Saturday, December 24, 2022

हर घर तिरंगा ?

आमच्या मनात खोलवर तिरंगा रुजला आहे. तो स्वातंत्र्या नंतर ५५ वर्षांनी आम्ही रुजवलेला नाही. त्यामुळे तिरंगा कधी आणि कुठे फडकवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही. जी व्यक्ती जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ना संसदेत देते आणि ना पत्रकार परिषदेत; अशा व्यक्तीने आम्हाल तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रत्येक गोष्टीत चिंधड्या उडवायचा विडा उचलला आहे, अशा व्यक्तीने आम्हाला तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. गरिबांना हक्क म्हणून दिली जाणारी मदत रेवडी म्हणून जी व्यक्ती संबोधते आणि उद्योगपती मित्रांवर जनतेचा पैसा खैराती सारखा उधळते त्या व्यक्तीने तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांना जी व्यक्ती आंदोलनजीवी म्हणून हिणवते त्या व्यक्तीने आम्ही तिरंगा कुठे आणि कधी फडकवायचा हे सांगण्याची गरज नाही.


आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा चूल पेटणे गरजेचे आहे.
आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा मुलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे.
आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा त्या प्रत्येक घरातील व्यक्तीला उत्तम आणि माफक दरात आरोग्यसेवा मिळणं गरजेचं आहे.
आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा प्रत्येक घरातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांना माफक दरात शिक्षण मिळणं गरजेचं आहे.
सध्या जे काही समाजात, देशात सुरू आहे ते बघता येत्या काही वर्षांत ह्या घरांमध्ये राहणारी माणसं तरी टिकतील का हा मोठा प्रश्न आहे. 

मुळात आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा ती घर टिकणे महत्वाचं आहे.

ह्या देशाचा तिरंगा हा आमच्या मनात आहे, आमच्या श्वासात आहे, आमच्या कृतीत आहे; त्याच्यावरील प्रेमाचा असा बाजार मांडायची आम्हांला गरज नाही. आणि तो कोणाच्या तरी सांगण्यावरून तर अजिबातच नाही.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...