*पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील*
शंख:-पूजा घरात शंख ठेवणे अत्यधिक शुभ असते. समुद्र मंथनावेळी देवी लक्ष्मीसोबत शंख ही निघाला होता. पूजेनंतर शंखनाद करणे चांगलं असते. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि धन राहातं.
शाळीग्राम:-शाळीग्राम भगवान विष्णूचे रुप आहे. त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी राहाते.
घंटी:-घंटीच्या आवाजात सकारात्मक उर्जा असते. मान्यता आहे की ज्या घरांमध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहाते आणि निगेटिव्ह शक्ती दूर राहातात. पूजा-अर्चना करताना घंटी वाजवणे चांगले असते.
मोरपंख:-अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात. वास्तू शास्त्रानुसार, याला शुभ मानलं जातं. भगवान श्री कृष्णही मुकुटावर मोरपंख लावतात. मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते. त्याशिवाय, यामुळे घरात सुख-शांती राहाते.
गंगाजल:-कुठल्याही देवी-देवतांची पूजा असेल किंवा कुठलं अनुष्ठान असेल. त्यामध्ये गंगाजलचं विशेष महत्त्व असते. गंगाजलला पितळ आणि चांदीच्या पात्रात भरुन ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. यामुळे घरातील संपत्तीत वाढ होते.
कलश:-पूजेदरम्यान घरात कलश ठेवला जातो. यामुळे घरात सुख-समृद्धी राहाते. कलश भगवान गणेशाला अतिप्रिय आहे. व्यस्त जीवनामुळे रोज कलश स्थापन करणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर स्नान करुन तांब्याच्या पात्रात जल भरुन त्यामध्ये आचमनी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला. कलशाच्या पाण्याला झाडात प्रवाहित करा.
No comments:
Post a Comment