Saturday, December 24, 2022

मुंबई महाप्रलय दिन

 ********************************

*🌧️ २६ जुलै 🌧️*
*मुंबई महाप्रलय दिन*
********************************

इतिहासातला सर्वात धोकादायक पाऊस मुंबईने २६ जुलै २००५ रोजी अनुभवला. त्यावेळी २४ तासात तब्बल ९४४ मिली पाऊस झाला होता. जो गेल्या १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस होता.

या पावसामुळे एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर १४ हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. ३७ हजार रिक्षा, ४००० टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे ५.५ बिलियनचं नुकसान झालं होतं.

कुर्ला, धारावी या परिसरात अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. शेकडो लोकांचा मदती अभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना २४ तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.

मुंबईकरांचं स्पीरिट नेहमीच पाहिलं जातं. मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं तेव्हा खरं दर्शन घडवलं होतं.

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

*संदर्भ : इंटरनेट*

********************************

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...