Thursday, May 26, 2022

 ।। नम्रता ।।


*पायातुन काटा निघाला की,चालायला मजा येते.तसा, मनातुन अहंकार निघाला की,आयुष्य जगायला मजा येते*
 
मोठ्या लोकांच्या शेजारी राहिलं, म्हणजे मोठं होता येते कि नाही ते माहित नाही.पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत
        
"शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो.तर "कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...

पूर्ण जग जिंकता येते संस्कारने.!आणि,जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने..!!
 
एकाच वेळी हजार ध्येये ठेवण्यापेक्षा, हजारवेळा एकच ध्येय ठेवा.तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही घडवाल.
         
आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात.काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो,तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो,हीच आयुष्याची गंमत आहे.

नातं हे रबरासारखं असतं एकाने सोडून दिल्यावर ज्याने घट्ट धरून ठेवलय त्यालाच जास्त लागतं

✍🏻लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही _तसेच.हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनंही जुळत नाहीत ...!!

प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,कारण लाेकं सुखांना नजर लावतात आणि दु:खावर मीठ चाेळतात.

*झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालविणे हा होत नाही.प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते वडीलधाराऱ्यांचे आशिर्वाद त्याचपैकी एक आहेत.*👏👏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...