
*आत्मसुखाकडे कस जायचं.?*
*त्यासाठी सद्गुरूंनी दोन मार्ग सांगितले.*
*एक direct,*
*आणि दुसरा indirect,*
*डायरेक्ट मार्ग सर्वाना झेपेलच,*
*असं नाही.*
*कारण...*
*दिव्य साधना समजणं,*
*आणि स्वरूपाचं भान घेणं,*
*त्या स्वरूपापर्यंत जाणं हे सोपं काम नाही.*
*सद्गुरूंनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला.*
*साक्षात्कार होणारे फार कमी लोकं असतात.*
*पण सद्गुरूंनी.*
*सुखाचा अनुभव सामान्य लोकांसाठी,*
*खुला केला,*
*त्या मार्गाने गेलात तर हे जग सुद्धा सुखी होईल.*
*संपूर्ण विश्वात क्रांती करण्याची ताकद,*
*या मार्गात आहे.*
*सद्गुरूंनी सांगितलं की,*
*खरं सुख हे आत मध्येच असतं.*
*जाणिवेतच असतं.*
*हे सुख आपल्याला बाहेर विषयांच्या मार्फत मिळतं.*
*आपण समजा सिनेमाला गेलो,*
*त्यातून जो आनंद मिळतो,*
*तो त्या सिनेमातून मिळत नसतो,*
*तो आनंद आतूनच येत असतो.*
*खरा आनंद आत्मानंद्च असतो,*
*पण ते आपल्याला विषयाच्या आधारे मिळतं.*
*विषयसुख हे आत्मसुखच आहे.*
*पण ते विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे,*
*आपण विषयावर अवलंबून असतो,*
*विषय गेला की ते सुख गेलं,*
*कारण...*
*विषय हा कायम स्वरूपी नसतो.*
*जर तुम्ही विषयावर अवलंबून राहिलात,*
*तर तुम्ही कधीच...*
*सुखी होऊ शकणार नाही...!!*



No comments:
Post a Comment