Wednesday, February 8, 2023

 *हळू हळू एक एक शब्द वाचा*

*प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे*

*"अश्रु"* सांगून जाते, *"दुःख"* किती आहे ?

*"विश्वास"* सांगून जातो, *"जोडीदार"* कसा आहे?

*"गर्व"* सांगून जातो, *"पैशाचा माज"* किती आहे?

*"संस्कार"* सांगून जातात, *"परिवार"* कसा आहे?

*"वाचा"* सांगून जाते, *"माणूस"* कसा आहे?  

*"संवाद"* सांगून जातात, *"ज्ञान"* किती आहे?

*"ठेच"* सांगून जाते, *"लक्ष"* कुठे आहे?

*"डोळे"* सांगून जातात, *"व्यक्ती"* कशी आहे ?

*"स्पर्श"* सांगून जातो, *"मनात"* काय आहे ?

आणि 

*"वेळ"* दाखवते, *"नातेवाईक"* कसे आहेत.

भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा *पाचवा खांद्यावर* असतो. 

संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की *" लोक काय म्हणतील " ?* आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की *" राम नाम सत्य है "..*

           माणसाची *कदर* करायची असेल तर *जिवंतपणीच* करा. 

कारण *तिरडी* उचलण्याच्या वेळी *तिरस्कार* करणारे सुद्धा *रडतात.* 

मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची *प्रथा* आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी *व्यथा* आहे. 
*म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या.*

मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..
   
        चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. 
कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. 

*चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं ..*🙂
💐🙏🙏💐

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...