*मित्र आणि व्यवहार...*
*कधीच एकत्र करू नये.*
*असे केल्यास संबंध वाईट होतील.*
*कोणत्याही मित्राला,*
*उसने पैसे देऊ नये,*
*आणि दिले असतील,*
*तर कधी मिळतील,*
*याचा काही मनात विचार आणू नये.*
*नातलग काय बोलतील,*
*यावर लक्ष देऊ नये.*
*कारण...*
*आयुष्य तुमचे आहे,*
*आणि त्यात पाहुणे मंडळी,*
*खूप घोळ घालत असतात.*
*कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहू नये,*
*कारण...*
*माणसे कधी बदलतील,*
*हे आपण सांगू शकत नाही.*
*जास्त अहंकार बाळगू नये.*
*बाहेरच्या लोकांना घरातल्या गोष्टी सांगू नये,*
*नाहीतर आपला मजाक होऊ शकतो.*
*कुठल्याही वस्तूंचं अती वापर करू नये,*
*नाहीतर नुकसानच होऊ शकते.*
*जास्त वेळ रात्री जगात बसू नये,*
*त्यामुळे शरीरावर खूप परिणाम होऊ शकतो.*
*आपल्या जवळ,*
*विषारी वाटणारी माणसे असतील,*
*तर त्यांच्या पासून दूर राहावे.*
*कधीही तुम्ही जर दुखी असाल,*
*तर सगळ्यांनाच दुःख सांगत बसू नये.*
*काही खास लोकांना ते सांगावे...!!*



No comments:
Post a Comment