स्वयंसुधारणे साठी इतका वेळ द्यावा की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही.
-----------------------------------------------------------------
तणाव नियोजन आणि विवेकनिष्ठ विचार पद्धती
-तणाव नियोजन म्हणजे असाह्य भावनांचे साह्य भावनात रूपांतर करणे.यासाठी तुमचे विचार वास्तववादी पाहिजे.
-नियंत्रणातले घटक कोणते आणि नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते हे जेव्हा माणसाला कळते त्याल विवेक असे म्हणतात.आत्मनिरीक्षण करणे गरजेचे.
-वर्तमानात जगा.तुमच्या समस्येवर कल्पक विचार करा.
-फक्त घटना घडतात म्हणून परिणाम होतात असे नाही,घटना आणि परिणाम ह्या दोहामध्ये असतो व्यक्तीचा दृष्टीकोन.
-विचार आणि भावनांना विकासाकडे न्यायचे की विकारांकडे हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आहे.
-आग्रही आणि निर्धाराचे वागणे-बोलणे हा तणाव नियोजनाचा मूळ आधार आहे.
-तणाव नियोजन ही गतिशील प्रक्रिया आहे.
- व्यक्तीवर आणि परिस्थितीवर 'लेबले' लावण्यापेक्षा वर्तनाचे मूल्यमापन करावे.
-दोषारोप करण्यात व्यय होणारी मानसिक उर्जा समस्येचे समाधान करण्यासाठी वापरावी.
- सुख आणि दुःख आपल्या विचारांवर अवलंबून असते.
-आपण जसा विचार करतो तश्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात.
-आपले चांगले विचार मित्र असतात.विघातक विचार शत्रू असतात.
-भूतकाळातील घटनांचा विचार करू नका.
-घडणाऱ्या घटनेला आपण कसा प्रतिसाद देतो हे महत्वाचे.
-भगवान गौतम बुद्धांची एक गोष्ट.
भगवान बुद्ध एकदा एके ठिकाणी धम्मदेसना देत असतात.एक जण येऊन बुद्धांना शिव्या देतो.बुद्ध एकदम शांत असतात कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत.
नंतर त्यांचा शिष्य त्यांना विचारतो भगवान आपण त्या व्यक्तीला कुठलीच प्रतिक्रिया का नाही दिली. बुद्ध म्हणतात मी त्या व्यक्तीच्या शिव्या कुठे घेतल्या.त्याच्या त्याला परत केल्या.
- प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका.ओझं वाढत जात.
संदर्भ- दूरदर्शन- सखी सह्याद्री कार्यक्रम.
-सकारात्मक विचार ठेवा.उद्या पासून आपण ताण कमी करण्याचे उपाय पाहू.
आपला नम्र
भूषण सुकेशनी वामनराव
मो.92849 18607
सदर लेख हा Stress Management या कोर्स मधील आहे.कोर्सच्या अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करून संपर्क साधा.
https://wa.me/919284918607
No comments:
Post a Comment