१ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
___________
२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
___________
३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हारलात तर अहंकार हारेल.
___________
४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माश्याना खातात. संधी सगळ्यांना मिळते. फक्त आपली वेळ येण्याची वाट पाहा___!
___________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यात थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे__ !
___________
६ )■ तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून रडू शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने मिठी ही मारू शकत नाही__ !
आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे___ !
___________
७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते__ !
___________
८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.____ !
___________
९ )■ जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोन निर्माण केलं. चाफ्याची फुल सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा सुगंध नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की.___ !
___________
१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.____!
___________
११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.____ !
___________
१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही. परतून येत ते चैतन्य____!
___________
१३ )■ सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच सोन करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे.___!
___________
१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत, खोट गावभर हिंडून आलेलं असत.___!
___________
१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.
___________
१६ )■ जगातील कटू सत्य हेच आहे की, नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.____!
___________
१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, " आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____!
___________
१८ )■ पदाचा, संपत्तीचा कधीही गर्व करू नये.
••••••••••••••••••••••••••••••









••••••••••••••••••••••••••••••
No comments:
Post a Comment