पावसाळा सुरू झाल्यामुळे अनावधानाने का होईना आपण भिजतोच. अशात आपल्याला अधिकच खबरदारी घेण्याची गरज आहे. असे केले नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
1. *कपडे बदला* : पावसात भिजले असाल तर सर्वात आधी कपडे बदला. अन्यथा यामुळे थंडी लागून आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते.
2. *केस वाळवून घ्या* : कोमट पाण्याने अंघोळ करा. नंतर आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या केसांना वाळवून घ्या. कारण केस ओले झाल्यामुळे डोक्यात संसर्गाचा धोका वाढू शकतो.
3. *खाण्यापिण्याची काळजी* : पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे व्हायरल आणि बेक्टेरियल संसर्गाचा धोका वाढतो. अशात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
4. *तेलकट, फास्ट फूड टाळा* : पावसाळ्यात बाहेरचे खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपले पोट खराब होऊ शकत. त्यातच जर तुम्ही भिजला असाल तर असे पदार्थ खाणे टाळाच.
5. *व्यायाम कराच* : हलके-फुलके व्यायाम करा. याने आपण तंदुरुस्त राहाल. तसेच बाहेरून भिजून आल्यावर ताणण्याचे व्यायाम केल्यास शरीरामध्ये पटकन उब येईल.
*Disclaimer* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी आम्ही घेत नाही.
No comments:
Post a Comment