थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विचार बनाये जिंदगी!
-------------------------------------------------------
त्या घटनेला आज एकतीस वर्ष झाले.
तीन दशकांपासुन बॉलीवुडमध्ये आपलं स्टारपद अढळपणे मिरवणारा आमिर खान तेव्हा आपल्या वयाच्या विशीत होता, त्याचा चुलत काका मन्सुर खान ह्यांनी त्याला हिरो म्हणुन हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करायचे ठरवले होते,
फिल्मचे नाव होते, कयामत से कयामत तक, आणि ती एक लो बजेट फिल्म होती, चित्रपट पुर्ण झाला, पण सिनेमा बनवातानाच संपुर्ण बजेट संपले होते,
सिनेमाची प्रसिद्धी आणि प्रमोशन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्याकडे पुरेसे पैसेच उरले नाहीत.
त्याकाळात तर केबल नेटवर्कही नव्हते, इंटरनेटही नव्हते, त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी मुख्यतः पोस्टरमधुनच व्हायची.
अमिर खान नवखा असला, कुमारवयीन असला, आणि पहील्याच सिनेमाचा हिरो असला तरी, लहानपणापासुन ह्या क्षेत्रात वावरल्याने त्याला सिनेमाच्या तंत्राची चांगली जाणीव होती.
कसलाही खर्च न करता, आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने आपल्या काकाला सांगुन एक शक्कल लढवली,
आपल्या सिनेमाची छोटी छोटी पोस्टर्स घेऊन तो स्वतः आपल्या पाच सहा मित्रांना घेऊन मुंबईतल्या ऑटोस्टॅंडवर भेटी देऊ लागला.
प्रत्येक ऑटोवाल्याशी ओळख करुन घ्यायची, मी एका सिनेमाचा हीरो आहे आणि माझ्या सिनेमाचे पोस्टर तुमच्या ऑटोवर चिटकवण्याची परवानगी द्याल का? अशी नम्र विचारणी करायचा,
बहुंसंख्य ऑटोवाले त्याच्या ह्या लाघवी बोलण्याने खुश व्हायचे, आनंदाने पोस्टर लावण्याची परवानगी द्यायचे, आवर्जुन पिक्चर बघण्याचे आश्वासनही द्यायचे,
अमिरखानची व त्याच्या येणार्या पिक्चरची जोरदार प्रसिद्धी होवु लागली,
असंच एका सकाळी अमिर आणि त्याचे मित्र एका ऑटोस्टॅंडवर गेले आणि एकीकडे आमिर ऑटोवाल्याला नेहमीसारखं बोलु लागला, दुसरीकडे आत्मविश्वासाच्या भरात मित्रांनी ओटोमागे पोस्टर चिटकावुन ही टाकले,
मात्र त्या ऑटोवाल्याला हे आवडले नाही.
न विचारता, पोस्टर लावल्याबद्द्ल त्याने आमिरला खडसावले,
आमिरने माफी मागितली, पण ऑटोवाला खुपच रागात आला,
त्याने स्वतःच्या ऑटोवरचे पोस्टर काढले, टराटरा फाडले, त्याचे तुकडे तुकडे करुन अमीरच्या तोंडावर मारले, व म्हणाला,
“बडा आया, हिरो बनने!”
आमिरचा असा अपमान आजपर्यंत झाला नव्हता, त्याला खुप वाईट वाटले,
हा घाव त्याच्या वर्मी बसला,
तसाच खिन्न मनाने तो घरी परतला, स्वभावाने तो भावुक होता,
त्याच्या डोळ्यात आसवे जमा झाली,
त्याचे मित्र त्याला समजावु लागले, तेव्हा तर त्याने मोठमोठ्याने हुंदके देऊन रडायलाच सुरुवात केली,
पण पुढे हाच प्रसंग त्याला स्वतःमधलं बेस्ट देण्यासाठी सतत प्रेरीत करत राहीला, हे त्याने स्वतःचं मान्य केले आहे.
नियती अमिरला हरवायला आली होती, आमिर हरला नाही,
तो झुंजला, तो लढला आणि तो जिंकला.
कयामत से कयामत तक सुपर डुपर हिट झाला,
आमिरला फिल्मफेअर मिळाले, अमिर खान स्टार झाला.
आज आमिर खान स्वतःच्या कर्तूत्वावर कुठल्या कुठे जाऊन पोहचला,
आज त्याला हिणवणाऱ्या त्या ऑटोवाल्याचं काय झालं ते कोणालाच माहित नाही.
आपल्या ध्येयप्राप्तिच्या प्रवासावर आपली मानखंडना करणारे, अपमान करणारे अनेक प्रसंग कधीकधी आपल्याही आयुष्यात येतच असतील,
पण आयुष्यात मानहानीचे प्रसंग आल्यावर हातपाय गाळुन एका जागी बसुन शोकमग्न जगायचं, का प्रयत्नांचा वेग दुप्पट करुन अधिक जिद्दीने जगासमोर स्वतःच कर्तुत्व सिद्ध करायचं, हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा असतो,
असाच एक निर्णय १९८९ मध्ये पाकिस्तानच्या बॉलर्सनी फास्ट बॉलिंग करुन नाक फोडल्यावर लढण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरने घेतला होता.
असाच एक निर्णय हॉटेल ताजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर डि. एस. कुलकर्णींनी घेतला होता.
असाच एक निर्णय मुंबईच्या लोकल मध्ये फुटकळ वस्तु विकणार्या गौतम अडाणी नावाच्या माणसाने घेतला होता.
असाच एक निर्णय पार्टनरनी विश्वासघात केल्यामुळे कफल्लक झालेल्या संदीप महेश्वरीने घेतला होता.
असाच एक निर्णय चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी पाच पाच वर्ष स्टुडीओचे धक्के खाणाऱ्या शाहरुख खानने घेतला होता.
आज आपली कितीही विपरीत परिस्थिती असो,
पण संकटात सापडल्यावर पुन्हा उठुन उभा राहुन लढण्याचा असाच एक निर्णय घेण्याची बुद्धी आपण विकसित केली पाहिजे!..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही बऱ्याच यशस्वी लोकांना, व्हिडीओमध्ये किंवा प्रत्यक्ष अनेक मोटीव्हेशनल स्पीकर्सना असं बोलताना ऐकलं असेल, पुस्तकांमध्ये वाचलं असेल की चांगले विचार चांगलं जीवन घडवतात.
तुमच्यापैकी बरेच जण लॉ ऑफ अट्रॅक्शन/ द सिक्रेट माननारे, यांच्यावर विश्वास ठेवणारे असतील.
इतरांच्या अतिरंजित कथा ऐकुन/वाचुन मीही मनापासुन तळमळीने व्हिज्वलायजेशन करतो पण मला यश का मिळत नाही, असा प्रश्णही तुम्हाला कित्येकदा पडला असेल?
असं एका जागी बसुन बसुन व्हायब्रेशन सोडुन खरचं यश मिळतं का?
हे खरं आहे की खोटं?
हे अर्धसत्य आहे.
मग सत्य काय आहे?
----------------------------------------------
“तुम्ही जसा विचार करता, तसे तुम्ही बनता!”......
----------------------------------------------
माझ्या लेखी लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी समज एवढीच आहे,
आपण ज्या गोष्टीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करतो, ती गोष्ट घडते.
एखाद्या गोष्टीबद्द्ल सतत सतत विचार केला, तीच ती गोष्ट डोक्यात घोळवली की ती प्रत्यक्षात येतेच येते.
जगातल्या प्रत्येक असामान्य माणसाने ह्या कळत नकळत, ह्या वैश्विक नियमाचा वापर केला आणि कमी कालावधीत यश मिळवले.
त्यांनी नेमकं काय केलं?
त्यांनी आपल्याला हवं तसं विश्व आपल्या कल्पनाशक्तीने तयार केलं!
एक खोटं खोटं आभासी जग!
त्या जगामध्ये त्यांनी स्वतःला हरवुन टाकलं,
वास्तव त्या स्वप्नांच्या कितीही विपरीत असलं तरी त्याला मर्यादा मानन्यास त्यांनी नकार दिला.
ते फक्त आपल्या कल्पनांमध्येच आनंदी राहीले,
आणि एके दिवशी
आणि त्याच कल्पनाशक्तीने त्या माणसांच्या आतमध्ये एक अनोखी उर्जा भरली,
कल्पनाशक्तीने तयार झालेल्या त्या अनमोल उर्जेचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करुन ह्या सामान्य लोकांनी आपली स्वप्ने पुर्ण केली. जग जिंकलं!
आता स्वतःचं निरीक्षण करा.
तुम्ही जेव्हा स्वप्नं बघता तेव्हा उर्जा तयार होते का?
आपले गोल्स लिहल्यावर, व्हिज्वलाईज केल्यावर तुम्हाला उत्साहीत आणि प्रचंड एक्सायटेड वाटतं का?
ती उर्जा जतन करा, त्या उर्जेला विखरु देऊ नका,
----------------------------------------------------------------------------------------
मोठ्या स्वप्नांचे दहा छोटे छोटे टप्पे करा.
उदा. –
ध्येय - “मला एक वर्षात पंचवीस लाख रुपये कमवायचे आहेत.”
१) एक वर्षात पंचवीस लाख कमवणे म्हणजे एका महिन्यात दोन लाख!
हे दोन लाख रुपये कुठुन येतील?
२) त्याचे काही मार्ग असे आहेत. - नौकरीच्या ठिकाणी मिळणारा पगार/ व्यवसायातुन मिळणारे उत्पन्न/ गुंतवणुकीतुन आलेला रीटर्न/ फावल्या वेळेचा सदुपयोग करुन झालेली एक्स्ट्रा कमाई!
३) मी कमीत कमी अत्यावश्यक तेवढाच खर्च करेन आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढवु याविषयी जागरुक राहीन!
- हे साधण्यासाठी मी स्वतःमध्ये, स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणार आहे.
४) मी उद्या सकाळी लवकर उठेन. शरीराला उत्साह देण्यासाठी व्यायाम करेन. मनाला प्रसन्न आणि तरतरीत ठेवण्यासाठी ध्यान करेन.
५) मी नौकरीच्या ठिकाणी मन लावुन काम करेन, माझ्या उपस्थितीने व माझ्या कार्यपद्धतीने, सर्वांची मने जिंकेन. ठरलेल्या वेळी कामाच्या ठिकाणी पोहचेन व बाहेर पडेन. कंपनीचा शक्य तितका फायदा करुन देईन.
६) व्यवसायामध्ये काही पटींनी ग्रो होण्यासाठी मी स्वतःमध्ये आवश्यक त्या सुधारणा करेन. ब्रम्हांड मला ज्या कल्पना पाठवत आहे, त्यांच्यावर तात्काळ अंमलबजावणी करेन.
७) मला गुंतवणुकीचं सामर्थ्य माहित आहे, एक एक रुपया माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी वायफळ खर्च करणार नाही.
८) मला वेळेची किंमत माहीत आहे. मी व्हॉटसएप, फेसबुक, टी.व्ही यांच्यावरती माझा बहुमुल्य वेळ घालवणार नाही. फक्त सकारात्मक विचार आणि प्रोफेशनल वापरासाठी मी सोशल मिडीया वापरेन.
९) दिवसभरामध्ये कधीही माझ्या स्वप्नांपासुन आणि माझ्या विचारांपासुन मी भरकटणार नाही.
१०) स्वनियंत्रण मी सहज करु शकतो.
११) प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक चांगला होत आहे.
करुन बघा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची जादु अनुभवा!
आपण आपल्या समोरच्या समस्यांपेक्षा कितीतरी जास्त मोठे आहोत, ही समज आपल्यामध्ये निर्माण व्हावी, या मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!..
[10/21/2020, 7:46 AM] +91 95036 45430: स्वप्नातले घर बांधताना आकर्षणाचा नियम खरचं कामाला येतो का? इथे वाचा...
ना बादलों की छाव मे, ना चांदनी के गाव मे,
ना फुल जैसे रास्ते, बने है इसके वास्ते,
मगर ये घर अजीब है, जमीन के करीब है,
ये इट पत्थरोंका घर, हमारी हसरतों का घर,
ये तेरा घर, ये मेरा घर,
ये घर बहुत हसीन है…
------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन - माझं घर, माझं स्वप्न!..
------------------------------------------------------------------
आपलं स्वतःच्या हक्काचं ऐसपैस, प्रशस्त, टुमदार घर असावं, अशी ह्या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असतेच असते, ते बनवण्यासाठी बरेच लोक कर्ज काढतात, आयुष्यातील उमेदीच्या वीस वीस वर्षांची कमाई खर्च करतात, वेळप्रसंगी काटकसरीने जगतात, वर्षांनुवर्ष वाट पाहतात, त्रास सोसतात,
बॅंकवाल्यांपासुन बिल्डरांपर्यंत, इंजिनीअरपासुन मिस्त्रीपर्यंत सगळ्यांचे नखरे सहन करतात, कित्येक जणांचे उंबरठे झिजवतात, पण ह्या सगळ्यात उराशी जीवापाड जपलेलं टुमदार घराचं स्वप्न पुर्ण करतात.
अशी अत्यावश्यक आणि पावरफुल गोष्ट जिच्यासाठी माणुस कळत नकळत इतके कष्ट घेतो,
पै-पै करुन आयूष्यभर चिकाटीने साठवलेला पैसा एकरकमी सढळ हाताने खर्च करुन मोकळा होतो.
मध्यमवर्गीय माणसाच्या कमाईची बरीच मोठी रक्कम घर बांधण्यात खर्ची पडते.
आणि ज्यांचं स्वतःचं हक्काचं घर नसतं, ते आतुन स्वतःच्या घरासाठी तळमळत असतात,
दिवसेंदिवस घर बनवण्याची किंमत वाढत असताना, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करुन लवकरात लवकर घर बांधण्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी काही तंत्र आहे का?
नक्कीच आहे!
एक आर्किटेक्ट ह्या नात्याने मी घर बांधण्याच्या ह्या संपुर्ण प्रोसेसला अगदी जवळुन पाहिलयं, रोज रोज अनुभवलंय!..
मागच्या दहा वर्षात जवळपास दिडशेहुन अधिक घरे, बंगले डिझाईन केली आणि त्यांच्या बांधकामाची देखरेख करत, पुर्ण करुन दिली.
त्यातला काही जबरदस्त इच्छाशक्ती असणाऱ्या लोकांना आर्थिक आणि अनेक इतर प्रकारच्या अडचणींवर मार्ग काढत मनाजोगत्या घराचं स्वप्न पुर्ण करताना, स्वतःच्या डोळ्यांनी बघितल.
नकळत ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच वापर करत होते.
उदा १ –
तीनचार वर्षांखालची गोष्ट आहे, एक पिग्मी एजंटचा व्यवसाय करणारा माणुस होता, परिस्थिती जेमतेम, एकाच्या ओळखीने तो माझ्याकडे आला, माहीत नाही का? पण घाबरत घाबरत बोलत होता,
मी प्लान आणि डिझाईन बनवली, आणि त्याने घराचं चित्र पाहिलं, काहीतरी घडलं, त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसली.
स्वतः घर असं दिसणार ह्या कल्पनेने तो भारावुन गेला, खुप आनंदी झाला,
त्याला ती डिझाईन खुप खुप आवडली, “साहेब, खर्च किती येईल?,”
मी म्हणालो, “अंदाजे, वीस लाख रुपये लागतील.”
त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हतेच, पण ह्या वेळी मला त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला,
“सर कितीपण कष्ट करेन आणि अगदी असंच घर बांधेन”,
त्याने खरं तर नकळत स्वतःशीच कमिटमेंट केली होती.
आहेत तेवढ्या पैशानिशी आम्ही काम सुरु केलं, मी पाहत होतो,
पुढचे कित्येक महीने त्याने आपल्या कामाचे तास वाढवले,
मला साईटवर सकाळी सातला बोलवायचा, आणि दिवसभर न थकता, बाराबारा तास तो मार्केटींगला जायचा, काय माहीत त्याने काय काय केलं, पण त्या पठ्ठ्याने वीस नाही, सव्वीस लाख रुपये खर्चुन अलिशान घर बांधलं.
वास्तुशांतीला गेलो, तेव्हा त्याचे सगळेच नातेवाईक आणि मित्र घर बघुन थक्क झाले होते, खुप कौतुक करत होते, शाबासकी देत होते.
मित्रांनो, त्याच्या स्वप्नांनी त्याला एक वेगळचं बळ दिलं होतं,
त्याचं आयुष्यच बदलुन टाकलं होतं, आळस झटकुन त्याला कामाला लावलं होतं, खरं तर, त्याच्या मागे लागुन, त्याच्या स्वप्नानं, त्याच्याकरवी, स्वतःला पुर्ण करवुन घेतलं होतं, मी त्याचा साक्षीदार होतो. जगासाठी हे एक आश्चर्य होतं, माझ्यासाठी त्याने लॉ ऑफ अट्रॅक्शन अंमलात आणला होता.
अजुन एक उदाहरण सांगतो!.. –
आमचे एक जुने वयस्कर व्यावसायीक मित्र आहेत, फक्त नवरा बायको, एक मुलगा, त्यांच्या बांधकामाच्या वेळी तर प्रचंड मोठी आव्हाने होती, एका राजकारणी गुंडाला त्यांची मोक्याची जागा बळकवायची होती,
तो धनशक्तीने प्रबळ, ह्यांना कोणाचाच पाठींबा नव्हता. पण त्यांनी शेवटपर्यंत चिवटपणे झुंज दिली. त्यांना तिथुन घालवण्यासाठी खुप खालच्या स्तरावर प्रयत्न झाले, इतके ही लढाई बघणारे थक्क झाले, एकवेळ तर पॅनिक होवुन मी ही गिव्हअप करायच्या, आणि काम सोडुन द्यायच्या मुडमध्ये आलो होतो, इतका त्रास वाढला होता, वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत, चहुबाजुंनी घेरणं, धमक्या देणं, सामान चोरणं, नगरपालीकेनं काम बंद पाडणं, पोलीस स्टेशनला वरात काढणं, असे कित्येक विचित्र झाले,
ह्या नवऱ्याबायकोनं खंबीरपणे प्रत्येक लढा दिला, ते प्रत्येक लढाईला हसत-हसत सामोरे गेले, प्रचंड जिद्दीने लढले आणि विजयीही झाले, लातुरमध्ये त्यांची चार मजली बिल्डींग आज दिमाखात उभी आहे,
दोघांनाही कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास होता, किरायाच्या घर पहिल्या मजल्यावर होतं,
काम चालु असताना मी त्यांच्या किरायाच्या पडक्या घरात जायचो,
दुष्काळ होता, तेव्हा कुरकुर न करता, खालच्या मजल्याहुन बादल्यांनी पाणी वर घेऊन जायचे,
कितीही वाईट सिच्युएशन असली तरी आम्ही हसायचो, जोक मारायचो, मला अजिबात तणावात येऊ द्यायचे नाहीत, प्रत्येक वेळी आम्ही एकमेकांना नवी हिंमत द्यायचो!..
आज दोन वर्षांनी आठवतयं, आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरला होता, काहीही हो दे, जीव गेला तर बेहत्तर, घर तर बांधणारचं, अशा स्पिरीटने काम केलं म्हणुन घर पुर्ण झालं.
मित्रांनो, प्रत्येक घर बांधणारा ही लढाई आयुष्यात एकदा खेळतोच, तो त्याच्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव असतो. कल्पनाशक्ती वापरुन, घराचं स्वप्न जलद पुर्ण करता येतं,
घर बांधण्याची प्रक्रीया मजेशीर आणि सोपी करता येते. घर बांधताना स्पष्टता हवी, जी आकर्षणाच्या नियमाचा वापर केल्याने, अंतर्मनाकडुन सहज मिळते आणि स्वप्न आस्तित्वात येतं.
आपलं ड्रिम हाऊस बांधण्याची तुमची इच्छा आहे का?
असेल, तर आपल्या ड्रिम हाऊसचं चित्र शोधा,
त्याला सतत आपल्या समोर ठेवा,
ब्रह्मांडाकडे सकाळ संध्याकाळ स्पष्ट संदेश पाठवा, विश्वास ठेवा!..
उत्तर नक्की मिळेल,
धन्यवाद!..
[10/24/2020, 2:52 PM] +91 95036 45430: Building wealth is a marathon; Not a sprint. Discipline is the key ingredient.
---------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – गुंतवणूकीचे महत्व!..
-------------------------------------------------------
आजकाल प्रत्येक जण एक दुसऱ्याला ओरडून ओरडुन सांगत असतो, की इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करा,
पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय?
इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण मराठीत गुंतवणूक म्हणतो, म्हणजे आपल्या पैशाला अशा ठिकाणी लावणे, ज्यामुळे भविष्यात आपल्याला मुळ भांडवलापेक्षा जास्त संपत्ती वापस मिळते.
गुंतवणुकीतून नफा मिळवण्याच्या चार पद्धती असतात.
१) कॅपीटल एप्रीसिएशन –
यामध्ये आपण घेतलेल्या एसेटचे भाव वाढतात.
उदा. तुम्ही दहा वर्षाखाली वीस हजार रुपये तोळा किंमतीनं सोनं घेतलं असतं, तर आज त्याची किंमत पन्नास हजार रुपये तोळा झाल्यामुळे तुम्हाला एकशे पन्नास टक्के रिटर्न मिळाले असते.
२) व्याज –
तुम्ही बॅंकेत एफ डी करता, आणि त्यावर तुम्हाला नाममात्र व्याज मिळते.
३) डिव्हिडंड –
कंपनी आपल्या शेअरधारकाला आपला नफा समान प्रमाणात वाटुन टाकते, त्याला डिव्हिडंड म्हणतात.
४) भाडे/किराया –
तुम्ही आपली मालमत्ता जसे की जागा, वास्तु, कार किंवा साहित्य गरजु माणसाला काही काळासाठी किरायाने वापरायला देता, त्यातुन तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते.
मार्केटमध्ये गुंतवणुकीतुन नफा कमवण्याच्या अजुन काही पद्धती आहेत, पण त्या सगळ्यांची मुळे खोलवर कुठेतरी वरील चार प्रकारांशी जोडलेली असल्याचे तुम्हाला आढळुन येईल.
श्रीमंत आणि गरीब माणसामध्ये एक आणि एकमेव फरक असतो, की गरीब माणसं इन्व्हेस्ट करत नाहीत, म्हणुन त्यांचा आयूष्यभर भाजी भाकरीचा अविरत संघर्ष सुरुच असतो,
खाओ, पिओ, मजा करो, कल किसने देखा? ही अल्पसंतुष्टी आणि ‘चलता है’, वृत्ती त्यांना आगीतुन फुफाट्यात घेऊन जाते.
कर्ज काढून, घर घेणारे, कारमध्ये फिरणारे आणि तात्पुरती चैन करणारे लोक एखादा मोठा आर्थिक झटका बसला की चांगलेच पस्तावतात.
नेमकं याउलट श्रीमंत माणुस आपल्या संपत्ती वर्धनाच्या बाबतीत प्रचंड जागरुक असतो.
तुम्ही वीस वर्षाचे असा, तीस वर्षाचे असा, किंवा चाळीस पन्नास वर्षाचे असा, तुम्ही दर महिन्याला नुसती बचतच नाही, तर नित्यनेमानं काहीतरी गुंतवणूक करतच राहीलं पाहीजे.
कोव्हिड संकट आपल्यासोबत एक भयंकर आर्थिक आरिष्ट्य घेऊन आलं आहे, येणाऱ्या काळात महागाई अजुन वाढेल. अन्नधान्य, भाज्या, दुध, औषधं सगळं महाग होत जाईल, अशा वेळी तुमच्या बॅंकेत ठेवलेल्या एफ डीची किंमत दिवसेंदिवस घटत जाईल.
अंदाधुंद पणे अविचारीपणे खरेदी केलेले स्टॉक्स आणि ब्रोकरने स्वतःच्या कमिशनसाठी तुमच्या गळ्यात मारलेले म्युचल फंड तुम्हाला कधीच चांगले रिटर्न देणार नाहीत.
अशा वेळी आपण स्वतःची तीक्ष्ण बुद्धीमत्ता विकसित करणं आणि आर्थिक साक्षर होणं जास्तीत जास्त आवश्यक होवुन बसलं आहे.
पावर ऑफ कंपाऊंडींग म्हणजे चक्रवाढ व्याजाची शक्ती, ही जगातलं आठवं आश्चर्य आहे, असं आईनस्टाईन म्हणाला होता,
पण मग कोणती गूंतवणूक चांगले रिटर्न देते?
सोनं, रिअल इस्टेट का शेअर मार्केट?
जर तुम्ही १९८० मध्ये एक लाख रुपये सोन्यामध्ये गुंतवले असते तर २०२० मध्ये त्याची किंमत बेचाळीस लाख सत्तर हजार झाली असती.
सोन्याने मागच्या चाळीस वर्षात सरासरी वार्षिक दहा टक्के रिटर्न दिले आहेत.
जर तुम्ही १९८० मध्ये भारताच्या मोठ्या शहरामध्ये एक लाख रुपयांची एक जागा विकत घेतली असती तर आज त्याची किंमत एक कोटी दहा लाख असली असती.
रिअल इस्टेटने मागच्या चाळीस वर्षात साडेबारा टक्के वार्षिक ग्रोथ दाखवली आहे.
पण जर का तुम्ही १९८० मध्ये भारतातल्या शेअर बाजारातल्या प्रख्यात आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत तीन कोटी शहात्तर लाख रुपये असली असती.
शेअर्स बाजाराने मागच्या चाळीस वर्षात सरासरी सोळा टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत,
असे असतानाही सर्वसामान्य लोकांना शेअर बाजारात शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये फायदा कमी आणि लॉसच जास्त होतो, असे का?
कारण आपण एकतर वाईट कंपन्या स्वस्त दरात खरेदी करतो,
नाहीतर अतिशय महाग दरात चांगल्या कंपन्याचे भागीदार बनतो,
दोन्ही वेळा अपयशच आपल्या पदरी पडते.
आपल्याला नेमका हाच चक्रव्युह भेदायचा आहे.
त्यासाठी प्रत्येक महिन्याला हातामध्ये काही ना काही शिल्लक पैसा साठवण्याची सवय तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये रुजवली पाहिजे.
हा खेळता पैसा नसेल तर कितीही जास्त नॉलेज असुन काहीच फायदा नाही,
साधी जीवनशैली, आवश्यक तिथेच खर्च करणे, आणि खर्चाच्या आधी बचतगुंतवणुक करणे हे सुत्र आपल्याला मनापासुन स्वीकारावे लागेल.
जसं सकाळी उठल्यावर सवयीने नित्यनेमाने ब्रश करतो, आंघोळ करतो, कामाला जातो, जेवण करतो अगदी तसंच इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपल्या आयुष्याचा एक भाग झाली पाहिजे.
एकदा का तुमच्याकडे शिल्लक पैसा साठायला लागला, तर तुम्ही इतरांपासुन प्रभावित न होता, स्वतःची बुद्धी वापरुन शेअर्स निवडायला शिकलं पाहिजे.
कमी किंमतीत चांगले शेअर्स कसे निवडायचे, आपलं मुळ मुद्द्ल कसं सांभाळायचं?
उद्यापासून एक महिना चालणाऱ्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग व्हॉटस एप कोर्समध्ये आपण हेच तर शिकणार आहोत.
आभार आणि शुभेच्छा!...
[10/26/2020, 5:36 PM] +91 95036 45430: -------------------------------------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – बाई; एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाई, म्हणजे विजया मेहता!
विजया मेहता हे मराठी रंगभुमीवर आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, ह्याच्यापलिकडे मला त्यांच्याबद्द्ल काही माहिती नव्हती.
थोड्यांच दिवसांखाली पुलं यांच्या चरित्रावर आलेल्या व्यक्ति आणि वल्लीमध्येही ‘विजया मेहता’ ह्यांच्या भुमिकेमुळं कुतुहुल वाढलं होतं.
आणि अशातच लायब्ररीमध्ये पुस्तकं धुंडाळत असताना, अंबरीश मिश्र ह्यांनी लिहलेल्या ‘बाई’ नावाच्या पुस्तकावर नजर पडली, ते पुस्तक विजया मेहतांवर असल्याचं कळलं, आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्या पुस्तकावर झडप घाली.
नाटकांवरची पुस्तकं, आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.
एका रात्रीत एकशे एक्क्याऐंशी पानं वाचुन आज खरोखर मी तृप्त झाले आहे,
खरोखरच विजया मेहतांचे व्यक्तिमत्व जितके मोहक आहे, तितकेच उत्तुंग आहे,
विजया मेहता ह्या जगभरातल्या रंगभुमीवर भारताची ओळख बनल्या,
भारतीय नाटकांना त्यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केले,
विजयांबाईंनी केलेलं नाटक हे रंगभुमीवर शंभर टक्के यशस्वी होणार, अशी खुणगाठ निर्मात्यांनी बांधली होती.
आणि प्रत्येक नाटकाला एक जिवंत आणि नवं आव्हान म्हणुन स्वीकारणार्या विजयाबाईंनी आपल्या ह्या प्रतिष्ठेला कधी धक्का लागु दिला नाही.
विलक्षण प्रतिभा लाभलेल्या, पहिल्या महिला दिग्दर्शक म्हणुन त्यांचे प्रचंड कौतुक झाले.
अल्काझी आणि अदी मर्दबान अशा कसलेल्या दिग्दर्शकांपुढे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले,
‘सुंदर मी होणार!’, ह्या आपल्या नाटकात दिदीराजेंचा रोल करण्यासाठी पुलंनी त्यांना निवडले होते.
पुढे विजय तेंडुलकर, श्रीराम लागु, अरविंद देशपांडे, भास्कर चंदवलकर आणि अनेक उत्साही नवीन मंडळींनी रंगायन नावाची संस्था काढली, विजयाबाई त्या संस्थेच्या ‘प्राण’ होत्या.
शेकडो कलावंताच्या लाडक्या त्या बाई झाल्या.
त्यांच्याकडे आईची माया आहे, आणि शाळेतल्या खडुस आणि कडक हेडमास्तरीणसारखा दरारा आहे.
आणि नेमक्या वेळी नेमकं शस्त्र चालवण्याची कलासुद्धा त्यांना अवगत आहे,
रंगायनने महाराष्ट्राल अनेक रसबहार नाटके दिली.
पुढे विजयाबाई नाट्यशास्त्राच्या अभ्यासासाठी, काही वर्षांसाठी इंग्लड-जर्मनीला गेल्या.
पीटर ब्रुक्स आणि फ्रिट्झ बेनेवित्ज ह्यांच्यासारख्या नावाजलेल्या आणि मनस्वी कलाकरांच्या सोबत काम करताना त्यांनी पाश्चात्य रंगभुमीचे अंतरंग जाणुन घेतले.
रंगायन सोडल्यावर विजयाबाई स्वतःच दिग्दर्शक - निर्मात्या झाल्या,
विक्रम गोखले सारख्या दिग्गज अभिनेत्याला, ताकतीचा रोल देऊन, पहिल्यांदा लोकांपुढे आणण्याचे श्रेय विजयाबाईंना जाते,
‘बॅरीस्टर’ नावाच्या नाटकाने विक्रम गोखले महाराष्ट्राच्या घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचले,
‘महासागर’ आणि पुरुष ह्यांनी ‘नाना पाटेकर’ हा अदभुत कलाकार जन्माला घातला.
नीना कुलकर्णी, रिमा लागु ह्यांनीही विजयांबाईच्या छत्रछायेखालीच व्यावसायिक रंगभुमीवर प्रदर्पण केलं.
‘ब्रेश्त’ ही एक खुमासदार भाष्य करणार्या नाटकाची शैली आहे, त्याचा मराठीत वापर करुन त्यांनी ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे गजब नाटक लोकांपुढे आणलं, आणि रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं.
ह्याच ब्रेश्त शैलीवर आधारित बेनेवित्झ ह्या नाटककारासाठी त्यांनी ‘चॉक सर्कल’ नावाचं नाटक तर इतक्या विलक्षण पद्धतीने बांधलं की बर्लिन महोत्सवात प्रेक्षकांनी नाटकाला उभी राहुन मानवंदना दिली.
शाकुंतल, हयवदन आणि नागमंडल ह्या आणि अशा, विजयाबाईंच्या कित्येक नाटकाच्या रोचक कहाण्या आहेत, किस्से आहेत.
आज मराठी हिंदीत अव्वल स्थानी काम करणारे अनेक कलावंत बाईंनी घडवले आहेत,
आपल्या लाव्हक्या स्वभावाने त्यांनी आपल्या ह्या गोतावळ्याला जीव लावला आहे.
बाईंचा लळा लागलेली लोक त्यांच्या सहवासासाठी आसुसलेली असतात,
संपर्कात आलेला प्रत्येक माणुस त्यांच्या रंगभुमीच्या ज्ञानाने आणि त्यांच्या मोहक स्वभावामुळे भारावला जातो,
नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, रीमा लागु,
महेश एलकुंचवार, सुहास जोशी, मीना नाईक आणि मंगेश कुलकर्णी,
अजित भुरे, अमृता सुभाष आणि दिलीप कोल्हटकर
अशा अनेक कलावंतानी सांगितलेल्या आठवणींचा कोलाज म्हणजे ‘बाई’ हे पुस्तक आहे.
अशा दिग्गज कलांवतानी आपल्या वाट्याला आलेलं बाईंच प्रेम शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय, त्या पुस्तकाचं नाव आहे, बाई!
अत्यंत व्यावसायिक असलेल्या लोकांनाही नकळत हळुवारपणे भावनिक करणारा, मनाचा एक कोपरा म्हणजे बाई!
बाईंचे मिस्टर फरोख मेहता ह्यांनी लिहलेलं शेवटचं प्रकरण तर निव्वळ अफलातुन आहे,
माझी बायको कशी आहे, याचं विनोदी वर्ण्न करुन हा माणुस आपल्याला मनसोक्त हसवतो, आणि
असा काही भावुक शेवट करतो, की कधी आपले डोळे पाणावले कळतच नाही.
काही काही लोकांना खुमासेदार शैलीत विचार मांडण्याचं दैवी वरदान असतं हेच खरं!
विजयाबाईंच्या आतमध्ये अनेक जणांची आई दडलेली आहे, याचा प्रत्यय आल्यामुळे की काय? आपणही नकळत बाईंमध्ये गुंतत जातो,
आणि बाईंनी आपल्या लेकरांवर केलेली माया, त्यांच्या शब्दातुन झिरपत झिरपत आपल्यालाही चिंब भुजवुन टाकते.
आभार आणि शुभेच्छा!
[10/27/2020, 3:36 PM] +91 95036 45430: ------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – प्रतिसृष्टीचं निर्माण करणारे दोन देवदुत!
------------------------------------------------------------------
आपल्या अवतीभवती वाटोळं झालेला निसर्ग, दुषित झालेलं पर्यावरण, प्रदुषित हवा-पाणी-जमिन ह्या सगळ्यांकडे बघुन आपण सर्वजण अस्वस्थ होतो. हळहळतो, सुस्कारे सोडतो, आणि नजर फिरवुन आपल्या कामाकडे वळतो.
एकीकडे शहरी भागात कोरडं, नीरस आणि शुष्क जीवन तर दुसरीकडे जंगल आणि वनांच्या वेगळ्याच समस्या आहेत, तुफान वेगाने होणारी भरमसाठ वृक्षतोड, कोवळ्या, निष्पाप वन्यप्राण्यांच्या हक्काच्या घरांचा नाश, हत्ती असो वा वाघ सिंह, शिकाऱ्यांनी क्रुरपणे केलेल्या प्राण्यांच्या कत्तली, कुठल्याही संवेदनशील माणसाला अवस्थ करतात.
पण ह्या जगात काहीकाही लोक खरोखर अदभुत आणि असामान्य असतात, आपल्या कर्तुत्वाने ते आपल्यासमोर का जगावं आणि कसं जगावं? ह्याचा धडा घालुन देतात.
जेव्हा कोट्यावधी आणि अब्जावधी जनता मी आणि माझं बघण्यात धन्यता मानते, तेव्हा काही दैवी व्यक्तीमत्व मात्र स्वार्थानं लडबडलेलं तुच्छ जीवन त्यागुन एक भव्य आणि उदात्त संकल्प घेऊन आपले अख्खे आयुष्य त्या ध्येयासाठी वाहुन घेतात, हे आजकाल तसं विरळच!
आणि पायाशी सगळ्या सुखसुविधा लोळण घेत असताना, त्यांचा त्याग करुन एक अनिवासी भारतीय जोडपं मागच्या पंचवीस वर्षांपासुन निसर्गाच्या संरक्षणासाठी अविरत झटत असेल तर,
तर मृतप्राय झालेल्या वनाचं हिरव्यागार गर्द वनराईमध्ये रुपांतर करणाऱ्या ह्या जोडप्याला आपण आधुनिक काळातले ऋषीचं म्हण्टलं पाहिजे.
अनिल मल्होत्रा हे तसे मुळचे भारतीय, पण शिक्षण झाल्यावर ते अमेरीकेला गेले, तिथे त्यांचा बांधकामाचा आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय होता, न्यु जर्सीमधल्या वास्तव्यात त्यांची पामेला नावाच्या मुलीशी भेट झाली, त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं.
त्या दोघांनाही निसर्गाचं प्रचंड आकर्षण होतं, ते आपल्या हनिमुनला अमेरीकेतल्याच हवाई बेटांवर फिरायला गेले, आणि तिथल्या निसर्गाच्या प्रेमातच पडले, आणि शेवटी तिथेच स्थाईक झाले.
१९८६ मध्ये अनिलच्या वडीलांच निधन झालं, जेव्हा वडीलांच्या अंत्यविधीला ते दोघे भारतात आले तेव्हा हरीद्वार आणि आसपासचा प्रदेश पाहुन त्यांना अतीव दुःख झालं,
प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, प्रदुषित नद्या, आणि संवेदना हरवलेलं समाजमन, त्यांना स्वस्थ बसु देत नव्हतं,
भारतातील निसर्गाच्या संवर्धनासाठी काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं.
पण हे काहीतरी करणं म्हणजे साधं काहीतरी नव्हतं, तर ते त्यांच्या जीवनाचं सर्वस्व अर्पण केल्यासारखंच होतं,
भारतात येऊन निसर्ग संवर्धन करायचं म्हणुन चक्क त्यांनी त्यांची हवाईमधली प्रॉपर्टी विकली,
पैसे जमवले आणि एका मित्राकरवी त्यांनी कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यामध्ये, ब्रम्हगिरी भागात, पंचावन्न एकरचं एक ओसाड माळरान विकत घेतलं.
तिथं प्राणी-पक्ष्यांसाठी एक कृत्रिम अभयारण्य बनवण्याचं एक आगळंवेगळं स्वप्न त्यांनी पाहिलं,
त्या माळरानावर झाडं, वेली लावण्यात, प्राण्यांना, पक्ष्यांना हक्काचा निवारा देण्याच्या कामात त्यां दोघांनी स्वतःला दिवसरात्र झोकुन दिलं.
हे इतकं सोपं नाही, थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं, आजुबाजुच्या शेतीमध्ये अजुनही घातक पेस्टीसाईड वापरले जात होते.
त्यांनी जमेल तशी आजुबाजुची शेती विकत घेऊन तिचे गर्द वनराईत रुपांतर करायचा चंग बांधला.
असंख्य अडचणी आल्या, अनेकांनी अनेक प्रकारे त्रास दिला.
पण मल्होत्रा दांपत्य अविचलपणे, खंबीरपणे अडचणींना तोंड देत राहीले,
आज पंचवीस वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ की काय, आज त्या ओसाड माळरानाचं स्वर्गालाही हेवा वाटावा, अशा प्रतिसृष्टीचं रुपांतर झालं आहे.
तीनशे एकरवर पसरलेल्या ह्या भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्याचं नाव साई – सेव्ह एनिमल इनिशिएटीव्ह असं आहे.
आज ह्या अभयारण्यात हत्ती, बिबटे, चितळ, सांबर, हरणं मुक्त संचार करतात. रंगबेरंगी देखणे पक्षी आणि फुलांची झाडे किती आहेत ह्याची तर गणतीच नाही.
प्राण्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी ह्या अभयारण्यात एका सुंदर नदीसुद्धा बनवली आहे.
अष्ट्याहत्तर वर्षांचे अनिल आणि सदुसष्ट वर्षांच्या पामेला आजही जेव्हा आपल्या ह्या नंदनवनात फेरफटका मारतात, आणि निसर्गाच्या अदभुत आनंदात हरवुन जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण, लोभसवाणा आनंद पहायचा असेल तर एकदा हा व्हिडीओ पहाच.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि भुतदया हीच ईश्वरसेवा असे सांगणारी संतमंडळी यांच्यापेक्षा वेगळी असतील काय?
निसर्ग जगावा, प्राणीपक्ष्यांना हक्काचं घर मिळावं, जैवविविधता वाढावी, अशा संकल्पामध्ये आपल्या आयुष्याच्या समिधा अर्पण करणाऱ्या ह्या आधुनिक ऋषींचं जीवन जगणारे जगावेगळे लोक पाहुन आपण आपोआप नतमस्तक होतो.
निसर्गाची ही ओढ आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, ह्या एकाच मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!
[10/28/2020, 2:25 PM] +91 95036 45430: If someone doesn’t appreciate your presence, make them appreciate your absence.
------------------------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुपस्थितीचा वापर करा.
------------------------------------------------------------------------------------------------------
आजचा हा लेख अशा लोकांसाठी आहे, ज्यांची अशी तक्रार आहे की जग त्यांची योग्य ती दखल घेत नाही,
आजचा लेख अशा लोकांसाठी आहे, ज्यांना जगाच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवायची आहे.
घर असो वा कामाच्या ठिकाणी, तुमची जवळची माणसंच, तुम्हाला गृहित धरतात का?
तुमच्या आजुबाजुचे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात का?
अशा परिस्थितीत, आपल्याला योग्य तो सन्मान न देणार्या लोकांमध्ये, स्वतःचं महत्वपुर्ण स्थान अबाधित कसं राखावं ह्याचं सोपं रहस्य तुम्हाला माहीत आहे का?
“The law of scarcity ह्या नियमाचा वापर केल्यास अदभुत आणि अनोखे रिझल्टस तुम्हाला भेटतील.”
तुम्हाला काही मजेशीर उदाहरणं सांगतो,
- दिवाळीची चाहुल लागली की सुकामेवा महाग होतो.
- रमजान ईद जवळ आली की खजुरांचे भाव वाढतात.
आणि त्याउलट,
- उन्हाळ्याच्या सुरुवातीला एक हजार रु डझन भावाने चढाओढीने विकला जाणारा आंबा, बाजारात मुबलक उपलब्ध झाल्यास नंतर पाचशे रुपायांनाही विकल्या जात नाही.
लॉ ऑफ स्कार्सिटी म्हणजे बाजारातुन एखादी गोष्ट दुर सारुन किंवा नाहीशी करुन ताबडतोब त्याच्यासाठीची मागणी तुम्ही वाढवु शकता.
-----------------------------------------------------------------------------------
सतराव्या शतकामध्ये हॉलंड येथे एक राजा होता, त्याला ट्युलिपचं फुल खुप, खुप, खुप आवडायचं,
ट्युलीप हे इतर फुलांसारखं साधारण फुल बनुन राहु नये, ते एक स्टेटस सिंबॉल व्हावं, अशी त्याची इच्छा होती.
म्हणुन त्याने राज्यातल्या सगळ्या ट्युलिपच्या बागा एकतर खरेदी केल्या किंवा नष्ट केल्या.
हे फुल आपोआपच दुर्मिळ किंवा नष्ट झाले.
मिळविण्यास अत्यंत दुर्मिळ, दुर्लभ झालेल्या या फुलाने लोकांना जणु ट्युलिपचे वेड लावले.
हव्याहव्याश्या या फुलाच्या कमतरतेला ‘ट्युलिपोमॅनिया’ असे नाव पडले.
प्रत्येक फुलाची किंमत आता सोन्यात तोलली जाऊ लागली.
आजही अर्थशास्त्रामध्ये जेव्हा केव्हा कृत्रिम टंचाई केल्याची शंका येते तेव्हा त्याला ‘ट्युलिपोमॅनिया’ असेच म्हणतात.
अभाव असलेल्या गोष्टीला प्रचंड मागणी असण्याच्या हा नियम तुमच्या बाबतीतही लागु होतो.
- “तुमच्याकडे असलेले कौशल्य सहजासहजी उपलब्ध होणारे आहे का ते दुर्मिळ किंवा प्राप्त करण्यास कठिण आहे??”
ह्या एका प्रश्णाच्या उत्तरावरुन जग तुमची किंमत ठरवते.
ऐकण्यास कडु असलं तरी दुर्दैवाने हेच सत्य आहे.
-----------------------------------------------------------------------------------
हा लेख लिहता लिहता मला एक संस्कृतमधला एक श्लोक आठवला.
‘‘अतिपरिचयात अवज्ञा संततगमनादनादरो भवति,
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनं कुरुते’’
म्हणजे,
मलय पर्वतावर राहणा-या भिल्ल स्त्रिया चंदनाच्या लाकडांचा उपयोग (चुलीच्या) सरपणासाठी करतात.
पिकतं तिथे विकत नाही, असं म्हणतात बघा!..
बाहेर चंदनाच्या लाकडाला खुप किंमत असते, चंदनाचं लाकुड किती मौल्यवान समजलं जातं?
पण जिथे चंदनाचच जंगल आहे, तिथे राहणा-या भिल्लिणींना त्याचं काय मोल असणार?
अतिउपलब्ध होणाऱ्या वस्तुच्या किमतीमध्ये घट होते.
अगदी हेच तत्व माणसाच्या जीवनातही लागु तंतोतंत होते.
गंमत म्हणुन सांगतो,
लग्नाआधी गर्लफ्रेंडच्या पुढेमागे गोंडा घोळणारा आशिक हक्काची बायको झाल्यावर तिला भाव देईनासा होतो,
कारण आधी भेटीचा टाईम ‘लिमीटेड’ असायचा, तेव्हा किती बोलु, किती नक्को, असे व्हायचे,
निरोप घेताना जीव खालीवर व्हायचा, तिला येताना पाहीलं की थ्रिल यायचं, धडधड वाढायची,
आता काय ती चोवीस तास आपल्या घरी, आपल्या जवळच तर असते.
म्हणुन तर एकमेकांना गृहित धरले जाते, भांडणे होतात, मान-अपमान नाट्य होतात.
रुसवाफुगवा-व्हाया-अबोला-धुसफुस असा अखंड वर्तुळाकार प्रवास चालत राहतो.
ह्या सुत्रामधुन आपण दोन धडे शिकु शकतो.
----------------------------------------------------------------------------
१. धडा पहिला - सुत्रे स्वतःच्या हातात घ्या, मोजक्या वेळीच उपलब्ध व्हा.
----------------------------------------------------------------------------
- कुठेही तुमच्या अतिहजर असण्याने तुमची किंमत कमीकमी होत जाते.
- एखादा सेलेब्रेटी किंवा राजकीय नेता, प्रमोशनल इव्हेंटमध्ये किंवा राजकीय प्रचारसभेमध्ये, स्वतः प्रत्यक्ष जनतेसमोर येण्याआधी श्रोत्यांची खुप उत्सुकता ताणुन धरताना तुम्ही पाहिले आहे का? अनुभवले आहे का?...
- आणि आकर्षक रुपात, समोर आल्यावर हे सेलेब्रिटी लोक अक्षरशः एकेक मिनीट मोजत, स्वतःला जगापुढे सादर करतात, काम झाले की एक मिनीटही थांबत नाहीत, तात्काळ अदृष्य होतात.
- म्हणुन तर सामान्य लोक त्यांची एक झलक पहायला मरमर करतात, त्यांच्याशी हस्तांदोलन करायला, त्यांच्यासोबत सेल्फी काढायला जीवाचं रान करतात.
- ते दुर्मिळ असतात, म्हणुन तर जनतेला त्यांच्याबद्द्ल कुतुहल असतं, म्हणुनच लोक त्यांच्या येण्याकडे डोळे लावुन बसतात, त्यांच्यामध्ये, त्यांच्या खाजगी जीवनामध्ये रस घेतात.
- ज्या संस्थेमध्ये, ज्या लोकांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या विशीष्ट व्यक्तिच्या मनामध्ये तुम्हाला स्वतःची छाप उमटवायची आहे, अशा ठिकाणी, योग्य प्रसंगी, मोजक्या वेळेसाठीच उपस्थिती लावा, की तुमच्याबद्द्ल लोकांमध्ये आपोआपच उत्सुकता वाढावी.
- स्वतःला दुर्मिळ बनवा.
- करिअर ऐन भरात असताना क्रिकेटपटु सर डॉन ब्रॅडमन यांनी अचानक क्रिकेटमधुन निवृत्ती जाहीर केली, सगळे जग अवाक झाले,
- पत्रकारांनी विचारले, सर, तुम्ही रिटायर का झालात?
- त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही हा प्रश्ण सन्मानाने विचारावा, म्हणुन तर मी करीअर भरात असताना रिटायर झालो. करिअरला उतरती कळा लागल्यावर तर कोणीही रिटायर होईल.”
- क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी स्वतःला असे काही अनुपस्थित केले की सगळे जग हळहळले.
- आता ह्याच सुत्राची दुसरी बाजु बघुया, जी खुप मजेशीर आहे.
-----------------------------------------------------------------------------------
सुरुवातीला भितीदायक वाटणाऱ्या सर्व गोष्टी अतिपरिचयाने ओळखीच्या होतात.
-----------------------------------------------------------------------------------
तीन माणसं एका रस्त्यावरुन जात होती.
तेवढ्यात त्यांनी समोरुन एक हत्ती वेगात आपल्या दिशेने येत असताना पाहीला,
त्या तिघांपैकी दोघांची त्रेधातिरपीट उडाली, त्यांना वाटले, आता आपण मरणार! हा हत्ती आपल्याला चिरडणार!
त्या तिघांपैकी एक माणुस तर अतिशय भित्रा होता,
त्याला वाटले हा हत्ती आता मला मारणार!
तो आपला जीव वाचवण्यासाठी उलट्या दिशेने जीवाच्या आकांताने पळत सुटला, आणि दुरवर जाऊन थांबला, त्याने समाधानाचा सुस्कारा टाकला,
आणि आपला जीव वाचवल्याचा आनंद साजरा केला.
दुसरा माणुस थोडा अधिक हिंमतवान होता, तो बिचकला नाही,
प्रसंगअवधान राखुन, तो त्या हत्तीपासुन चटकन दुर जाऊन एका सुरक्षित अंतरावर उभा राहीला, मनातुन तोही खुप घाबरला होता.
तिसर्याने मात्र चक्क त्या हत्तीच्या सोंडेला हात घातला, भरभर त्याच्यावर चढला, आणि त्याच्या गंडस्थळाला असे काही थोपाटले ही सगळा राग विसरुन हत्ती एकदमच शांत झाला.
आता तो त्या माणसाशी प्रेमाने खेळु लागला.
तो माणुस एक अनुभवी आणि आपल्या कामात निष्णात असा माहुत होता,
आयुष्याची मागची कित्येक वर्ष त्याने हत्तींच्या सहवासात काढली होती,
त्याच्या मनात असलेली हत्तींबद्द्लची सारी भीती केव्हाच मरुन गेली होती.
कितीही हट्टी किंवा क्रुर हत्ती पाहिला तरी त्याला त्याचे भय नव्हते.
सगळे जग घाबरुन सैरावैरा धावत सुटले पण त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नाही,
कारण तेच,
कारण ‘अतिपरिचयात अवज्ञा!’...
अतिपरिचयाने सर्वच गोष्टी मवाळ आणि ओळखीच्या बनतात.
कित्येक वर्ष हत्तीच्या सहवासात काढल्याने हत्ती त्याला साधारण वाटत होते.
------------------------------------------------------------------------------------------
आता ह्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शनशी संबंध कसा आहे, ते सांगतो.
- लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सुरुवातीला आपण स्वतःसाठी, एखादे अशक्य कोटीतले वाटणारे, अवघड असे ध्येय ठरवतो.
- उदा. मी एका वर्षात एक करोड रुपये मिळवणार!..
- आपण पहिल्यांदा जेव्हा असे ठरवतो, तेव्हा खुद्द आपल्या मनातच ध्येय पुर्ण होईल का नाही ह्याविषयी शंका असतात, भीती असते.
- मग आपण व्हिज्वलायजेशन करुन वारंवार तेच ध्येय मनामध्ये घोळवतो, आणि पुढे हळुहळु मनाला त्याची सवय होते.
- आता आपोआपच त्या ध्येयाबद्द्लची भीती गळुन पडते आणि ते ध्येय साध्य झाले असल्याचा विश्वास, खात्री आपल्या मनाला पटु लागते.
- आपल्यालाच नकळत आपण आपले शंभर टक्के देऊन त्या ध्येयासाठी जीवाचं रान करतो.
- आणि अनेकदा दिवास्वप्नात पाहिलेली ती गोष्ट शेवटी प्रत्यक्षात साकार होते.
--------------------------------------------------------------------------------------------
तुम्हाला वर सांगितलेले हे दोन्ही मुद्दे तुम्हाला पटले असतील, समजले आणि उमगले असतील,
तुम्हाला गृहित धरणाऱ्या व्यक्ती तुमच्या आजुबाजुला आहेत का?
अशा लोकांपुढे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतःचा सहवास दुर्मिळ करा.
आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी स्वतःच्या अनुपस्थितीचा वापर करा.
आभार आणि शुभेच्छा!..
[10/30/2020, 10:15 AM] +91 95036 45430: Win through actions. Never through arguments.
दुसरे तुमच्याशी सहमत आहेत अथवा नाहीत ह्याला काहीही महत्व नाही. वादविवादात गुंतण्यापेक्षा तुमची शक्ती वाचवा आणि पुढे चला.
-------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विवाद्य बडबडीपेक्षा कृतीने जिंका.
-------------------------------------------------------------------
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लडमध्ये युरोपमध्ये एक नव्या प्रकारची जीवनशैली आणि कला जन्माला आली.
त्या कालखंडाला रिनायसान्स उर्फ पुरुरुज्जीवनाचा काळ असेही म्हणतात.
त्या काळावर आपला अमिट ठसा उमटवणारे, एकापेक्षा एक सुबक, देखण्या इमारती बनवणारे, सर ख्रिस्तोफर रे माझे फेव्हरेट आर्किटेक्ट आहेत.
ते एक महान स्थापत्य रचनाकार होते. रेन यांनी जगाला ज्या सुरेख वास्तुंची भेट दिली, त्याच डिझाईन्सवर सुरुवातीला सामान्य कुवतीच्या लोकांकडुन शंका घेतली गेली, त्यांच्या डिझाईन्सना अप्रस्तुत, अवास्तविक म्हण्टले गेले, पण ख्रिस्तोफर रेन ह्यांनी कधीही उलटुन उत्तर दिले नाही.
१६८८ मध्ये वेस्टमिनिस्टर शहराकरीता एका भव्य टाऊन-हॉलची संकल्पना रेन यांनी कागदावर चित्रित केली. नगराचे महापौर मात्र ह्या ब्लु प्रिंटवर तितकेसे समाधानी नव्हते. उलट त्यांना चिंतामग्न होते. दुसरा मजला पुरेसा सुरक्षित नाही अशी भीती त्यांना वाटत होती.
सगळे बांधकाम कोसळुन त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयावर आदळेल अशी भीती त्यांनी रेनपाशी बोलुन दाखवली.
प्रस्तावित वास्तुला जादाचा टेकु देण्यासाठी दोन भक्कम दगडी खांब उभारावे, अशी त्यांनी रेनकडे मागणी केले.
रेनसारख्या सर्वोत्कृष्ट परिपुर्ण अभियंत्याला हे ठाऊक होते की या खांबांचे काहीही प्रयोजन नाही. महापौराची ही भीती अनाठायी आहे. पण त्यांनी महापौराशी कसलाही वादविवाद केला नाही.
त्यांनी चक्क त्याची सुचना मान्य केली, आणि चक्क दोन जादाचे दगडी खांब बांधुन टाकले. सांगितलेले ऐकल्याबद्द्ल महापौरांनी रेन यांचे आभार मानले. मनातली शंका दिल्याबद्द्ल, अनेक धन्यवाद दिले.
पुढे अनेक वर्षांनी उंच परातीवर काम करणार्या मजुरांच्या लक्षात आले की छतापर्यंत येऊन ते खांब थांबले आहेत.
म्हणजे खांब व छत एकमेकांना टेकलेले नव्हते.
ते खांब बनावट होते, नकली होते, खरा आधार देणारे नसुन फक्त शोभेचे होते.
त्यातुन दोघांनाही हवे ते मिळाले.
महापौर खांब पाहिल्याने निश्चिंत झाले, आणि रेनला खात्री होती, एके दिवशी पुढील पिढ्यांच्या ध्यानात येईल की मुळ रचनेत खांबांचे काहीही प्रयोजन नाही. म्हणजेच रेनची संकल्पना बिनचुक होती.
Win through actions. Never through arguments.
वादविवाद न घालताही कसे जिंकता येते, रेनने ह्याचे अप्रतिम उदाहरण जगापुढे ठेवले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सत्तेच्या शीर्ष स्थानी असणारी किंवा शिखरावर पोहचण्याची इच्छा असणारी लोकं इतर साधारण लोकांसोबत क्षुल्लक वादविवाद घालण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवत नाहीत.
त्यांना माहित असते की, वादविवाद करुन मिळवलेला विजय क्षणभंगुर असतो.
इतरांचे मन जिंकण्यासाठी एकही शब्द न बोलता केलेली कृती जास्त प्रभावशाली असते.
वादविवाद करण्यापेक्षा आणि आपली बाजु कशी बरोबर आहे, याचे ठासुन स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा आपली योग्यता आणि अचुकता कृतीतुन दाखवुन द्या.
सत्ता आणि शक्ती प्राप्त करण्याचे आजचे सुत्र आहे.
----------------------------------
विवाद्य बडबडीपेक्षा कृतीने जिंका.
----------------------------------
१. मौन राहुनही बदला घेता येतो.
- जवळपास वीस वर्षांपुर्वीची घटना आहे. आज फ्रॉड ठरवुन जेलमध्ये असणारे प्रख्यात बिल्डर डि. एस. कुलकर्णी ह्यांनी उत्तर मुंबईमध्ये एक अपार्टमेंट बांधण्यासाठी जमीन खरेदी केली होती. मात्र काही ना कारणामुळे भाडेकरु ना जागेवरुन बाहेर काढण्यासाठी उशीर होत होता.
- पुण्याचा एक मराठी बिल्डर मुंबईत येऊन टोलेजंग टॉवर बांधतो व आपल्याशी स्पर्धा करतो, ह्यामुळे मुंबईतले इतर बिल्डर नाखुश होते.
- ते बिल्डर डिएसके ना जाहीररित्या घाटी म्हणुन खिजवायचे.
- एका अमराठी बिल्डरने एका कार्यक्रमात त्यांना ‘मुंबई तुमची, सखुबाई आमची’ असे चिडवले.
- डिएसके च्या प्लॉटच्या बाजुला असलेल्या गोदरेज ग्रुपने त्यांना भेटायला बोलवले. त्यांना तुम्ही तोट्यात जाल अशी भीती दाखवुन सात कोटीचा प्लॉट सहा कोटींना खरेदी करण्याची तयारी दाखवली.
- डिएसके नी आपलं मनोधैर्य ढळु दिलं नाही. त्यांनी गप्प राहुन प्रत्येक अपमान गिळला. ह्या छोट्या मोठ्या हल्ल्यांनी ते अजिबात विचलित झाले नाहीत.
- त्यांनी एक उत्कृष्ट इमारत बांधण्यावरच आपलं संपुर्ण लक्ष केंद्रित केलं.
- आजही ती इमारत अंबामाता टॉवर्स नावाने लोकांचे लक्ष वेधुन घेत आहे, जिचं बुकींग पंच्याऐंशी हजार रु. स्क्वेअर फुट भावाने झाल. हा मुंबईत एक नवा विक्रम रचला गेला होता. इतकी ती इमारत सुंदर बांधली गेली होती.
------------------------------------------------------------------------
२. मनके हारे हार है, मनके जीते जीत!
- एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एका युरोपिअन हॉटेलमध्ये जमशेदजी टाटांना इंग्रजांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला.
- १८ डिसेंबर १९०३ मध्ये जमशेदजी रतनजी दादाभाई टाटा ह्यांनी त्या काळातले पंचवीस लाख रु खर्चुन एक अलिशान हॉटेल मुंबईत बांधले, ज्याचे नाव हॉटेल ताज!
- आता ह्या हॉटेलामध्ये पाटी लावली गेली, “Dogs and British are not allowed.”
- सचिन तेंडुलकर महान लोकांच्या श्रेणीत जाऊन बसला कारण तो प्रत्येक वेळी तो आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर द्यायचा.
-----------------------------------------------------------------------
३. कर्मयोगी होवुन टीकेवर उत्तर द्या.
- इंग्लंडमध्ये राहणार्या बेंजमिन डिझरेली नावाच्या माणसाला व्यवसायात अपयश आले. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, “मला ह्या देशाचा पंतप्रधान बनायचे आहे.”
- पत्नी म्हणाली, “साधे काम न जाणणारा माणुस ब्रिटनचा पंतप्रधान कसा होईल, आरशात तोंड पहा.”
- त्या वेळेला ते संसदेचे साधे सदस्यही नव्हते. पत्नीच्या कुचेष्टेला त्यांनी उत्तर दिले नाही.
- प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अनेक वेळा पराभुत होवुन डिझरेली संसदेचे सदस्य म्हणुन निवडुन आले.
- एकदा संसदेत एका प्रस्तावावर भाषण करताना, मुद्दा व्यवस्थित मांडता न आल्याने लोकांनी त्यांची मनसोक्त खिल्ली उडवली. लोक हसु लागले. ‘खाली बसा’, ‘खाली बसा’ असा गलका केला.
- डिझरेली निराश झाले, बसता बसता ते म्हणाले, “आजचा दिवस तुमचा आहे, उदयाचा दिवस माझा असेल.”
- प्रचंड परिश्रम करुन ते दोन वेळा ब्रिटनचे पंतप्रधान झाले. नंतर त्यांचे प्रत्येक भाषण काळजीपुर्वक ऐकले गेले.
-----------------------------------------------------------------------
४. आपले म्हणणे आकर्षकपणे मांडा. –
- ज्याला चांगले संभाषण करता येते, त्याचे समाजात नेहमी स्वागत होते.
- बोलणार्याची माती खपते, न बोलणार्याचे सोनेही विकले जात नाही.
- जो व्यक्ती आपले म्हणणे आकर्षकपणे सांगु शकतो, तो दुसर्याचे लक्ष चटकन वेधुन घेऊ शकतो.
- अवांतर, पाल्हाळीक, आशय नसलेले, गावगप्पा, अर्थहीन, आचरट बडबड यांचा लोकांना लवकरच कंटाळा येतो.
- संभाषणात हलकेफुलके, हास्य विनोद जरुर असावेत, पण जिव्हारी लागेल असे व्यंग, फालतु विनोद नसावेत.
----------------------------------------------------------------------
५. चांगले विचार आणि चांगले वाचन मने जिंकुन घेतात.
- आजुबाजुच्या लोकांचा, त्यांच्या मनाचा अंदाज घेत, तुमच्या पोतडीतुन वातावरणाला अनुरुप असे किस्से, कथा, घटना, प्रसंग सांगुन लोकांची मने जिंकुन घ्या.
- आवाज शक्य तितका वजनदार बनवा, आवश्यक ठिकाणी आवाजात हुकुमत उमटु द्या, आवश्यक ठिकाणी आर्जवता पाझरु द्या.
- बोलताना योग्य ठिकाणी पॉझ घेतल्याने तुमचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकुन घेतले जाते.
- संभाषण जिंकुन घेण्यासाठी समोरच्याची प्रशंसा करा, खोटी स्तुती करु नका, ते लगेच लक्षात येते.
- भरपुर वाचन असेल त्याला मनोरंजक संभाषण करता येते. संगीत, कला, साहीत्य, प्रवास ह्यांच्यामुळे गप्पांना बहर येतो.
----------------------------------------------------------------------
६. समोरच्या व्यक्तीचे बोलणे तोडु नका. शब्दांचे बुडबुडे सोडु नका.
- काही माणसे इतकी उतावळी असतात, की ती दुसर्याला धडपणे बोलुच देत नाहीत. अशा व्यक्तींना लोक टाळायला लागतात.
- दुसर्याचे बोलणे लक्षपुर्वक ऐकुन घेतले पाहिजे.
- उत्तम संभाषण करणारा उत्तम श्रोताही असतो. संभाषणात अखंड बोलणे बरोबर नाही.
- अफवांमध्ये रस घेऊ नका.
- लोकांच्या भानगडी चवीने चघळु नका. तुमच्या शब्दसंग्रहातुन अपशब्द काढुन टाका.
----------------------------------------------------------------------
शेवटी इतकचं सांगेन,
- वादविवादात जिंकलात तरी तो आनंद तात्पुरता असतो, तुमच्यापासुन एक माणुस कायमचा तुटलेला असतो, शब्दांचे हत्यार चालवल्यास जखम होवुन एका मित्राचे शत्रुमध्ये झालेले रुपांतर आयुष्यभरासाठी परवडत नाही.
- कृतीतुन स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्याला मात्र खुप मोठा अर्थ असुन त्याची ताकतही खुप मोठी असते, जी काही न बोलता, सगळ्या जगाला दिसते.
----------------------------------------------------------------------
या सगळ्यातून आपण काय शिकू शकतो?
१ . कितीही विपरीत परिस्थीती आली तरी आज दिवसभरात कोणाशीही वादविवाद घालण्यात वेळ वाया घालवु नका.
२. आपली बाजु कशी बरोबर आहे, हे बोलण्यातुन नाही, कृतीने सिद्ध करा.
३. तुम्ही बोललेले प्रत्येक वाक्य आनंदादायी आणि आकर्षक असेल याकडे लक्ष द्या.
४. शब्दांनी कुरापती करुन मने दुखवण्याची सवय असेल तर ती तात्काळ मोडा.
५. तुम्हाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रामाणिक स्तुती करण्याची कारणे शोधा.
उत्कृष्ट संभाषककला शिकुन मने जिंकण्यासाठी खुप खुप शुभेच्छा!...
No comments:
Post a Comment