बलिप्रतिपदा-पाडवा हा दिवाळीतील पती-पत्नींच्या स्नेहसंबधातली ठेव-मर्म जपणारा, जोगवणारा, वाढवणारा माधुर्यवर्धक सण. पतीने पत्नीचे लाड-हट्ट पुरविण्याचा हा गोड सण. पत्नीने पतीला ओवाळून (नीरांजन विधी) हवी ती भेट वसूल करण्याचा स्त्रीहट्ट पुरवून घेण्याचा हा दिवस. याची खुमारी ज्याची त्यानेच अनुभवावी. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन खुप महत्त्वाचा आहे. परंपरेनं पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. आपल्या मनात दिवाळीतल्या पाडव्याविषयीचं एक पारंपरिक चित्र, एक संकल्पना असते. वस्त्रालंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आहे. निरांजनातल्या ज्योतींचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडला आहे आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम आणि आदर लख्ख दिसत आहे. आजही हे चित्र बदललेलं नाही. स्त्रीनं पुरु षांच्या बरोबरीनं किंवा काकणभर अधिकच सर्वच क्षेत्रांत यशाची शिखरं गाठली आहेत. तरी आपलं घरकुल प्रेमानं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन डोळय़ांत तेल घालून करणारी, कुटुंबातलं सामंजस्य, नात्यांतला स्नेह यांची जोपासना जाणीवपूर्वक करणारी ही तिची भूमिका ती आजही तितक्याच जिव्हाळय़ानं साकारते आहे. तिची ही शक्ती, तिचं हे सामथ्र्य जाणूनच पती त्याच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो.
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Wednesday, May 25, 2022
पती पत्नीमधील स्नेहबंधन जपणारा पाडवा/ बलीप्रतिपदा
याच दिवशी सौर हेमंत हा ऋतू आणि भारतीय कार्तिक मासारंभ होतो.विषेश महत्वपूर्ण आज सकाळी संपूर्ण घरातील कानाकोपऱ्यातून केर कचरा काढायचा व एका सुपड्यात जमा करून त्यात एक पेटती वात घेऊन संपूर्ण घरात थाळी वाजवून (म्हणायचं ईडापीडा जावूदेत बळीचा राज येऊ देत.)
अशा रितीने आपल्या घरातील वाईट शक्ती निघून चांगली शक्ति चा वातावरण निर्माण होतो.म्हणून बळीराज येऊदेत घरात भरभराट होऊदेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
No comments:
Post a Comment