Sunday, January 22, 2023

 *आज कुणीच कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे, म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहेत...!!!* .


*हल्ली माणसं पहिल्या सारखं दुःख कुणाला सांगत नाहीत, मनाचा कोंडमारा होतोय म्हणून आनंदी दिसत नाहीत...!!!* .

*एवढंच काय एका छता खाली राहणारी तरी माणसं जवळ राहिलीत का ?, हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?...!!!*

*अपवाद म्हणून असतील काही पण प्रमाण खूप कमी झालंय, पैश्याच्या मागे धावता धावता दुःख खूप वाट्याला आलंय...!!!*. 

*नातेवाईक व कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात, एखाद दुसरा शब्द बोलतात, पण काळजातलं दुःख दाबतात...!!!*. 

*जाणे येणे न ठेवणे,न भेटणे, न बोलणे या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका, गाठी उकलायचा प्रयत्न करा, जास्त गच्च होऊ देऊ नका...!!!*. 

*धावपळ करून काय मिळवतो याचा जरा, विचार करा, बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा आपल्या माणसांची मनं भरा...!!!*

*एकमेका जवळ बसावं बोलावं आणि नेहमी नेहमी तिरपं चालण्याच्या ऐवजी थोडं सरळ रेषेत चालावं...!!!*

*समुद्री चोहीकडे पाणी आणि पिण्याला थेंबही नाही अशी अवस्था झालीय माणसाची यातून लवकर बाहेर पडा...!!!*.
 

*माणसं अन माणुसकी नसलेली घरे, अन देव नसलेले देव्हारे, कितीही पॉश असले तरी त्याचा काय उपयोग नाही..!!!*
🌸

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...