*सोडून द्यावं*
एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल,
तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं.
ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील,
तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं.
मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील,
तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं.
एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली,
तर मनावर घेणं सोडून द्यावं.
आपल्या हातात काही नाही;
हा अनुभव आल्यावर,
इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं.
ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं,
तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं.
प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं,
म्हणूनच म्हणतो, तुलना करणं सोडून द्यावं.
आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर,
रोज जमाखर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.
============================================
*मास्तरच्या लेखणीतून एक दुःखद सत्य :
*

**विद्यालयाच्या जागेपायी*
*कुणीच इथं भांडलं नाही*
*अन्..देवालयाच्या जागेसाठी*
*रक्त इथं कमी पडलं नाही..*
*माझाच देव मोठा म्हणण्यात*
*रक्ताच्या नद्या वाहील्या*
*ज्ञानगंगा कोरडी पडत*
*ओसाड शाळा झाल्या...*
*शाळा अजुनही तशीच*
*पडक्या,तुटक्या भिंतीची*
*गरीब माझ्या देशामधी*
*उभी मंदिरं सोन्याची...*
*शाळे मधली दानपेटी*
*भरलेली कधी पाहिली नाही*
*अन् मंदिराची दानपेटी*
*रिकामी कधी राहिली नाही...*
*शाळेतला पालक मेळावा*
*पालकांवाचून राहून गेला*
*देवालयात चेंगराचेंगरीत*
*माणुस मात्र तुडवून मेला...*
*विद्येचं ज्ञान देऊन*
*गुरूजी गरीबच राहीला*
*अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन*
*पुजारी धनवान झाला...*
*खरंतर धर्म नावाचं पुस्तक*
*शाळेत कधीच उघडत नाही*
*अन् धर्माच्या नावाशिवाय*
*देशात पानही हालल नाही...*
*
मास्तर...*
मास्तर...*










: केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये,
होणार त्याची विस्मृती,
त्याला तयारी पाहिजे.
डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.
सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.
पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे.
सुखात सर्व सोबती
दुःखात ना कोणती
समोर जाण्या एकटा
त्याला तयारी पाहिजे
तोंडावर गोड जे बोलती
पाठीमागे निंदा करीती
तोंड देण्या निंदकास
त्याला तयारी पाहिजे
~विंदा करंदीकर
ही कविता पचवली की
आयुष्य जमलंच !!
===========================================
कशाक रे झिलांनो फिरतास अशे वणवण
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण ।।
चौक्या, कुंभारमाठ, तारकर्ली, कालावलची खाड़ी
तोंडवली, वायंगणी, आचरा पुढे भेटता हडी ।
चिंदर, त्रिंबक, पळसंब पुढे भेटता श्रावण
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण ।।
बांदिवडे-कोईळ गावचो गणपती,
तेंचो तर एक गाव एक गणपती
करवंद, तोरणा, काजीची फका
अलीकडे मुंबई आणि बाजूकच हा गोवा
पण शेवटी तुम्ही हयच येवा ।
कूर्ल्याचा निस्त्याक आणि बांगडे सुरमईचा कालवण
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण ॥
रामेश्वर,रवळनाथ,भराडी आई
गांगो, सातेरी आणि पावणाई ।
शिवछत्रपतींच्या स्पर्शान भूमी आसा पावन
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण !!
देवगडचो हापूस, विरणचो बाजार, आंगणेवाडीच्या जत्रेक चाकरमानी घेता धाव,
देवबागात आसा खाडी-समुद्राचो संगम
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण !!
*सुंदर कविता ज्यांनी लिहीली त्यांना सलाम*
No comments:
Post a Comment