Wednesday, February 8, 2023

 कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?

 एकदाच ओंजळीत दे ना जाई जुई.........

खरं तर या ओळी एरवी केवळ एका हळव्या प्रेमप्रकरणा नंतर... ताटातूट..विरह.... ...एवढ्या पुरत्या जाणवतात..
पण आता..? या क्षणाला...? या दिवसात ???

खरंच...कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई... भाऊ..बहिणी, भाच्चे..पुतणे... रोज भेटणारे मित्र...ऑफिस मधले सहकारी...अगदी स्वयंपाकाच्या मावशी...ड्रायव्हर....ही रोजची घरातली माणसं.....कधी भेटतील आता.? माहित नाही...

म्हणूनच कायम वाटतं.....प्रत्येक भेटीत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत...काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद ?...आपलीच तर असतात माणसं...!! 

तुम्ही ज्यांना रोज भेटता त्यांना सांगायचं आहे तुम्हाला ? की तुम्हाला आठवण येते आहे त्यांची....?

मला खूप आठवण येते आहे सगळ्यांची...सगळ्यांना भेटावसं वाटतं आहे......सगळी नावं लिहीत नाही..कारण त्यांना माहितीच आहे की आपल्याला आठवण येते आहे एकमेकांची...

कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...!!

काळजी घ्या..♥️♥️

निसर्गराजा गणपती - कड्यावरचा गणपती - माथेरान

मिनी ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनने माथेरानच्या खडकांमध्ये 100फुटी विशाल गणपती साकारला.

श्रद्धा – अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न. काहींना माणसांमध्ये देव असतो. तर काही ओबडधोबड खडकांतुन मुर्ती घडवतात. 
कधी घरी विकत आणलेल्या टोमॅटो किंवा नारळाचा आकार गणपतीसारखा असल्यावर हलकासा का होईना मनात आनंद निर्माण होतो.
नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचं इंजिन चालवणा-या राजाराम खडे या माणसाला आसपासच्या कड्यांमध्ये गणपतीचा आकार भासला.
आणि भक्तिभावातुन त्यांनी साकारलेला ‘कड्यावरचा गणपती’ आज माथेरानला जाणा-या सर्व पर्यटकांचं एक आकर्षण आहे.
राजाराम खडे हे नेरळ-माथेरान दरम्यान जी मिनी ट्रेन धावते ती ट्रेन चालवणारे एक मोटरमन.
१९९८ पासुन ते मिनी ट्रेन चालवत होते 
मिनी ट्रेन चालवताना पेब किल्ल्याजवळ एक मोठा कडा त्यांच्या नजरेस यायचा. या कड्यास ‘मिडाचा खडा’ असं नाव होतं. 
या कड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना त्यात गणपतीचा आकार असल्याचा भास व्हायचा.
एकदा नेरळहून ट्रेन चालवताना राजाराम दादा चालवत असलेल्या इंजिनात एक उंदीर शिरला.
 ट्रेन मिठाच्या कड्याच्या इथे आल्यावर तो उंदीर इंजिनमधुन टुणकन उडी मारुन बाहेर पडला. 
राजाराम यांना हा दैवी संकेत वाटला. त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे बघितले. 
निरखुन पाहिल्यावर त्या खडकांमध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला. राजाराम अस्वस्थ झाले. बेचैन झाले. त्यांना काहीतरी करावं, अशी इच्छा झाली.
राजाराम दादांनी नेरळ-माथेरानला राहणा-या स्थानिक नागरीकांना कड्यामध्ये गणपती साकारायची कल्पना सांगीतली.
रेल्वेमध्ये काम करत असलेल्या सहकर्मचा-यांना सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन हे सांगीतले. सगळ्यांनी राजाराम दादांना साथ दिली. 
आणि २००४ मध्ये राजाराम दादांसह सर्वांनी कड्यावर गणपती निर्माण करायची मोहीम हाती घेतली.
सुरुवातीला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने कड्यावरील खडकांना गणपतीच्या तोंडाचा आकार देण्यात आला. 
नंतर गणपतीचे हात आणि हातांमध्ये असणारी आयुधं खडकांमध्ये निर्माण केली गेली. 
जवळपास चौदा वर्षानंतर २०१८ साली ५२ फूट उंच असा कड्यावरचा गणपती पूर्णत्वास आला.
गणपतीच्या पायाखाली भव्य असा उंदीर सुद्धा बनवण्यात आला. 
लोकांना दर्शन घेता यावं म्हणुन कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर बनवण्यात आलं असुन भव्य अशा गणपतीच्या छोट्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
माथेरानला निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गणरायाला ‘निसर्गराजा गणपती’ हे नाव दिले गेले आहे.
माथेरानजवळ असणारा पेबचा किल्ला अर्थात विकटगडला वर्षभरात असंख्य गिर्यारोहक भेट देतात.
विकटगडावर जायच्या आधी गिर्यारोहक या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे वाटचाल करतात. 
राजाराम दादांच्या गणपतीवरील श्रद्धेने साकार झालेला हा भव्यदिव्य गणपती निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेल्या कलाकृतीचं प्रतीक आहे.
राजाराम दादा आज सेवानिवृत्त झाले असले तरी कड्यावरच्या गणपतीवर रंगरंगोटी मारणं, त्याची निगा राखण्याचं काम ते स्वखर्चाने आत्मीयतेने करत असतात.
लोकं जेव्हा श्रद्धेने येऊन दर्शन घेतात, तेव्हा इतकी वर्ष केलेल्या मेहनतीची पोचपावती त्यांना मिळते.
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावरून माथेरान ला जायला टॅक्सी मिळतात, टॅक्सी नी गेल्या वर अर्ध्या घाटात कड्यावरचा गणपती व पेब किल्ल्या कडे माथेरान ट्रेन च्या ट्रॅक वरून जातो अर्ध्या तासात आपण गणपती जवळ पोहचतो.
- पराग उनकुले

 🎂*दोन तासात लग्न समारंभ आटपायची*

*उद्धव ठाकरेची नियमावली..* 🤔😷

 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे
2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे
3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10 ऐवजी 3 मंत्र म्हणण्याची अट
4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2 मिनिटे दिली जातील
5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल 
6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील
7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10 मिनिट दिले जातील, 😭😭🙄🙄 त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. 🏃🏃 🚗

नियमावली संपली..!
😏😏😃😃🤦🏻‍♂️

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?

 तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?


वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Affcource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो ! 

तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ? 

तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ? 

तर उत्तर आहे - नाही

शॉकिंग ? 

खालील उदाहरण पहा ! 

महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे. 

अचानक महेशचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला ! 

असे का झाले ? 

महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succesion Law'(वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir'(वारसदार) मध्ये समान वाटणी झाली.

'Succession Law' समजून घ्या !

'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळज़ी घेऊन ती legal Hairs ला सुपुर्द करण्यापर्यंत मर्यादित आहे.

नॉमिनी अस्सेट ला होल्ड करू शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात. 

मग 'Legal Heir' कोण असतात?

'Legal Heir' ते असतात जे Succession Act मधे नमूद केलेले आहेत. 

जर तुम्ही Will बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succesion Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात. 

'Succession Law'चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत. 

मित्रानो इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे. 

नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही! नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो. 

मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे! 

आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरुन आपल्या वारसांमधे भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर मृत्यूपत्र बनवणे अतिशय महत्वाचे असते.

सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नाॅमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नाॅमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमची प्राॅपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो. 

सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आहे वाचा व वेळीच सावध व्हा...

माधव कुलकर्णी
अँडव्होकेट
मुंबई हायकोर्ट.

 महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार

आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?
मग आता पहा .............
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु. - ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु. - ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. - ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. - ६५.००
आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
आणि एप्रिल २०२१ पासुन १०० रूपये ग्रामीण भागासाठी व ११० रूपये शहरी भागासाठी , 
या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?
वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे. 
कोरोना काळात लोकांना मदत करण्याऐवजी लूटमार ! 
        कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे. 
ही post कोणत्याही सरकार / राजकीय पक्षाविरोधात नसुन सत्य परिस्थिती चे आकलन आहे .

🔍 ग्राहकांनो वेळीच जागे व्हा ! 🔍🙏🙏🙏

---चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व--

 डॉ.संजय ओक यांनी चारित्र्य व व्यक्तिमत्व याचे सुंदर विश्लेषण केले आहे.


चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व -डॉ.संजय ओक


माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला. 

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे! 

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत. 

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता? 

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला. 

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.
साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव. 

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

 कै.विनायकराव मेटे यांच्या गाडीच्या अपघाताच्या अनुषंगाने...


रोड हिप्नोसिस म्हणजे काय?
मी स्वतः मागच्या 15 दिवसाखाली या स्थितीतुन गेलो आहे, दैव बलवत्तर म्हणून बचावलो संभाजीनगर-जालना मार्गावर हाच प्रत्येय आला
सिंदखेडराजा जवळ जेवण करून गाडी चालवत होतो ac फुल स्पीड वर चालू होती
समोरच्या स्कारपीओ च्या मागे चालत असतांना नकळत नजर शुन्यात गेली आणि गाडीवरचा ताबा सुटला
नशीब गाडीने line सोडली, पण पूर्णपणे रोड सोडला नाही, गाडी एक साईड थोडी आदळली आणि अचानक भानावर आलो..
काय घडलं हे कस झालं आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण टोलगेट पास केल्यानंतरच जे काही घडलं ते आठवण अत्यंत धूसर होतं
- रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते.
- रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही.
- रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे.
- रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.
- रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.
- लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो.
- वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.
- रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते.
- चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
- डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे.
- गाडी चालवता चावलता ब्ल्यांक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात सुरू करा.

तुमचे आणि तुमच्या सहचाऱ्यांचे जिवन अनमोल आहे थोड्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू नका

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...