*शनिवार हा शनिदेव च्या पूजे साठी उत्तम दिवस मानला जातो. शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्या साठी व आशीर्वाद प्राप्त करण्या साठी वेगळे वेगळया पद्धतीने पूजन सांगितलं आहे. शनिवारी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये या बद्दल देखील माहिती असावी.*
*ज्योतिष शास्त्र अनुसार शनिवारी तेल खरेदी करू नये. असे केल्याने शनीचा कुप्रभाव, विपरीत प्रभाव आपल्या सम्पूर्ण घरावर हा पडत असतो. शनी कृपे साठी शनिवारी शनिदेवा वर तेल अर्पण करणे आवश्यक आहे. पुष्कळ लोक शनीवर कोणते ही तेल अर्पण करतात, परन्तु शनी च्या मूर्तीवर तिळाचे तेल अर्पण करावे. शनी कृपा प्राप्ती व्हावि म्हणून अनेक लोक शनी वर तीळाचं तेल अर्पण करतात, परन्तु या परंपरे मागे धार्मिक व ज्योतिषी महत्व आहे. धार्मिक मता नुसार तीलहन म्हणजे तीळ ही भगवान महाविष्णू च्या शरीरावरील मळ आहे. त्यामुळे तीळाचे तेल सर्वदा पवित्र मानले गेले आहे(विष्णू पुराण).*
*तीळ तेल वाहण्याचे धार्मिक महत्व (आनंदरामायण)*
*हनुमानावर शनीची ग्रह दशेला प्रारंभ झाला, त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते. राक्षसगण पुलाला हानी पोहचवणार नाही याची आशंका सदैव असायची. पुलाचं संरक्षण करण्याची जवाबदारी ही रामभक्त हनुमानवर होती. शनिदेवाला हनुमानाच्या शक्ती, कीर्ती बद्दल माहिती होती. म्हणून पवनपुत्र वर ग्रह दशेच्या फेऱ्याची व्यवस्था चे नियम सांगताना आपला आशय सांगितला. त्यावर हनुमान म्हणाले की, प्रकृती च्या नियमांचे उल्लंघन करण्याची माझी इच्छा नाही. पण रामसेवा सर्वस्वी आहे. हनुमानाचे म्हणणे होते की राम कार्य पूर्ण झाल्यावर मी माझे शरीर सर्वसी तुम्हला अर्पण करेन. परन्तु शनी देवाला हे मान्य नाही त्यानी ते स्वीकारलं नाही आणि जसे शनी देव अरुप म्हणजे अदृश्य होऊन हनुमानाच्या शरीरावर आरूढ झाले, त्यावेळी हनुमानाने पर्वतांना ठोकर मारू लागले. शनी देव हनुमान च्या शरीरावर ज्या ज्या ठिकानी आरूढ होते, त्या त्या ठिकाणी हनुमानाने पर्वतांना ठोकर दिली. त्याचे फलस्वरूप शनिदेव खूप घायाळ झाले. शरीरातील प्रत्येक अंग असह्य वेदनांनी जर्जर झाले व त्यानी हनुमानाची माफी मागितली. त्यावेळी हनुमानाने शनी देवाकडून वचन घेतले, की त्यांच्या भक्तांना ते कधी कष्ट पीडा देणार नाही. असे वचन दिल्या नंतर शनीला हनुमानाने तिळ तेल दिले. ते शनिदेवाने सर्व अंगाला लावले व त्यांची पीडा कमी झाली. त्यावेळ पासून शनीला तेल अर्पण करतात.*
*तीळांच तेल अर्पण करण्या मागचे ज्योतिष महत्व ज्योतिषशास्त्र अनुसार शनीचा धातू सिसं व लोखंड (लोह) आहे. याला संस्कृत मध्ये नाग म्हणतात, या धातूपासून शेंदूर ची निर्मिती होते. शिसं धातू एक विष देखील आहे. तंत्र शास्त्रात देखील याचे उपयोग आहे. शेंदूरवर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे. लोखंड पृथ्वी मधून निघते व मंगळ ग्रह भूमी पुत्र आहे. मंगळ ग्रहाचा धातू तांबा जरी असला, तरी लोखंड सुद्धा मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे. लोखंड आणि तेल यांचा मित्र भाव आहे. तेल लोखंडला सुरक्षित देखील ठेवते. लोहाला गंज लागू देत नाही. म्हणजे जर मंगळ ग्रह प्रबळ असेल तर शनीचा दूषप्रभाव हा कमी होतो. म्हणून शनी ग्रहाला शांत करण्या साठी तिळाचे तेल अर्पण करावे.*
*हेमेन्द्र पंचभाई.*
No comments:
Post a Comment