*वेळ द्या आपल्या साठी
*
मागे एक दोन महिन्यांपूर्वी मी तिला मेसेज केला.फेसबुक वर.
Hii कशी आहेस?काय चालु आहे?
(आता आम्ही तसे मित्र आहोत.म्हणजे एकमेकांशी कुठे भेटलो तर बोलतो म्हणजे अगदीच अनोळखी नाही.)
तर तिचा रिप्लाय असा आला
---मी खूप बिझी असते.महत्वाचे काय ते बोल.
मी फक्त बर म्हणलो.पुन्हा मेसेज करणार नाही हे ठरवूनच.
ती काहीतरी ट्युशन घेते इतके समजले.
असू शकतात लोक बिझी. आणि असावे.
पण समोरचा कधीतरी खूप दिवसांनी बोलतोय तर काही मिनिटे देऊ शकत नाही? बर त्यावेळेला जाऊदे पण आपण नंतर बोलू हे तरी बोलू शकतो ना.आणि समोरचा खूप पकवतोय तर गोष्ट वेगळी.
असो.
मग मी या अनेक बिझी लोकांचा स्टडी केला.माझे इव्हन तुमचे ही अनेक मित्र परिवार असा असेल जो कायम बिझी.
माझे बालमित्र,कॉलेजमित्र असे अनेक जण त्या त्या काळात खूप घनिष्ठ होते.असे वागत जणू मैत्री म्हणजे हेच उदाहरण.
पण हे समजले की,काळ जसा पुढे जाईल आणि सो called एखादा वेल सेटल जॉब मिळाला,लग्न झाले की अशी काय अहंकाराची नकळत झालर लागते की या लोकांना साधी माणसे,साधे मित्र नकोसे होतात किंवा दूर दूर जातात.
अनेकांना आपण एकट्यानेच पुढे जावे,मोठे व्हावे असे वाटते.
मग कधीतरी कोणी बँक मॅनेजर,कोण गव्हर्नमेंट नोकरदार कोण IT तर अजून कोण चांगला ऑफिसर झाला तर नेमके ही लोक का बदलत असावीत??
म्हणजे त्यांचे स्टेटस,राहणीमान बदलून किंमत वाढते म्हणून??
की खिशात खूप पैसा खळखळतो म्हणून??
याचा अर्थ तुम्ही चोवीस तास नेहमी संपर्कात राहावा असा नक्कीच नाही.
कधीतरी महिन्यातुन एकदा स्वतःहून एखादा कॉल आला तरी अनेकवेळा जिंकता येते.
कसा आहेस? काय करतोस? सर्वजण ठीक आहेत ना?? ही साधी वाटणारी वाक्ये पण किती आधार देतात.
कधीतरी स्वतःहून मेसेज तरी केला तर काही चुकेल का?जग इतके जवळ आले असूनही?काही महाशय तर एखाद्याला वाढदिवस निम्मित शुभेच्छा फक्त "HBD" लिहून देतात.बापरे किती ते कष्ट अन किती मोठं मन नाही का.
पण नाही.आम्ही कोणीतरी वेगळे आहोत.
अहो ठीक आहे.सिकंदर बिचारा जाताना सांगून गेला शेवटी काही राहत नाही.
रावण असो किंवा पृथ्वी तलावावरील कोण कायम आहे?
तुमचा अहंकार??
माझा असाच एक मित्र आहे.खूप कामात व्यस्त.नुकतेच त्याच लग्न झालं.आई सतत त्याच उदाहरण देते बघ तो कसा हुशार आहे.अमुक तमुक.
तर त्याच्या लग्नाला त्याचे मोजून चार मित्र होते.
बिचारा एकटाच पळत होता.पत्रिका वाटण्यापासून खूप काही करताना दमछाक दिसत होती.
असेच अनेक माझे मित्र आहेत.मोठमोठ्या पोस्ट वर काही अपवादात्मक सोडले तर अनेकजण गर्विष्ठ अन बिझी.
पैसा, धावपळ,मला अजिबात वेळच नसतो,स्टेटस,बॉस,वीकएंड एन्जॉय, मोजकेच अन एकाच पातळीवरचे मित्र ,माझा जॉब,
माझं अमुक तमुक म्हणणारी आज कोरोनाने ठप्प केलं.आक्ख जग.
काय केलं?
सांगू शकताल त्याला??I am busy.
मी कोरोनाच समर्थन करत नाही पण अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या.
आपलं जवळच कोण,लांबच कोण अन नावाला मित्र कोण हे दाखवले.
आणि जे आपले आहेत त्यांचे कॉल येतात किंवा करू वाटतात.
परवा त्या बिझी मुलीचा वाढदिवस होता.लॉककडाऊन मध्ये.
पण मी शुभेच्छा नाही दिल्या.मी बिझी होतो.माझ्या वाचनात,माझ्या इतर अनेक गोष्टींत

माणूस पैशांनी श्रीमंत असावा नक्कीच.पण सोबत माणसे तराजूत न तोलता मोठ्या श्रीमंत मनाने जपणे काय कठीण आहे??
अर्थात संगत पण ओळखता यावी.उगाच करायचे म्हणून कुठलेही वाईट विचारांचे मित्र नकोच.
दोन दिवसांपूर्वी माझ्या मित्राची आई वयोमानानुसार आजारपणातून देवाघरी गेल्या.
आज त्याला कॉल केला.विचारपूस केली.काळजी घे सावर असे चार शब्द बोललो.
शेवटी तो मनापासून म्हणाला,
"खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून,
"
"पैशांत ताकद जास्त नक्कीच असेल पण त्यापेक्षा जास्त मनाच्या श्रीमंतीत,दिलदार स्वभावात असेल.त्याच स्टेटस ठेवता येत नाही पण माणसे नक्कीच जोडून ठेवू शकतो.
शेवटी कोणीतरी म्हणलेच आहे,
Give Respect
Take Respect

No comments:
Post a Comment