कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?
एकदाच ओंजळीत दे ना जाई जुई.........
खरं तर या ओळी एरवी केवळ एका हळव्या प्रेमप्रकरणा नंतर... ताटातूट..विरह.... ...एवढ्या पुरत्या जाणवतात..
पण आता..? या क्षणाला...? या दिवसात ???
खरंच...कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई... भाऊ..बहिणी, भाच्चे..पुतणे... रोज भेटणारे मित्र...ऑफिस मधले सहकारी...अगदी स्वयंपाकाच्या मावशी...ड्रायव्हर....ही रोजची घरातली माणसं.....कधी भेटतील आता.? माहित नाही...
म्हणूनच कायम वाटतं.....प्रत्येक भेटीत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत...काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद ?...आपलीच तर असतात माणसं...!!
तुम्ही ज्यांना रोज भेटता त्यांना सांगायचं आहे तुम्हाला ? की तुम्हाला आठवण येते आहे त्यांची....?
मला खूप आठवण येते आहे सगळ्यांची...सगळ्यांना भेटावसं वाटतं आहे......सगळी नावं लिहीत नाही..कारण त्यांना माहितीच आहे की आपल्याला आठवण येते आहे एकमेकांची...
कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...!!
काळजी घ्या..



No comments:
Post a Comment