Saturday, June 11, 2022

 *आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....*


*१. अजिर्णे भोजनम् विषम्*
आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते.
 कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.

*२. अर्धरोगहारी निद्रा*
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते.

*३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।*
सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते.
 इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.

*४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।*
लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात.

*५.अति सर्वत्र वर्जयेत*
कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे.

*६. नास्थिमूलम अनौषधाम।*
औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.

*७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।*
कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत.

*८. चिंता व्याधि प्रकाश्य।*
चिंता आरोग्याची वैरी असते.

*९. व्यायामच्छ शनैही शनैही।*
व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. 
High Intensity Workout आयुष्य कमी करते.

*१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।*
अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते.

*११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।*
 आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.

*१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।*
भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

*१३. नास्थि मेघासमाम थोयम।*
पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.

*१४. अजीर्णे भेषजम वारी।*
अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.

*१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।*
ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत.
 (नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी.)

*१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।*
एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात.

*१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि*
पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...