Thursday, December 22, 2022

 काही माणसं मैत्रीने खांद्यावर हात टाकतात, दु:खातही कायम साथ देतात.*                   

*काही माणसं गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज पडली तरच 
आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.


*मात्र काही माणसं पिंपळाच्या पानांसारखी असतात. जाळी झाली तरी 
मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात...!!!*


 *जिथे आपल्याला ठेच लागते* *तिथूनच सवय लागते सांभाळून 
चालायची* *मग ती पायाला असो किंवा मनाला* *

 ❝ समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये 
याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे 
चाललीय हे निश्चित समजावे..❞*
  
 *माणसाला परके कोण हे*
 *कळण्यापेक्षा आपलं कोण हे* 
*कळायला जास्त वेळ लागतो*

  
 *अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणुस एकदा अडकला, 
की तो स्वतःच सत्व तत्व.. नाती गोती एवढच काय 
माणुसपणही विसरून जातो.*
   

 *❝समजूतदारपणा आणि सहनशीलता हे वयावर नाही तर 
आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते...❞*


 *क्षमतेपेक्षा जास्त धावलो कि दम लागतो आणि क्षमतेपेक्षा 
जास्त धावायला पण दमच लागतो.*

    
 *कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असे नाही,*
*तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार...*
*हे सुद्धा कमाई मध्येच मोजले जाते.*

 
 *वाक्य लहान आहे*
*पण महान आहे.....*

*लोभासारखा कोणताही* 
*आजार नाही,*
*आणि दयेसारखे*
*कोणतेही पुण्य नाही...*
         
 
 _*ज्या क्षणी तुम्हाला जाणिव होते की, आपला प्रवास 
एकट्याला करायचा आहे... तो क्षण तुमचे आयुष्य बदलवून टाकणारा असतो...!*               
 
*प्रत्येक गोष्ट* *मनासारखी होत नसते* *म्हणून सुखापेक्षा* 
*समाधान शोधा आयुष्य* *खूप आनंदात* *जाईल...!!!* 

 *पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही*
*आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही!*
*म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...*



 *झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही,*
  *ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते!*
 *तसच* *आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून.नवीन काय मिळवू शकतो,याचा विचार करा.!!* 
   *यातच जीवनाचा अर्थ असतो!!!*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...