थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – पेराल ते उगवेल!...
------------------------------ ------------------------------ -----
पुराणांमध्ये एक गोष्ट मजेशीर गोष्ट आहे.
एकदा डाव्या हाताने उजव्या हाताशी जोरदार आणि खडाजंगी भांडण केलं, डाव्या हाताने रागारागाने सर्वांना सवाल केला,
“कुठल्याही शुभ कार्याला उजवा हातालाच मान का? त्याच्यापुढे मला सतत गौण स्थान का?”
सगळेजण डाव्या हाताची समजुत घालत होते, पण तो मात्र प्रचंड चिडलेला होता,
त्याच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणापाशीही नव्हतं!
संतापलेला डावा हात, तणतणत आपलं गाह्राणं घेऊन देवापाशी गेला,
देवाने डाव्या हाताला हसत हसत उत्तर दिले, “तु कनिष्ठच राहीलास, कारण दान देताना तु कधीही पुढाकार घेतला नाहीस.”
मित्रांनो,
ह्या जगात दोन प्रकारचे लोक बघायला भेटतात, 'देणारे' आणि 'घेणारे'!
विंदा आपल्या कवितेत म्हणतात, तसं, देणारे देतच राहतात, त्याबदल्यात त्यांना अतुलनीय आनंद मिळतो.
कोणी जगाला प्रेम देतो, कोणी गरजुंना पैशाचं, वस्तुचं दान देतो,
कोणी तहानलेल्यासाठी पाणीपोई उघडुन तडफडणार्यांची तहान भागवतो, कोणी अन्नछत्र उघडुन भुकेलेल्यांचा आत्मा तृप्त करतो.
देण्यार्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निसर्ग!
झाडाचचं उदाहरण घ्या ना,
झाडे माणसाला ऑक्सीजन देतात, झाडं वाटसरुंना सावली देतात,
भाविकांना सुगंधी फुलं देतात, भुकेलेल्यांना चवदार आणि व्हिटॅमिन असलेली फळं देतात,
ढगांना थंड हवा देऊन थांबवतात, आणि आपला मित्र पाऊस ह्याला मनसोक्त बरसवायला भाग पाडतात,
आपल्या आस्तित्वानेच धरणीमातेला तृप्त करतात.
माणसासाठी विषासमान असलेला कार्बन शोषुन हवा वातावरण शुद्ध करतात,
आपल्या मुळांनी सुपीक मातीला गच्च धरुन ठेवतात.
आणि माणसं त्याला तोडायला आली की शेवटी हसत हसत त्याला आपलं सर्वस्व असलेलं खोड, फांद्या असलेलं, लाकुडही देतात, कृतघ्नी माणसं मात्र निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांची कत्तल करतात.
असंच एक डोळ्यात पाणी आणणारं बलिदान म्हणजे सैनिक! ते देशासाठी संपुर्ण आयुष्य देतात, स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, महत्वकांक्षा, मौजमजा बाजुला ठेवतात, देशातले लोक कितीही कृतघ्न असले तरीही भारतमातेला डोळ्यासमोर ठेवुन, आपला अनमोल जीव देतात, त्यांचा परिवारही खरा बहादुर असतो, कारण ते आपला जीवाभावाचा माणुस देशावर ओवाळुन टाकतात.
संत, महापुरुष कसल्याही अपेक्षेविना जगावर प्रेमाचा वर्षाव करतात. ते ज्ञान देतात, विश्वालाच आपलं घर समजुन इतरांना आनंदी भारमुक्त बनवुन त्यांची दुःखे आणि चिंता स्वतः झेलतात.
‘देणं’ ही जगातली सर्वात सुंदर कृती!
देणारे कधीही फायद्यात राहतात. जसं की आपल्या हाताने अत्तर दुसऱ्याला लावलं, की नकळत त्याचा सुगंध दिवसभर आपल्याही हाताला दरवळतो.
देणाऱ्यांना भरभरुन मिळतंसुद्धा, छानसं स्मितहास्य दिलं की समोरुनही मनःपुर्वक स्वागत होतं,
आपलेपणाने मदतीचा हात दिला की ह्र्दयपुर्वक आभार आणि सकारात्मक स्पंदने मिळतात, आपलेपणा, जिव्हाळा आणि प्रेम दिलं की भरभरुन कित्येक पटीने हे सगळं वापस येतं,
एकदा आमच्या रोटरी क्लबने केरळ पुरग्रस्तांसाठी रस्त्यावर, मार्केटमध्ये, दुकांनामध्ये जाऊन, गल्ल्यांमध्ये फिरुन निधी जमवला,
त्यात रस्त्यावर भीक मागुन उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने मदत डब्यात पैसे टाकले,
आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता.
‘देणारे’ कॅटॅगिरी नेहमी आनंदात असते,
जवळचे, पदरचे, हक्काचे देऊनही त्यांना कसं काय आनंद मिळतो, असा प्रश्ण आपल्याला पडतो,
‘देणं’ ही कृतीचं इतकी सुंदर आहे की, दिल्याने आपोआपच आतमधुन सात्विक आनंदाचा झरा खळखळ वाहु लागतो!
याउलट एक दुसरी जमात असते, हे असतात, ‘घेणारे कॅटेगिरी’!
ह्यांचा भर घेण्यावर असतो, ह्यांना सरकारकडुन सर्व प्रकारच्या सुविधा पाहीजे असतात,
त्यासाठी आंदोलनं करण्याची ह्यांची तयारी असते.
ह्यांना स्वतःसाठी सबसिड्या पाहिजे असतात, आपल्या जातीसाठी रिझर्व्हेशन पाहिजे असते,
त्यासाठी रस्त्यावर उतरुन निरपराधांना त्रास दिला तर सरकार आपल्यासमोर झुकेल असा त्यांचा विश्वास असतो,
म्हणुन एसट्या फोडायच्या, टायर जाळायचे आणि रास्तारोको करायची यांची प्रवृत्ती असते,
कसल्याही मोफत स्कीम आल्या की रांगा लावण्यात हे सर्वात पुढे असतात.
घरामध्ये प्रॉपर्टीसाठी भावाला पाण्यात पाहतील,
समाजामध्ये आमच्या समाजावर कसा अन्याय होतोय, आणि इतर समाजांनी आमचे कसे शोषण केले आहे, याचे साग्रसंगीत वर्णन करतील,
‘घेणारे’ ह्या कॅटॅगिरीचे लोकं, हवं ते मिळवण्यासाठी कधी भांडतात, कधी दरडवतात, कधी ओरडतात, कधी चोरतात, कधी रडतात,
कित्येकदा कुटील डावही खेळतात.
हे कधी चांगले चालणारे सहकारी साखर कारखाने बंद पाडतात,
तर कधी नफ्यात चालणार्या सहकारी बॅंका दिवाळखोरीत काढतात.
कधी आपल्या मार्केट कमिट्यांमध्ये चलाखी करुन भाव पाडतात,
कधी लालच दाखवुन दुसऱ्यांच्या मेहनतीचा पैसा रातोरात पळवुन गायब होतात.
कोणी एटीएम फोडुन पैसे पळवतात, कोणी ऑनलाईन डल्ले मारतात,
घेणारे कधी अडवणुक करुन लाच घेतात, कधी समोरच्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमिशन घेतात.
यांच्यामध्ये जसे दोन रुपये किलो राईस खाऊन आळशी झालेले येतात,
तसेच मेडीक्लेम आणि इन्शुरंसचे खोटे क्लेम बनवुन पैसे लाटणारे सो कॉल्ड धनाढ्यही येतात.
पण शेवटी ‘माझं ते माझं, आणि तुझंपण माझं’, ही वृत्तीच त्यांचा घात करते,
आयुष्यात कितीही मिळाले तरी काही केल्या, यांचे समाधान काही होत नाही,
कितीही ओरबाडले तरी अतृप्त राहण्याचा शाप यांना ब्रम्हांडानेच दिलेला असतो.
आयुष्यातल्या छोट्या छोट्या समस्यांमुळेही हायपर होवुन आकांडतांडव करण्याची यांची सवय यांना कधीही सुखाने जगु देत नाही,
सारखं दुसऱ्यांचं ओरबाडण्याची सवय लागल्याने, हे ऐतखाऊ आणि आळशी होतात,
कलांतराने बुद्धी आपोआपच मंद होते, दुसऱ्याकडून नेहमी काहीतरी फुकट कसं मिळवायचं ही वृत्तीच यांच्या प्रगतीच्या आड येते,
यांच्या नकळतच हे इतरांचा द्वेष करु लागतात,
इतरांबद्द्ल असलेली, ईर्ष्येची आग यांना आतमधुन पोखरते, कणाकणाने जाळुन टाकते.
आपल्या आयुष्यात आपण कोणती कॅटॅगिरी निवडुन आपलं आयुष्य जगायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं,
दोन्ही हाताने भरभरुन देऊन, ‘देण्यामधला’ आनंद मिळवायचा,
की तोच हात पसरुन दुसऱ्याकडुन मागुन किंवा हिरावुन घ्यायचे, ही निवड आपणच करायची.
शेवटी 'पेराल तेच उगवते', हाच नियतीचा नियम आहे.
आपण सगळे 'देणारे' ह्या स्पेशल कॅटॅगिरीतले होवुन, जगण्याचा प्रत्येक क्षणी, प्रसन्न होवुन, आनंद घेऊ, अशा मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!..
[9/23/2020, 8:04 PM] +91 95036 45430: ------------------------------ -----------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – चाणक्य नीती!
------------------------------ -----------------------------
मित्रांनो,
चाणक्य भारतातला सर्वात मोठा मुत्सद्दी मानला जातो, हातात कसलेही साधन नसताना, केवळ बुद्धीच्या बळावर त्याने त्याकाळचा सर्वात मोठा शक्तिशाली सत्ताधीश ‘धनानंद’ राजाची सत्ता उखडुन फेकली होती.
आनंदी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी चाणक्याने जी सुत्रे मांडली, त्याला चाणक्य नीती असे नाव दिले. त्यातली मला समजलेली आणि आवडलेली अशीच काही जीवन सुत्रे आज तुमच्या समोर मांडत आहे.
१) ज्याप्रमाणे एखादा कावळा कितीही मोठ्या इमारतीवर, मोठ्या डोंगरावर जरी जाऊन बसला, तरी तो गरुड बनत नाही, त्याचप्रमाणे, एखादा माणुस किती महान आहे, हे त्याच्या गुणांवरुन ठरते, त्याच्या पदावरुन नाही.
२) फुलाचा सुगंध फक्त वार्याच्या दिशेने पसरतो, पण चांगले गुण असलेल्या व्यक्तीचा सुगंध मात्र सगळ्या दिशांना पसरतो.
३) एखाद्या लोभी माणसाला पैशे देऊन जिंकता येते, अहंकारी व्यक्तीला त्याची खोटी स्तुती करुन जिंकता येते, पण एखाद्या बुद्धीमान व्यक्तीला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त सत्यच कामाला येते.
४) ज्याप्रमाणे एखाद्या बेवड्या माणसाला चांगले वाईट यामधला फरक समजत नाही अगदी तसेच एखाद्या इच्छेने वेडापिसा झालेल्या स्वार्थी माणसालाही चांगले वाईट यातला फरक कळेणासा होतो.
५) ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा करण्यासाठी त्याला घासुन बघितलं जातं, तापवलं जातं, कापलं जातं, त्याचप्रकारे माणसाची खरी वृत्ती ही संकटसमयी लक्षात येते.
६) खराब मित्र, वाईट पत्नी आणि उद्धट विद्यार्थी हे तीन असल्यापेक्षा नसलेलेच बरे! ते तुमचं समाधान हिरावुन घेतील.
७) प्रेमभंग किंवा व्यवहारात झालेला तोटा, याची इतरांसोबत चर्चा करु नये, पारिवारीक प्रॉब्लेम्स आणि वाईट घटना, तुम्ही इतरांना सांगितल्यास, तुमचं शोषण केलं जाऊ शकतं!
८) काही शिकताना, व्यापार करताना आणि भोजन करताना माणसाने संकोच बाळगु नये.
९) बिनविषारी सापानेही, फुत्कार टाकत राहीले पाहीजे, म्हणजेच स्वतःचे प्रश्ण आणि कमकुवतपणा तुमच्याजवळच ठेवा, इतरांपुढे तुम्ही तुमची मजबुत प्रतिमा उभा करा, म्हणजे तुम्हाला सन्मानाने वागवले जाईल.
१०) माणसाने अशा ठिकाणी अजिबात वास्तव्य करु नये, जिथे कुणालाही कायद्याची भीती नाही, सर्व लोक निर्ल्लजपणे वागतात, जिथे कुणीही दान करत नाही, जिथे कलेला सन्मान दिला जात नाही.
११) एखादे काम अर्ध्यावर सोडु नका, कारण जे आपलं काम पुर्ण करतात, तेच जगण्याचा खरा आनंद घेतात.
१२) ज्याप्रमाणे माणसाने चालताना डोळे उघडं ठेवणं आवश्यक असतं, तसेच पाणी पिताना स्वच्छ पाणी आवश्यक असतं, अगदी तसंच कोणतीही कृती करण्याआधी माणसाने त्याचा विवेक आणी ज्ञान यांचा वापर करणं, आवश्यक असतं!
१३) स्वच्छ कपडे महागडे नसले तरी सुंदर दिसतात, गरम आणि ताजं अन्न साधंच असलं तरी चवदार लागतं, तसंच माणसाच्या शारिरीक सौंदर्यापेक्षा जास्त महत्व त्याच्या चरित्राला आहे.
१४) ज्याप्रमाणे भरपुर साप असलेलं घर रहायला अयोग्य असतं, अगदी तसंच व्याभिचारी पत्नी, धोका देणारा मित्र आणि उद्धट नौकर यांच्यासोबत राहणं, असुरक्षित असतं!
१५) पैसा, धनसंपत्ती माणसासाठी अतिशय महत्वाचा आहे, पैसा माणसाला सन्मान आणि ताकत देतो, भल्याबुर्या समयी संकटांशी लढण्यासाठी तो माणसाला बळ देतो.
१६) जो आजारपणात, संकट समयात आणि गरीबीत जो तुम्हाला मदत करतो, तोच आपला खरा मित्र!..
१७) ज्याप्रमाणे सोन्याच्या हाराच्या कोंदणात हिरा शोभुन दिसतो, अगदी तसंच उत्तम गुण आणि प्रखर बुद्धीमत्ता माणसाला सुंदरता प्रदान करते.
१८) तीन प्रकारच्या व्यक्ती बर्बाद होतात, ते जे आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात, ते जे आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोकांचा मजाक उडवतात, आणि ते जे एकापेक्षा अधिक स्त्रियांची लालसा करतात.
१९) ज्याप्रमाणे शिकारी आपल्या सावजाला मधुर ध्वनीने आकर्षित करतो, त्याचप्रकारे आपणही इतरांशी बोलताना आपण तेच बोलावे, जे ऐकल्यानंतर त्याला आनंद होईल.
२०) माणसाने आपली पत्नी, आपलं धन आणि कमाई यांच्याबाबतीत, नेहमी संतुष्ट असावे, त्याच सोबत माणसाने आपली ज्ञानलालसा आणि दान करण्याच्या बाबतीत नेहमी अतृप्त रहावे.
आभार आणि शुभेच्छा!...
No comments:
Post a Comment