चर्च, मंदिर, मशिदींनी
घेतला मोकळा श्वास
ना कुणी भक्त
ना कुठला हव्यास
ना कुठली ईच्छा
आता सर्वांना फक्त
"जगणे" हाच ध्यास
जाती,धर्म स्वार्थापायी
ज्यांनी उठवले होते रान
त्या कट्टरांच्या तलवारीही
आता झाल्या म्यान
आता ना कसले वाद
ना कुठला उन्माद
सर्वजण घरी घेत आहेत
घरच्या जेवणाचा आस्वाद
कोंबड्या, बकरींनाही
मिळाले तुर्तास जीवनदान
शाकाहारात शोधू लागले
जेवणाचे समाधान..।
विदेशातही झाला चमत्कार
अलिंगन सोडून
करत आहेत
एकमेकांना नमस्कार
ऐषोरामाचा माज उतरून
अचानक आले भान
जुनाट भारतीय संस्कृतीचा
वाटू लागला अभिमान
माॅल, थिएटर, जीम, बागा
सर्व चंगळवाद झाला बंद
मोठमोठ्या, अलिशान
गाड्यांचा वेग झाला मंद
धर्म, जात, देश अथवा
तुमचा कुठलाही असो वंश
निसर्गाचा असा एक अंश
करेल जगाचा विद्धंस
निसर्गाच्या एका अंशाने
अशी दाणादाण उडवली
कोटीच्या कोटी माणसे
घाबरून लपून बसली
ना चालली कुठली शस्त्र
ना चालले कुठले अस्त्र
ना चाले कुठले तंत्रज्ञान
आज फिके पडे सारे
आपले प्रगत विज्ञान...
निसर्ग हाच देव
निसर्ग हाच धर्म
निसर्गाला जपणे
हेच आपले कर्म...


No comments:
Post a Comment