Wednesday, February 8, 2023

 🎂*दोन तासात लग्न समारंभ आटपायची*

*उद्धव ठाकरेची नियमावली..* 🤔😷

 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे
2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे
3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10 ऐवजी 3 मंत्र म्हणण्याची अट
4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2 मिनिटे दिली जातील
5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल 
6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील
7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10 मिनिट दिले जातील, 😭😭🙄🙄 त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. 🏃🏃 🚗

नियमावली संपली..!
😏😏😃😃🤦🏻‍♂️

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?

 तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?


वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Affcource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो ! 

तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ? 

तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ? 

तर उत्तर आहे - नाही

शॉकिंग ? 

खालील उदाहरण पहा ! 

महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे. 

अचानक महेशचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला ! 

असे का झाले ? 

महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succesion Law'(वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir'(वारसदार) मध्ये समान वाटणी झाली.

'Succession Law' समजून घ्या !

'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळज़ी घेऊन ती legal Hairs ला सुपुर्द करण्यापर्यंत मर्यादित आहे.

नॉमिनी अस्सेट ला होल्ड करू शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात. 

मग 'Legal Heir' कोण असतात?

'Legal Heir' ते असतात जे Succession Act मधे नमूद केलेले आहेत. 

जर तुम्ही Will बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succesion Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात. 

'Succession Law'चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत. 

मित्रानो इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे. 

नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही! नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो. 

मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे! 

आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरुन आपल्या वारसांमधे भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर मृत्यूपत्र बनवणे अतिशय महत्वाचे असते.

सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नाॅमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नाॅमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमची प्राॅपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो. 

सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आहे वाचा व वेळीच सावध व्हा...

माधव कुलकर्णी
अँडव्होकेट
मुंबई हायकोर्ट.

 महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार

आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?
मग आता पहा .............
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु. - ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु. - ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. - ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. - ६५.००
आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
आणि एप्रिल २०२१ पासुन १०० रूपये ग्रामीण भागासाठी व ११० रूपये शहरी भागासाठी , 
या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?
वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे. 
कोरोना काळात लोकांना मदत करण्याऐवजी लूटमार ! 
        कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे. 
ही post कोणत्याही सरकार / राजकीय पक्षाविरोधात नसुन सत्य परिस्थिती चे आकलन आहे .

🔍 ग्राहकांनो वेळीच जागे व्हा ! 🔍🙏🙏🙏

---चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व--

 डॉ.संजय ओक यांनी चारित्र्य व व्यक्तिमत्व याचे सुंदर विश्लेषण केले आहे.


चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व -डॉ.संजय ओक


माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला. 

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे! 

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत. 

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता? 

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला. 

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.
साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव. 

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

 कै.विनायकराव मेटे यांच्या गाडीच्या अपघाताच्या अनुषंगाने...


रोड हिप्नोसिस म्हणजे काय?
मी स्वतः मागच्या 15 दिवसाखाली या स्थितीतुन गेलो आहे, दैव बलवत्तर म्हणून बचावलो संभाजीनगर-जालना मार्गावर हाच प्रत्येय आला
सिंदखेडराजा जवळ जेवण करून गाडी चालवत होतो ac फुल स्पीड वर चालू होती
समोरच्या स्कारपीओ च्या मागे चालत असतांना नकळत नजर शुन्यात गेली आणि गाडीवरचा ताबा सुटला
नशीब गाडीने line सोडली, पण पूर्णपणे रोड सोडला नाही, गाडी एक साईड थोडी आदळली आणि अचानक भानावर आलो..
काय घडलं हे कस झालं आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण टोलगेट पास केल्यानंतरच जे काही घडलं ते आठवण अत्यंत धूसर होतं
- रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते.
- रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही.
- रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे.
- रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.
- रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.
- लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो.
- वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.
- रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते.
- चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
- डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे.
- गाडी चालवता चावलता ब्ल्यांक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात सुरू करा.

तुमचे आणि तुमच्या सहचाऱ्यांचे जिवन अनमोल आहे थोड्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू नका

 *पूरा अवश्य पढ़ें बहुत कुछ सीखने को मिलेगा*

[1] मुख्य द्वार के पास कभी भी कूड़ादान ना रखें इससे पड़ोसी शत्रु हो जायेंगे |

[२] सूर्यास्त के समय किसी को भी दूध,दही या प्याज माँगने पर ना दें इससे घर की बरक्कत समाप्त हो जाती है |

[३] छत पर कभी भी अनाज या बिस्तर ना धोएं..हाँ सुखा सकते है इससे ससुराल से सम्बन्ध खराब होने लगते हैं |

[४] फल खूब खाओ स्वास्थ्य के लिए अच्छे है लेकिन उसके छिलके कूडादान में ना डालें वल्कि बाहर फेंकें इससे मित्रों से लाभ होगा |

[५] माह में एक बार किसी भी दिन घर में मिश्री युक्त खीर जरुर बनाकर परिवार सहित एक साथ खाएं अर्थात जब पूरा परिवार घर में इकट्ठा हो उसी समय खीर खाएं तो माँ लक्ष्मी की जल्दी कृपा होती है |

[६] माह में एक बार अपने कार्यालय में भी कुछ मिष्ठान जरुर ले जाएँ उसे अपने साथियों के साथ या अपने अधीन नौकरों के साथ मिलकर खाए तो धन लाभ होगा |

[७] रात्री में सोने से पहले रसोई में बाल्टी भरकर रखें इससे क़र्ज़ से शीघ्र मुक्ति मिलती है और यदि बाथरूम में बाल्टी भरकर रखेंगे तो जीवन में उन्नति के मार्ग में बाधा नही आवेगी |

[८] वृहस्पतिवार के दिन घर में कोई भी पीली वस्तु अवश्य खाएं हरी वस्तु ना खाएं तथा बुधवार के दिन हरी वस्तु खाएं लेकिन पीली वस्तु बिलकुल ना खाएं इससे सुख समृद्धि बड़ेगी |

[९] रात्रि को झूठे बर्तन कदापि ना रखें इसे पानी से निकाल कर रख सकते है हानि से बचोगें |

[१०] स्नान के बाद गीले या एक दिन पहले के प्रयोग किये गये तौलिये का प्रयोग ना करें इससे संतान हठी व परिवार से अलग होने लगती है अपनी बात मनवाने लगती है अतः रोज़ साफ़ सुथरा और सूखा तौलिया ही प्रयोग करें |

[११] कभी भी यात्रा में पूरा परिवार एक साथ घर से ना निकलें आगे पीछे जाएँ इससे यश की वृद्धि होगी |
ऐसे ही अनेक अपशकुन है जिनका हम ध्यान रखें तो जीवन में किसी भी समस्या का सामना नही करना पड़ेगा तथा सुख समृद्धि बड़ेगी |

Kuchh vaastu tips🔴🔴🔴🔴
💥१. घर में सुबह सुबह कुछ देर के लिए भजन अवशय लगाएं ।
💥२. घर में कभी भी झाड़ू को खड़ा करके नहीं रखें, उसे पैर नहीं लगाएं, न ही उसके ऊपर से गुजरे अन्यथा घर में बरकत की कमी हो जाती है। झाड़ू हमेशा छुपा कर रखें |
💥३. बिस्तर पर बैठ कर कभी खाना न खाएं, ऐसा करने से धन की हानी होती हैं। लक्ष्मी घर से निकल जाती है1 घर मे अशांति होती है1
💥४. घर में जूते-चप्पल इधर-उधर बिखेर कर या उल्टे सीधे करके नहीं रखने चाहिए इससे घर में अशांति उत्पन्न होती है।
💥५. पूजा सुबह 6 से 8 बजे के बीच भूमि पर आसन बिछा कर पूर्व या उत्तर की ओर मुंह करके बैठ कर करनी चाहिए । पूजा का आसन जुट अथवा कुश का हो तो उत्तम होता है |
💥६. पहली रोटी गाय के लिए निकालें। इससे देवता भी खुश होते हैं और पितरों को भी शांति मिलती है |
💥७.पूजा घर में सदैव जल का एक कलश भरकर रखें जो जितना संभव हो ईशान कोण के हिस्से में हो |
💥८. आरती, दीप, पूजा अग्नि जैसे पवित्रता के प्रतीक साधनों को मुंह से फूंक मारकर नहीं बुझाएं।
💥९. मंदिर में धूप, अगरबत्ती व हवन कुंड की सामग्री दक्षिण पूर्व में रखें अर्थात आग्नेय कोण में |
💥१०. घर के मुख्य द्वार पर दायीं तरफ स्वास्तिक बनाएं |
💥११. घर में कभी भी जाले न लगने दें, वरना भाग्य और कर्म पर जाले लगने लगते हैं और बाधा आती है |
💥१२. सप्ताह में एक बार जरुर समुद्री नमक अथवा सेंधा नमक से घर में पोछा लगाएं | इससे नकारात्मक ऊर्जा हटती है |
💥१३. कोशिश करें की सुबह के प्रकाश की किरणें आपके पूजा घर में जरुर पहुचें सबसे पहले |
💥१४. पूजा घर में अगर कोई प्रतिष्ठित मूर्ती है तो उसकी पूजा हर रोज निश्चित रूप से हो, ऐसी व्यवस्था करे |

"पानी पीने का सही वक़्त".
(1) 3 गिलास सुबह उठने के बाद,
.....अंदरूनी उर्जा को Activate
करता है...
(2) 1 गिलास नहाने के बाद,
......ब्लड प्रेशर का खात्मा करता है...
(3) 2 गिलास खाने से 30 Minute पहले,
........हाजमे को दुरुस्त रखता है..
(4) आधा गिलास सोने से पहले,
......हार्ट अटैक से बचाता है..

यह बहुत अच्छा Msg है

Please इसे सब ग्रुपस में Frwd कर दिया जाये,नहीं आ सकता दुबारा क्योंकि इस साल फरवरी में चार रविवार, चार सोमवार, चार मंगलवार, चार बुधवार, चार बृहस्पतिवार, चार शुक्रवार, चार शनिवार.

यह प्रत्येक 823 साल में एक बार होता है।

यह धन की पोटली कहलाता है।

इसलिए कम से कम पाँच लोगों को या पाँच ग्रुप में भेजें और पैसा चार दिन में आयेगा।

सनातन धर्म पर आधारित है।

पढ़ने के 1 1 मिनट के अंदर भेजें |
*🙏🏻 जयश्रीमन्ननाराण🙏🏻*

Sunday, January 22, 2023

॥ आत्मचिंतन॥

*गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाने पाठवलेल्या एका क्रूर (कोरोना) शिक्षकाकडून आपण धडे घेत आहोत.*

*अजून थोड्या दिवसात सिलॅबस संपेल आणि मग परीक्षा होईल !*

 *आपण काय शिकलो याची, सुधारलो की नाही याची, सावरलो की नाही याची...*
*पास झालो तर ठीक... नाहीतर परत अजून एक नवीन (व्हायरस) शिक्षक जास्त अवघड सिलॅबस शिकवायला नक्की येईल.. म्हणून आताच नीट समजून घेऊ आणि सगळे जण पास होऊ.*
   *गेल्या काही दिवसात (कोरोना पासुन) आपण काय शिकलो या बाबतचं संक्षिप्त टिपन*

 *धडा पहिला:- आपण सगळे खूप लहान आहोत* 
*निसर्गाच्या त्या अवघ्या २०० नॅनो मीटर (कोरोना) सूक्ष्मजीवाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्या एवढे आपण नक्कीच मोठे नाहीत. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे.*

 *धडा दुसरा:- सगळे सारखेच* 
*मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच, मग आपण भेदभाव कारणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव नाही दाखवला. वर्ण,जात-पात, धर्म,देश, गरीब-श्रीमंत सगळं झूट ... चुकला तो संपला, No concession..!*

 *धडा तिसरा :- थांबणं गरजेचं* 
*आयुष्यात गती महत्वाची पण कुठेतरी स्वतःहून थांबणं त्याहून अधिक महत्वाचं. दुसर्याने थांबवलं की जास्त त्रास होतो.*
*म्हणून स्वतःच कधीतरी थांबूया. जे मागे राहिलेत त्यांना सोबत घेऊयात. थोडी विश्रांती घेऊयात, कारण सक्तीची विश्रांती खूप महागात पडते.*

 *धडा चौथा:- No Second Chance* 
*घरातल्या कुणाला जर कोरोनाची लागण झाली तर सरळ त्याला उचलून घेऊन जातात. जगला तर परत घरी येतो ,नाहीतर फक्त फोन करून सांगतात मेला म्हणून...*
*ना बॉडी बघायला मिळते ना कुठे जाळला हे कळते.*
*सोबत आहोत तोपर्यंत प्रियजनांना वेळ देणं गरजेचं आहे, मनातलं सांगणं महत्वाचं आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. प्रेम करा, माफी मागा, हट्ट पुरवा..*
*कारण कदाचित Second Chance मिळणार नाही.*

 *धडा पाचवा:- पैसा सर्वस्व नाही* 
*कितीही पैसे असतील तरी तुम्ही काही गोष्टी विकत नाही घेऊ शकत.* *आरोग्य, समाधान, दृष्टिकोन आणि विचार अशा गोष्टी विकत नाही मिळत.*
*त्या कमवाव्या लागतात. आज सगळ्यांना सरकारी दवाखान्यातच दाखल करतायत नो स्पेशल ट्रीटमेंट...*
*जरी पैसे खुप असतील तुमच्याकडे पण रिसोर्सेस हे समाजाचे असतात हे नेहमी लक्षात ठेवा.*

 *धडा सहावा :- वर्तमानात जागा* 
*आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे हे चुकीचेच आहे. भविष्याचे नियोजन असणे गरजेचे, पण त्याचा दबाव वर्तमानावर नको.*
*वर्तमान आनंदात घालवणे खूप महत्वाचे.. क्या पता " कल हो ना हो...!"*

 *धडा सातवा :- सगळ्यांचा आदर* 
*परिस्थिती अनुरूप सगळ्यांनाच एक अतिविशिष्ट महत्व असतं. जगात सगळे लोक तितकेच महत्वाचे असतात. फक्त परिस्थिती अनुरूप त्यांचे महत्व बदलते. आज ज्यांच्या घरी लहान लेकरं आहेत त्यांच्या साठी दूधवाला सगळ्यात महत्वाचा आहे. ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्या साठी डॉक्टर महत्वाचे. पोलीस, स्वच्छता कर्मचारी आपणा सर्वांसाठी महत्वाचे...*
*सगळ्यांचा आदर करायला स्वतः शिकलं पाहिजे.. कारण निसर्गाची शिकवणी फी खूपच जास्त आहे.*

 *धडा आठवा :- तुम्हीच तुमचे रक्षक* 
*आपल्या परिस्थिती साठी नेहमी आपणच जबाबदार असतो. सरकार आणि प्रशासन फक्त मार्गदर्शन करू शकतात किंवा कायदे नियम बनवू शकतात पण त्यांचं पालन करणे हे प्रत्येक इसमाच्या हातात आहे.* *जबाबदार नागरिक असणे आणि ते कृतीतून दाखवणे फार महत्वाचे आहे. नाहीतर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजाला भोगावे लागतात.*

 *धडा नववा :- पुढच्यास ठेच मागचा शहाणा*
*डोळे उघडून परिस्थितीचे आकलन करणे महत्त्वाचे आणि त्यातून शहाणे होणे त्याहून अधिक महत्त्वाचे. दुसऱ्याने केलेल्या चुका परत आपण केल्या तर त्याचे परिणाम आणखी जास्त भयानक असतात.*

 *धडा दहावा :- खऱ्या गरजा खूप कमी* 
*गेले काही दिवस घरी बसल्यावर आपल्याला एक नक्की समजले असेल की खऱ्या गरजा खूपच कमी आहेत. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्या शिवाय आपण जगू शकतो. अनावश्यक गरजा ओळखायला हव्यात आणि त्याची सवय टाळायला हवी. life style addiction पासून दूर राहायला शिकलं पाहिजे.*

 *धडा अकरावा :- चांगल्या गोष्टींची उजळणी* 
*काही गोष्टी मानव समाजात उपजतच आहेत आणि त्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. गेल्या काही दिवसांत आपण आपल्यातील या चांगल्या गोष्टींची उजळणी केली आणि इथून पुढेही करीत राहू...*

*काही महत्त्वाचे..*
*१. एकात्मता- जनता कर्फ्यू.*

*२. धैर्य :- एकही अप्रिय घटना नाही*

*३.Innovation :- Covid test kits in record time*

*4. कल्पकता :- घरी रोज नवीन रेसिपीज, वेळ घालवायचे विविध प्रकार.*

*5. Gratitude आणि appreciation :- पोलीस, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे विविध माध्यमातून आभार.*

*6. विश्वास :- प्रशासन आणि माध्यमांवर विश्वास.*

*7. काळजी आणि जाणीव :- साठेबाजी नाही वस्तूंच्या किमती स्थिर , गुन्हेगारी नाही.*

*8. Real priorities :- स्वतः आणि स्वतःचे कुटुंब हीच सगळ्यांची टॉप priority.*

*सर्वाना हातजोडून विनंती आहे की सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करा. आपण आपल्या घरी जेथे आहात तेथे कुटुंब व परिवारासोबत सुरक्षित राहा आरोग्याची काळजी घ्या. आपले कुटुंब, आपला गांव,आपले शहर,आपले राज्य व आपला देश या कोरोनापासून वाचवा.*

        *धन्यवाद*


🌻🌸🌵🌻🌸🌵🌻🌸🌵🌻

*आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला अस वाटतय.*
*कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे.*
*सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत.*
*हवा शुद्ध वहात आहे.*
*पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.*
*कुठे मंदिरातील घंटा आता वाजत नाही.*
*मस्जीद मधील अजाण नाही.*
*चर्च मधिल सामुहिक प्रार्थना नाही.*
*कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही.*
*कुणाला आता मंगळ नाही.*
*कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही.*
*स्मशानात कुठलेही विधी नाही.*
*पिंडदान नाही.*
*कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही.*
*आता कालसर्पाची पुजा बंद आहे.*
*नवग्रहाची शांती बंद आहे..*
*आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही..*

*तरी सगळ कस शांततेत सुरू आहे.*
*निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही...*
*तो आता एकच म्हणतो...* *नैसर्गिक पणे राहा...*
*माणूसकीने वागा...*
*बघा जमतय का*


  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...