जीवनात दुःख, संकटे आणी अडचणी नसतील, तर जीवन वाळवंटा सारखे ओसाड,आणि रुक्ष होईल. उज्वल भविष्याची वाट ही काट्या कुपाट्यातूनच गेलेली असते. हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध झालेले कटू वास्तव आहे.
मोठमोठ्या महापुरुषांनी आयुष्यात तारेवरची कसरत करुनच आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. संकटाच्या अग्नीमध्ये भाजून, निघालेला माणूस सामान्य राहत नाही. तर तो लोहपुरुष होतो. जगण्यात येणाऱ्या दुःखांचा,संकटांचा नियतीचा प्रसाद म्हणून, स्विकार केला. तर ते एक वरदान ठरते. खूप काही शिकायला मिळते. आणि त्यामधून मार्ग शोधण्याची नवी चैतन्य उर्जा प्राप्त होते. जगण्यातील खरा आनंद मिळतो.
जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा आपण आपल्यात असतो, आणि आपण आपल्या सोबत असतो.
जेव्हा आपण इतरांसोबत असतो, तेव्हा आपण आपल्या सोबत नसतो, विचार आणी विवेकाची क्षमता हरवलेली असते.
एकटेपणा हा आपल्या अंतरंगात उतरुन, आत्मचिंतन करण्याची उत्तम संधी आहे.
इतरांनी केलेले सहकार्य, हे सापेक्ष असते. आपण आपल्याला केलेले सहकार्य, हे निरपेक्ष असते.
लोकांतात असताना, कधी एकटेपणा जाणवतो. एकांतात असताना, ईश्वर आपल्या सोबत असल्याचा सात्विक भाव असतो. यातूनच सकारात्मक उर्जा प्राप्त होते...!!
शेवटी...
मै अकेला चलता रहा; काफिले अब हट गये;
अपने मे घुलता रहा; रास्ते खुशीसे कट गये;...!!
No comments:
Post a Comment