Saturday, December 24, 2022

!! थोड जगलं पाहिजे.........!!


@आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात.

@गजर तर रोजचाच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

@आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.

@भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

@कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

@संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
"फुलपाखराच्या" सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

@द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

@रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||

@आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई 
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई

@ मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

@ ७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे

@बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू

@आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

@खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

@गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

@सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

@शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

@वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !

@आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

@स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

@क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

@पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||

@आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

@आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या face बुक chatting ला नाही

@गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले || ६

@आयुष्य काय असते पहा
चालता बोलता आपल्यातुन कोण कधी निघून जाईल याचा काही नेम नाही
जायचे तर एक दिवशी सर्वानाच आहे
कोणी आधी जाणार कोणी नंतर जाणार
मग या एवढ्याश्या आयुष्यात पण आपण सर्वांशी प्रेमाने राहू शकत नसु तर या जगण्याला काय अर्थ आहे
माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की आपल्या माणसांना कधीच दुखवु नका
कोण कधी आपली साथ सोडून जाईल
किवा
आपण कोणत्या क्षणी या जगाचा निरोप घेऊ याची शाश्वती नाही
म्हणुन आनंदाने रहा व सर्वाना भरभरून प्रेम दया
सर्वांच्या मदतीसाठी कायम उभे रहा

हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांची समाधी स्थळे यादी:-

 हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांची समाधी स्थळे यादी:- 

१) *मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे*
२) *लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि. बुलढाणा*
३) *शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी कर्नाटक*
४) *संभाजीराजे भोसले - कणकगिरी जि. कोप्पल कर्नाटक*
५) *राजमाता जिजाऊ आऊसाहेब - पाचाड जि. रायगड*
६) *छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि. रायगड* 
७) *बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे*
८) *कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे*
९) *जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे*
१०) *शिवा काशिद - पन्हाळगड जि. कोल्हापूर* 
११) *बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर*
१२) *फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर*
१३) *मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे*
१४) *तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड*
१५) *प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर*
१६) *बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा*
१७) *बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.सांगली*
१८) *मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी*
१९) *छत्रपती शंभूराजे - वढू बुद्रुक जि. पुणे*
२०) *हंबीरराव मोहिते - तळबीड ता. कराड जि. सातारा*
२१) *बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि. रायगड*
२२) *कवी कलश - वढू बुद्रुक जि. पुणे*
२३) *छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि. पुणे*
२४) *संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा*
२५) *धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर*
२६) *बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक*
२७) *रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर*
२८) *शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि. पुणे*
२९) *परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि. सातारा* 
३०) *महाराणी ताराराणी भोसले - संगम माहुली जि. सातारा* 
३१) *लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग*
३२) *छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि. सातारा*
३३) *छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि. कोल्हापूर*
३४) *पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर जि. पुणे*
३५) *पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण मध्यप्रदेश*
३६) *चिमाजी अप्पा पेशवे - शनिवारवाडा जि. पुणे*
३७) *पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे*
३८) *पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे*
३९) *कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड*
४०) *रघुजी भोसले - नागपूर जि. नागपूर* 
४१) *संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग*
४२) *जानोजी भोसले - नागपूर जि. नागपूर*
४३) *फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर*
४४) *जोत्याजी केसरकर - पूनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर*
४५) *नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक*
४६) *त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा गुजरात*
४७) *पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात* 
४८) *दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात*
४९) *यशवंतराव पवार - धार जि. धार मध्यप्रदेश*
५०) *तुकोजीराव पवार - देवास मध्यप्रदेश*
५१) *जिवाजीराव पवार - देवास मध्यप्रदेश*
५२) *मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड मध्यप्रदेश*
५३) *महाराणी अहिल्याबाई होळकर - महेश्वर मध्यप्रदेश*
५४) *राणोजी शिंदे - उज्जैन मध्यप्रदेश*
५५) *महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे*
५६) *आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग* 
५७) *नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि. पुणे* 
५८) *सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले जि. अहमदनगर* 
५९) *महाराणी सईबाई भोसले - गुंजवणी नदी ता. भोर जि. पुणे*
६०) *महाराणी येसूबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा* 
६१) *महाराणी राजसबाई भोसले - पन्हाळगड जि. कोल्हापूर* 
६२) *भवानीबाई (येसूबाई कन्या) - पाटण जि. सातारा*
६३) *शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड*
६४) *रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि. कोल्हापूर*
६५) *कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे*
६६) *दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे* 
६७) *सूर्याजी काकडे - किल्ले साल्हेर जि. नाशिक*
६८) *गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे*
६९) *हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली जि. रायगड* 
७०) *मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड*
७१) *अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड*
७२) *म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी* 
७३) *राणोजी घोरपडे - नागपूर* 
७४) *रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा*
७५) *शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि. पुणे*
७६) *संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड जि. पुणे*
७७) *खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे*
७८) *उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे*
७९) *उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद*
८०) *नाना फडणवीस - नानाचा वाडा पुणे*
८१) *रामशास्त्री प्रभू - माहुली संगम जि. सातारा*
८२) *छत्रपती अप्पासाहेब - माहुली संगम जि. सातारा*
८३) *नारायणराव पेशवे - शनिवारवाडा पुणे*
८४) *रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर*
८५) *सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा पुणे*
८६) *सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि. पुणे*
८७) *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज:- वढू तुळापूर पुणे*

🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 

*आमचं ईमान गडकिल्यांच्या मातीशी...!*

*आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...!*

*पुढच्या पिढीला सांगू कर्तबगारी छ्त्रपती शिवशंभू राजेंची...!*

*इतिहास फक्त वाचुनच नाही तर प्रत्यक्षात गडकिल्यांना भेटून अनुभवायचा असतो...!*

*गडकिल्ले स्वच्छ ठेवा व गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखा...!*

*सह्याद्रीतील सुख हे शब्दात मांडता येत नाही, ते प्रत्यक्षात अनुभवायला लागतं...

*🚩जय जगदंब जय जिजाऊ🚩*
*🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩*
*🚩जय गडकोट जयस्तो मराठा🚩*

“आगोठ”-- बळीराजाच्या जीवनातील अविभाज्य घटक

    लग्न समारंभाचा उच्चांक गाठणारा, “हळदी” मुळे गाजलेला, गर्दीमुळे स्मरणात राहणारा "मे" महिना संपला व पाऊस देणारा जून महिना सुरू होतो. 7 जूनला "मृग" नक्षत्राचा प्रारंभ होतो. शेतकरी पावसाची अपेक्षा करीत पेरणी करतो व नांगरणीसाठी सज्ज होतो. पावसाची रिपरिप, सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट व विजांचा चमचमाट सहन करण्याची क्षमता तयार होते. पेरणी, लावणी व नांगरणीची आणि लावणीची कामे सुरळीत होण्यासाठी तो "आगोठी" ची कामे उरकण्यात तो दंग होतो. यंत्र युगाचा प्रभाव वाढल्यामुळे माणूस काहीसा आळसावला आहे. शेतकऱ्याची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत आहे. पारतंत्र्य काळात विकासाचा सूर्य खेडोपाडी उगवलेला नव्हता. गावाकडे जाण्यासाठी पाऊलवाट हीच "वहिवाट" होती. शेतकऱ्यांच्या साथीला फक्त बैलगाडी होती. पाऊस पडला की गावाकडे तसेच भातशेतीकडे जाणारे सर्व रस्ते बंद होत. पर्यायाने बैलगाडी बंद होत असे. म्हणून बैलगाडीच्या सहाय्याने होणारी कामे पावसाची सर पडण्यापूर्वी उरकली जात. सर्वत्र अठराविश्व दारिद्रय असल्यामुळे कच्ची घरे होती. मातीची घरे पेंढ्याने अगर गवताने शाकारली जात. पेंढारू घरे ऊन, वारा व पावसामुळे काळीकुट्ट होत. म्हणून ती दरवर्षी शाकारावी लागत. "केंबळी" (ऊन व पाऊस खाल्ल्यामुळे काळाकुट्ट झालेला पेंढा) राबासाठी उपयुक्त ठरतो. पूर्वी राब शेणाने तयार करून ते केंबळी अगर पाला - पाचोळ्याने भाजत असत. अशा राबात केलेल्या पेरणीत 21 दिवसांच्या कालावधी नंतर रोपे लावणीयोग्य होतात. तर अति मेहनतीने तयार केलेली रोपे १८ दिवसांत लावणीयोग्य होतात. अलिकडे राब शेणाऐवजी (शॉर्ट कट) कृत्रिम खताच्या सहाय्याने तयार करतात. पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस अखंडित पडत असे. म्हणून काही शेतकरी 20-20 खंडीच्या शेतीची लावणी वट पौर्णिमेला पूर्ण करीत असत. या हंगामात गावात दिवसा माणसे दिसत नसत. बाजारपेठा ओस पडत. एस.टी. मध्ये प्रवासी कमी होत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढलेली असे.

      पूर्वी दळणवळणाची साधने पुरेशी नव्हती. बैलगाडी हेच शेतकऱ्याचे वाहन होते. सर्वत्र कच्चे रस्ते होते. पावसाची पहिली सर येताच हे रस्ते बंद होत. म्हणून घराला लागणाऱ्या वस्तू - किराणा माल, कापड - चोपड, घोंगड्या, गुरांचे खाद्य इ. पाऊस पडण्यापूर्वी बैलगाडीने बाजारातून आणीत. पूर्वी मिक्सर, ग्राइंडर, रोटीमेकर, कटर, वा़ॕशिंग मशीन अजिबात नव्हत्या. घरटीने भात भराडले जाई. पाखडून तूस व भात वेगळे केले जात असे. जात्याने तांदूळ दळून भाकरीसाठी पीठ काढले जाई. घराघरात उखळ - मुसळ, जाते - घरटे कुऱ्हाड, विळा, कोयता , खरळ यांना मानाचे स्थान होते. घरटी तसेच जाते - वरवंट्यास वापरल्यामुळे (घर्षण झाल्यामुळे) "टाकी" देत असत. आता यंत्र युग सुरु झाल्यामुळे "टाकी" देऊन उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरापासून दूर असलेल्या विहिरीतून पोहऱ्याच्या सहाय्याने पाणी काढून ते हंड्यात भरत. हे हंडे डोक्यावरून वाहून आणत असत. पाणी भरण्याचे काम महिला सूर्योदयापूर्वी करीत.त्यानंतर दिवसभराची कामे त्या उरकीत असत. अवयवांची भरपूर हालचाल व प्रदूषण विरहित वातावरण असल्यामुळे महिला आजाराला सहसा बळी पडत नसत. गरोदर महिला दैनंदिन कामे करता करता खाजगी सुईणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूत होत. आजच्यासारखी "सिझरिंग" ची पद्धती नव्हती. 
     "इरले" व "घोंगडी" झाले इतिहासजमा "आगोठ" हा शेतकऱ्यांचा कसोटीचा काळ असतो. शेताच्या बांधबंदिस्तीची कामे "वेळीच" उरकावी लागतात. घराची शाकारणी, गुरांच्या वाड्याची डागडुजी करावी लागते. जळणासाठी लाकूड फाटा आणून तो वाळवून त्याची साठवणूक करावी लागत असे. कारण सुकी फाटी असतील तरच पावसाळी चूल पेटते. व हंगामात वेळीच जेवण होते. गुरांसाठी -विशेषत; नांगरणी करणाऱ्या गुरांसाठी - पेंढा खरेदी करावा लागतो त्याची गोठ्यात साठवणूक केली जाते. घराची व वाड्याची दुरुस्ती होते. वेळ प्रसंगी छप्पर बदलावे लागते. भात बियाण्याची विशेष काळजी घेतो. बैललगाडी सतत वापरात असल्यामुळे बैल मांडवात (घराजवळ) बांधलेले असतात. पूर्वी रेडे राना - वनात सोडलेले असत. पेरणीपूर्वी त्यांना शोधून आणत. नांगरणी करणे हे अति कष्टाचे व त्रासाचे काम असते. म्हणून नांगरण्यास अति महत्त्व असते. तो आधीच "बुक" करावा लागतो. शिवाय त्यास "ॲडव्हान्स" द्यावा लागतो. पूर्वी ट्रॅक्टर व पॉवर टिलर नव्हते. म्हणून "नांगर" वादातीत होता. नांगर तयार करण्यासाठी इसाड, लुमणी, जोकड, शिवला, पालवा, या वस्तू विशिष्ट आकाराच्या असाव्या. त्या रानावनात जाऊन शोधाव्या लागत. त्यानंतर सुतार त्या लाकडाची साफसफाई करून "नांगर" तयार करतो. नांगराचा फाळ साधारणतः जमिनीत 6 ते 8 इंच खोल जावा लागतो. शिवाय बैलाच्या उंचीनुसार नांगर तयार करावा लागतो. बैलाचा व रेड्याचा नांगर यांच्या जोडणीतही फरक असतो. नांगरणी करताना दगडधोंडे व झाडाची मुळे आड आल्यामुळे नांगर मोडतो, नांगरणीत अडथळा येऊ नये म्हणून नांगर त्वरित दुरुस्त करावा लागतो. पूर्वी रस्ते नव्हते. चिखल व दगड- धोंड्यातून वाट तयार करावी लागे. नांगर खांद्यावर टाकून बैल सोबत घेऊन नांगऱ्या अनवाणी शेतापर्यंत जात. पडत्या पावसात, थंडीवाऱ्यात नांगरणी करावी लागते, वेळप्रसंगी पडत्या पावसात बांधावर जेवण उरकावे लागते. नांगऱ्यास घोंगडीचा आधार असतो, प्लॅस्टिक कापड, खोल, रेनकोट पूर्वी नव्हते, नांगऱ्यासाठी घोंगडी खरेदी केल्यानंतर तिचा खडबडीतपणा जाण्यासाठी ती "मळावी" लागते. शिवाय "रोठ" घालावी लागते. तरच ती वापरण्यायोग्य होते व दीर्घ काळ टिकते. घोंगडीमुळे नांगऱ्याचे दोनही हात मोकळे असतात. एका हाताने नांगर व दुसऱ्या हाताने पालवा धरु शकतो. घोंगडीमुळे मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऊन, थंडी यांपासून संरक्षण होते. घोंगडीला "ऊब" असते. डोक्यावर ती व्यवस्थित बसण्यासाठी विशिष्ट तऱ्हेने "बुचडी" बांधावी लागते. तिच्या निऱ्या दोन इंच रुंदीच्या असतात. बुचडी घट्ट बांधण्यासाठी वळीव सुतळ वापरतात. दिवसभर चिखलात व पावसात असणारी घोंगडी कडकडीत वाळण्यासाठी रात्री चुलीवर (पूर्वी गॅस सिलेंडर नव्हते) टांगलेल्या विशिष्ट आकाराच्या लाकडी बेचकीवर टाकीत असत. चूल पेटताच ती कडकडीत वाळत असे. नांगऱ्याचे काम अतिकष्टाचे असते. म्हणून त्यास सकाळी न्याहरी, दुपारी जेवण व रात्री "पोस्त" व जेवण द्यावे लागते. "फाळधुणी" च्या दिवशी तो "पाहुणा"च असतो, आता "घोंगडी" लुप्त झाली आहे. 
      इरले - पावसाळा, लावणी व इरले हे समीकरण ठरलेले होते, लावणी करताना, गुरे राखताना, घराबाहेर पडताना "इरले" हवेच. इरले डोक्यावर घेतल्यामुळे दोनही हात काम करण्यास मोकळे असतात. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच ऊन यापासून संक्षण होते. येथे छत्री निरुपयोगी ठरते. ती वाऱ्यामुळे उडून जाते. बांबूच्या चिरीव कांबींपासून विशिष्ट आकाराचे "इरले" बनवितात. त्यासाठी साधारणतः ओला बांबू वापरतात. इरल्याच्या आच्छादनासठी पळसाच्या पानांचा वापर करतात. पानांना अपेक्षित आकार येण्यासाठी ती खडखडीत वाळवून पाण्यात बुडवून मऊ करतात. इरल्यावर रचलेली पाने सरकू नयेत म्हणून ती ओल्या काथ्याने अगर झाडाच्या सालीने घट्ट बांधतात. इरल्याच्या प्रत्येक आऱ्यामध्ये ४ इंचांचे अंतर असावे. पावसाळ्यात इरले सर्व ठिकाणी वापरत. आता ही जागा छत्री, रेनकोट, खोल इ. नी घेतली आहे. इरले झटकन वाळत असल्यामुळे घोंगडीप्रमाणे वाळविण्याची गरज पडत नाही. इरले दृष्टीस पडताच पावसाळी वातावरण निर्मिती होत असे. अस्तास गेलेले "इरले" व "घोंगडी" चे तंत्र नवीन पिढीने आत्मसात करावे, हे आवाहन!

-श्री.बळवंत वालेकर
संपादक, साप्ताहिक कुलाबा वैभव तथा ज्येष्ठ पत्रकार, अलिबाग
संपर्क क्रमांक- 9921074140
00000

 1⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲


2⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

 3⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

4⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

5⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

6⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

7⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

8⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

9⃣ *_BEST STUDY GROUP_* 📲

🔟 *_BEST STUDY GROUP_* 📲


*_यह सभी ग्रुप सामान्य ज्ञान (STUDY) के लिए बनाया गया हैं।_* 🙏🙏🙏
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...