







जेव्हा आपण कोणतेही साधना, परायन, जप - तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे? या साठी हा लेख ….
१) ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत ( ङावी - उजवीकडे न हलता सरळ रेषेत ) वाढत जात असेल तर समजून जावे कि दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे.
२) ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे कि दैविक शक्ती तूमच्या जवळपास आहे.
३) दर गूरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात.
४) शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते.
५) ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो ( एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण ) त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे कि देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अद्रुष्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी पारजातकांच्या फुलांचा, भगवान विष्णु व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो, देवीचे उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो.
६) शिंवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे.
७) ज्या स्रीया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावनेने पुजा करतात त्या स्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईचे दर्शन होते अन् ती त्या स्रीला योग्य तो मार्ग दाखवते.
८) जे दत्तगुरुंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे परायण करतात. ते जेव्हा रात्री डाव्याकुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात.यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते.
९) ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरा पर्यत धोती, एका हातात कमंडलू, कपाळावर भस्म, पायात पादुका, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे कि तो देव आहे व तो तूम्हाला दर्शन देत आहे अथवा तूमच्या पुर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तूमचे गुरु असतील असे समजावे.
१०) जे दुर्गा सप्तशती चे पठन करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्रोत वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्रीया ( पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात - पाय दिसत नाही, कान - नाक - डोळे काहीच दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अध्रुश्य अवस्थेत ) त्यांच्या गळ्यात मोठे चकाकते मंगळसुत्र, केसात अंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्रीयांचे दर्शन होते.या स्रीया मोठ्या चौरंग्या सारख्या पाटावर बसलेल्या दिसतात. काहींच्या मते यांना देवींचे बया असेही म्हणतात.
११) ज्यांना स्वप्नामध्ये जून्या घरचे देव म्हणजेच मूळदेव दिसतात त्यांनी समजून जावे की तूम्हाला मूळदेव हाक देत आहे.
१२) जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्रीला कोणीतरी बाहेरुन तीची ओळखीची सुवासीन स्री तीला अचानक भेटावयास येते व चालता - बोलता अचानक तीच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे.
१३) ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जानवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते.अशा घरात दैवी तत्त्व मोठ्या प्रमाणात रुढ असते.
१४) शिर्डी, गाणगापूर, नृसिह वाडी, अक्कलकोट, शेंगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अङचनी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. काहींना याची अनुभूती असेलच.
१५) घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा ( हळद ), ज्योतीबाचा भंडारा ( लाल गुलाल ), काळूबाईचा अंगारा, महादेवाचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हाता - पायाला लावले असता अंगातील ताप ( उष्णता ) शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो.त्यामूळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो.यामधून देवाचे खरे सत्त्व कळते.
१६) आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो.काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो.हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पहावयास मिळतो. या मध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभव आले आहेत.
१७) लहान बाळ ज्यावेळी हसत - खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे कि येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलिकडची असते.
१८) रस्तावरुन किंवा आडवाटे वरुन चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्हीही हातानी झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघङून पाहता तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे? हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे.
१९) जी व्यक्ती संकाटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का? किंवा अॉफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे कि नाही? अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयांती माळ धारण करुन कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अङचणी शिथील होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देवाचीच कृपा असते.
२०) ज्या घरातली व्यक्ती आजारपणा मूळे हॉस्पिटलमध्ये ऐडमीट असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास ही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेऊन गाऱ्हाणे घा असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे.
देवाचे सत्त्व आजही या कलयुगात आहे.देव हा उघङ्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त “ मी आहे तूझ्या आजूबाजूलाच आहे “ याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तूम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच.
*
स्वामीज्ञानामृत
*
स्वामीज्ञानामृत
**श्री गुरुदेव दत्त.*
No comments:
Post a Comment