*देवा तुझी लिला अगाध आहे.........रे*
*काय गंमत आहे बघा जगण्याची. माणसांमध्ये आपलं वैभव दाखविण्याची जणु स्पर्धाच लागली होती.*
*लग्नसमारंभ....*
*लाखो , करोडो रुपयांचा चुरा. लग्नात मोठमोठ्या राजकारण्यांचे आशीर्वाद . चमकदार देखावे. तुरे असलेले शेकडो फेटे , डीजेचा धिंगाणा तर विचारुच नका. मादक पेयांचा महापुर , जेवणातले विविध पदार्थ , त्यात अन्नाची प्रचंड नासाडी, विजेची रोषणाई. महागडे कपडे , दागदागिन्यांचं प्रदर्शन आणि श्रीमंतीचा माज काही आगळाच. बरं , यात गरीबही मागे नव्हते . कर्ज काढणं का होईना पण लगीन....थाटातच. आणि अशाच थाटापायी शेकडो कुटुंब आर्थिकदृष्ट्या देशोधडीला लागली. बरं सृष्टीकर्त्याच्या दृष्टितुन ही बाब सुटते थोडीचं. आता बघा ना...माणसं तीही फक्त ५०...जास्तीचा गाजावाजा नाही. शांततेत लग्न सोहळे पार पडताहेत. आता जनावरं सोबतीला चालतील पण माणसं नको रे बाबा अशी अवस्था झालीय. सगळा झगमगाट गळुन पडला. मादक पेयाने झिंगणारी तरुण पिढी काही अंशी का होईना थोडी थंड पडलीय. ना गाजावाजा ना हजाराची लग्नपत्रिका. तरीही लग्न होताहेतच ना...आता गरीब..श्रीमंत सगळे एकाच मापात. माणसांना खाडकन जागं केलंस रे....कलियुगाचा अंत तर नाही ना....देवा?????*
*सत्यनारायण..,जागरण गोंधळ*
*हे तर आता जवळ जवळ लोप पावत चाललय जणु. लग्न झालं की सुरु झालं सत्यनारायण आणि जागरण गोंधळाचा धडाका. ब्राम्हणांनी कमवले पैसे आणि टेचित तुप भातावर ताव मारताहेत. आणि आम्ही आपलं कण्हत कण्हत जगतोय पिठलं..चटणी खाऊन. मला कधी कधी विचार पडतो जगातील प्रगतीपथावर असलेल्या देशात सत्यनारायण , जागरण , गोंधळ अशा धार्मिक भानगडीत शास्रज्ञ गुंतले तर मग शोध कोण लावणार. जपान , अमेरीका , चीन , जर्मनी यासारख्या देशात कुठ आहे असल्या बारा भानगडी. तरीही देश प्रगतीपथावर ...आपण मात्र आपलं तोकडं यश दाखविण्यात मस्तवाल...पण आता सृष्टीकर्त्याच्या पुढं काय......बसावं लागतय ना घरात...*
*वास्तुशांती..*
*घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.....आपण मात्र सिमेंटचा चंकुबा उभा करुन बंगला अस नाव देऊन मोकळे झालो. लाखो कोटींचे महाल उभे राहीले. लोकांना घरातलं चकचकतं सगळं दाखविण्याची प्रचंड स्पर्धा. लाखांचे बेड , लाखांचे बाथरुम , बापरे...काय रंगरंगोटी विचारु नका. प्रचंड मोठी घरं बांधली. लोकांना फक्त आपली फुशारकी दाखविण्याचा प्रयत्न म्हणुन .....काय तर वास्तुशांती...अरे घरं जेवढी मोठी झाली ना...तेवढी माणसं लहान झाली. मोठमोठ्या घरात माणसं मात्र हरवली. लाखाचं टॉयलेट बांधलं. पण सकाळी तंबाखु खाऊन , सिगारेट ओढुन , मशेरी लावुन , गरम पाणी पिऊन , लिंबु पाणी पिऊन तासनतास बसतय तरी पोट साफ होत नाही. कारण जिथं मन साफ नसतं तिथं पोट कधीच साफ होत नाही. रस्त्यानं चालता चालता जनावरं आपलं पोट साफ करतात.. त्यांना कुठं तंबाखु , सिगारेट, मशेरी ...लिंबुपाणी , गरमपाणी प्यावं लागतं...तुम्ही लाख कोटी खर्च करुन बंगले बांधा. हवेच्या गाद्या आणा पण झोपेचं काय...रस्त्यावर तंबुतलं पोरगं ढाराढूर झोपतंय....ना पंखा ना एसी....तरी कोणताच रोग शिवत नाही...इथं कोटीच्या घरात मलेरीया डेंग्युचं थैमान....काय भयान वास्तव आहे. आता सागळंच बंद...देखावा दाखवायचा कोणाला....राजकारणी लोकांना आणण्याच्या शर्यतीचं काय?,?*
*अंत्यविधी...दशक्रीया*
*एकदा असंच वाचनात आलं होतं की एका गावात एका पठ्ठ्यानं आईचं प्रेत सरणावर ठेवलं तरी पेटवुन द्यायला गडी तयार नव्हता. कारण तो म्हणत होता थांबा आमदार साहेब आल्याशिवाय अग्निडाग द्यायचा नाही...काय हा अतिरेक...लग्न ..इतर समारंभात भाई...दादा...नेते....साहेब मिरवायचे पण आता स्मशानभुमीचा पण ताबा घेतलाय बहादरांनी. समाज मोठेपणा मिरवण्यात कोणत्या थराला जाईल भरवसाच नाही. पण आता फक्त २०...तरी काही महाभाग बापाला घरी ठेवतील पण आईच्या मयताला साहेबांना बोलावतील भरवसा नाही रे बाबा...देवा आता तुच वाचव..*
*वाढदिवस....*
*आयुष्यातलं एक वर्ष संपलं...तो दिवस म्हणजे वाढदिवस. पुर्वी स्वतःलाच माहीत नसायचं आपण कधी झालो. पण आता एक नवीनच फॕड घुसलय टाळक्यात...वाढदिवस धुमधडाक्यात झाला पाहीजे. किलोकिलोचे केक....पार तलवारीने कापण्यापर्यंत मजल...छत्रपतींना सुध्दा हे पाहुन किळस वाटत असेल...कुठं माझा ताना..बाजीप्रभु....आणि आताचे हे आधुनिक मावळे. फेसबुक आणि व्हॉटसअॕपवर झळकण्यासाठी किती चढाओढ...पण आता तेही जवळ जवळ बंद होण्याच्या मार्गावर....*
*देवा तुझी लिला अगाध आहे...विज्ञानानं भयंकर प्रगती केली. पुर्वी पायात चपला नसायच्या तरी पायाला काटा रुतत नसायचा आणि आज पायालाच वात झोंबलाय तर घरातच चपला घालायची वेळ आलीय...मिक्सरचा गरगोट खाऊन किळस आली की काय..परत बायका पाटा वरवंटा शोधायला निघाल्यात. चुलीचा धुर नको म्हणणारे आता चुलीवरचं खाणं किती छान हे दाखवायला पुढं सरसावलेत. काम करुन करुन पोटं पाठीला चिकटलेली असताना कधीच सकाळीच उठुन पळायची वेळ येत नसायची. आता जो तो सकाळी सकाळी भल्या मोठमोठ्या ढेरी हालवत पळताना दिसताहेत...देवा तुझी लिला अगाध रे बाबा...ज्या घरात कोणता पदार्थ खायला निवडावा हा प्रश्न तिथं मात्र पोरांची वाणवा आणि रस्त्यावर तंबुत वर्षाला पाळणा हलतोय.*
*लोप पावत चाललेल्या सायकली पुन्हा बाहेर निघायला लागल्यात. लाखो करोडोच्या अलिशान गाड्या सोडून लोकं सायकलवर यायला लागलेत...खरंच देवा तुझी लिला अगाध आहे.. लाखो..करोडोची शहरात घरं असुनही आता खेड्यात फार्म हाऊस बांधायला निघालेत....*
*आज होळी....रंगांची उधळण....खरं तर वाईट विचारांची होळी करण्याची गरज असुन ..अहंमभाव रुपी रावणांचं दहन करुन माणुसकीच्या रंगाची उधळण करत जगण्याची गरज आहे.....खरंच देवा तुझी लिला अगाध आहे.....*
*होळी आणि धुळवडीच्या मनःपुर्वक शुभेच्छा......
*
**लेखक....श्री. किसनराव बाजीराव पावडे-पाटील*
*शिक्षण निरीक्षक*
*बृहन्मुंबई महानगरपालिका*
*हा मेसेज स्वलिखित असुन आपण कॉपी पेस्ट केला तरी चालेल पण आवडला तर नक्कीच इतरांना पाठवा.....काय सांगावं....विचार बदलुही शकतील...पण खरंच देवा तुझी लिला अगाध आहे....धन्यवाद*










कर्म व त्याचे परिणाम, कर्माचे परिणाम हे मानवालाच नव्हे, तर पशुपक्ष्यांनाही भोगावे लागतात. इतकेच नव्हे, तर देव, योगी, सिद्ध कोणीही कर्माच्या परिणामापासून, पळवाट काढू शकत नाही...!!!*

चांगले "कर्म" सिद्ध करावे लागत नाही, मन सर्व काही जाणते...!!!*
आपल्या मनात आणि बाहेर जे काही घडत असते, त्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. जसे करावे तसे भरावे, जे देऊ तेच वाढवून मिळते, जे पेराल तेच उगवेल. हाच कर्म सिद्धांताचा आधार आहे. दहा ज्ञानेंद्रिये-कर्म इंद्रिये यांनी केलेल्या प्रत्येक कार्याची एक निश्चित परिणाम होतो, नाहक काहीही घडत नाही. कामाचे स्वरुप आणि गंभीरतेला अनुसरुन कर्त्याला प्रतिफळ मिळते. या प्राकृतिक विधानाकडे दुर्लक्ष केल्याने आपली सुख, शांती आणि समृद्धीची कवाडे बंद होतात. आपल्या कर्मासाठी अन्य कोणीही जबाबदार नसते. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळते...!!!*