’
- असे वाक्य स्वतःशी पुन्हा पुन्हा बोलणं, म्हणजे अंतर्मनाला असं वागण्याची, असं घडवण्याची आज्ञा देणं!
- तुमचं अंतर्मन तुम्हाला असेच मिळतेजुळते वाईटसाईट अनुभव देणारी परिस्थिती उपलब्ध करुन देईल,
- ह्याऐवजी आपण आपली प्रोग्रामिंग काही छानशी वाक्य बोलुन केली तर!.....
अफरमेशन साठी तयार केलेलं प्रत्येक वाक्य शक्य तितक्या जास्त वेळा मनातल्या मनात न वाचता, मोठ्याने वाचा.
- ह्या स्वयंसुचना खरोखर तुमचं जीवन बदलुन टाकतील.
------------------------------
२. आरोग्य –
- माझं शरीर आणि माझं मन एकच आहेत.
- शरीरातल्या पेशींपेशींवर माझं नियंत्रण आहे.
- आजारातुन बरं होण्याची नैसर्गिक शक्ती माझ्या अंतर्मनात आहे, आता ती प्रकट होत आहे.
- माझं मन प्रसन्न आहे.
- माझं शरीर दिवसेंदिवस अधिकाधिक आरोग्यसंपन्न होत आहे.
- जीवनावर माझी श्रद्धा आहे.
- ह्या श्रद्धेमुळेच माझं शरीर, माझं मन नव्या चैतन्यानं भरुन जात आहे.
------------------------------
३. यश –
- आयुष्यात मला यश, आनंद, वैभव मिळवणं, हा माझा हक्क आहे.
- माझ्या क्षमतेची व पात्रतेची मला पुर्ण खात्री आहे.
- माझ्या अंतर्मनाच्या अमर्याद शक्तीचीही मला जाणीव आहे.
- त्या शक्तीवर माझा पुर्ण विश्वास आहे.
- दिवसेंदिवस माझ्या प्रयत्नांना यश लाभत आहे.
- माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझी प्रतिभा मी सतत वापरत आहे व मला तिचा पुरेपुर मोबादला मिळत आहे.
------------------------------
४. स्मरणशक्ती –
- माझी स्मरणशक्ती आता दिवसेंदिवस सुधारत आहे,
- ऐकलेलं, वाचलेलं सारं माझ्या व्यवस्थित लक्षात राहत आहे,
- हव्या त्या वेळी, हवं ते मला सहजपणे आठवतं,
- पुर्वीपेक्षा माझी स्मरणशक्ती उत्तम झाली असुन ती अधिकाधिक वाढतच जाणार आहे.
------------------------------
५. क्षमा –
- झालेल्या प्रकाराबद्दल मी ___ ला मनोमन क्षमा करत आहे.
- त्याच्याबद्द्ल माझ्या मनात कसलाही राग किंवा द्वेष नाही.
- त्याच्याबद्दलच्या सर्व विचारातुन मी मुक्त झालो आहे,
- माझं आयुष्य मला आनंदात जगायचं असुन आता कुणामुळेही मी दुखावला जात नाही.
------------------------------
६. पैशाचं उद्दिष्ट्य –
- ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मी ------ लाख रुपये मिळवणार आहे.
- हे पैसे मी ___ म्हणुन देणार असलेल्या सेवेबद्द्ल मला मिळतील.
- माझ्या पुर्ण क्षमतेनुसार मी लोकांना सर्वोत्तम अशीच सेवा देणार आहे.
- माझ्या कामामुळे सर्वांनाच भरपुर लाभ होणार असल्यामुळे मला हवे तेवढे पैसे मिळणारच ह्याची मला खात्री आहे.
- मला हवा असलेला पैसा मला मनःचक्षुंपुढे स्पष्ट दिसतो आहे.
------------------------------
७. चिंतामुक्ती –
- चिंता करुन काहीच साध्य होत नसतं, हे मी जाणतो.
- जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, ह्यावर माझा विश्वास आहे,
- अगदी वाईटात वाईटातुनही चांगलंच काहीतरी घडतं, हे मी अनेकवेळा अनुभवलेलं आहे.
- परिस्थिती कायम बदलणारी असते, ह्याचं मला भान आहे.
- प्रत्येक प्रश्णावर काही ना काही उत्तर असतं, प्रत्येक अडचणीवर मार्ग निघतो, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.
- ज्या बाबतीत मला काही करणं शक्य आहे, अशाच गोष्टींवर मी आपलं संपुर्ण लक्ष केंद्रित करतो.
- मी माझं मन नेहमी चांगल्या, सकारात्मक, स्फुर्तीदायक विचार कल्पनांमध्ये गुंतवुन ठेवतो.
- म्हणुन नेहमीच माझे विचार मला आनंदी, उत्साही आणि निरोगीच ठेवतात,
------------------------------
आपल्या मोबाईलमध्ये ह्या आणि अशा अनेक स्वयंसुचनांच्या रेकॉर्डींग बनवा,
स्वतःच्या धीरगंभीर आवाजात ह्या सुचना रेकॉर्ड करा,
त्या सकाळ संध्याकाळ पुन्हा पुन्हा ऐका,
फावल्या वेळात त्या पुन्हा पुन्हा घोका, आठवा,
मनातल्या मनात उजळणी करा,
नियमित नव्वद दिवस हे कराल तर तुमच्या जीवनात होत असलेला बदल तुम्हाला निश्चितपणे जाणवु लागेल.
आभार आणि शुभेच्छा!
No comments:
Post a Comment